शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस सिद्धारामय्यांना हटवणार? कर्नाटकात CM पदावरून पुन्हा वाद पेटला, डीके गटातील आमदारांनी दिल्लीत तळ ठोकला
2
चीन-जपान तणावात भारताची 'बल्ले-बल्ले'! झाला बंपर फायदा, बाजार 11% नं वधारला; आता ट्रम्प टॅरिफचं 'नो-टेंशन'!
3
पाकिस्तानचे डोळे उघडले! चक्क चक्क चिनी कंपन्यांना ठणकावले; म्हणाले, 'आमची लूट थांबवा, अन्यथा काम बंद करा'
4
"बौद्ध धर्माचे पालन करतो, पण..., आज जो काही आहे तो..."; निवृत्तीपूर्वी CJI बीआर गवई यांचं मोठं विधान!
5
जेव्हा मुख्यमंत्री नितीश कुमार पंतप्रधान मोदींच्या पायाला स्पर्श करण्यासाठी वाकले..., पाटणा विमानतळावरील 'आदराचं' अद्भुत दृश्य - Video
6
भाजपने आणखी एक नगरपालिका बिनविरोध जिंकली; मविआच्या तिन्ही उमेदवारांनी अर्ज मागे घेतले... 
7
Breaking: भारत - इस्रायल समृद्धीच्या नव्या पर्वाचे 'टेक ऑफ'; मुक्त व्यापार करार, थेट विमानसेवा अन् बरंच काही...
8
मोठी बातमी! लुधियाना टोल प्लाझाजवळ पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये भीषण चकमक; परिसरात गोळीबाराचा आवाज
9
IND vs SA: शुबमन गिलच्या दुखापतीबद्दल बॅटिंग कोचने दिली महत्त्वाची अपडेट, म्हणाले...
10
२०० महिलांनी कोर्टातच घेतला जीव; मालेगावात जे घडता घडता राहिलं ते नागपूरमध्ये झालं होतं
11
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का, अनिल देशमुख यांचे पुत्र सलिल देशमुख यांचा राजीनामा
12
Viral : जगातला सगळ्यात आळशी व्यक्ती! स्पर्धा जिंकण्यासाठी तब्बल 'इतके' तास गादीवर झोपून राहिला
13
'अनगरच्या पाटलांचा माज आम्ही उतरवणार, चुकीला माफी नाही'; अजित पवारांच्या नेत्याचा थेट इशारा
14
बंगालमध्ये 'घमासान'! "परिस्थिती अत्यंत बिघडलीये, SIR त्वरित थांबवा..."; ममता बॅनर्जींच CECना पत्र, आणखी काय म्हणाल्या?
15
IND vs SA: हार्दिक पांड्या आफ्रिकेविरूद्धच्या वनडे मालिकेत खेळणार की नाही? वाचा ताजी अपडेट
16
लाकडाचेच ते...! चीनमधील १,५०० वर्षे जुन्या प्राचीन मंदिराचे पॅव्हेलिअन पेटले; पर्यटकांनी मेणबत्ती लावली अन्...
17
भारतात विकली जाणारी टेस्ला मॉडेल Y किती सुरक्षित; युरो एनकॅप क्रॅश टेस्टमध्ये मिळवले 'एवढे' स्टार रेटिंग!
18
पश्चिम बंगालमध्ये ९०० मतदारांची नावे यादीतून गायब; निवडणूक आयोगाचा संताप, बीएलओंवर कारवाईचे आदेश
19
लोकांचे पैसे गुंतविता गुंतविता Groww ने १९,००० कोटींचे नुकसान केले; गुंतवणूकदार डोके धरून बसले...
20
पती नव्हे राक्षस! पत्नीने मित्रांना विरोध केला म्हणून मारहाण, गर्भपात आणि नंतर अश्लील व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

तूर, उडदाच्या साठेबाजीचा संशय; मुंबई, अकोला, लातूर, सोलापूर रडारवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2023 08:44 IST

Mumbai: तूर आणि उडद या डाळींची संभाव्य साठेबाजी रोखण्यासाठी केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयाने पावले उचलली असून, राज्यातील मुंबई, अकोला, लातूर आणि सोलापूर हे चार जिल्हे रडारवर आहेत.

नवी दिल्ली : तूर आणि उडद या डाळींची संभाव्य साठेबाजी रोखण्यासाठी केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयाने पावले उचलली असून, राज्यातील मुंबई, अकोला, लातूर आणि सोलापूर हे चार जिल्हे रडारवर आहेत.

डाळ व्यापाऱ्यांनी त्यांच्याकडे असलेल्या साठ्यांची नियमित आणि प्रामाणिकपणे माहिती न दिल्यास अघोषित साठे जप्त करून कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा ग्राहक संरक्षण मंत्रालयाने दिला आहे. तूर आणि उडद डाळींच्या साठ्यांचा साप्ताहिक आढावा घेण्यासाठी  ग्राहक संरक्षण विभागाच्या अतिरिक्त सचिव निधी खरे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे. 

महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि तामिळनाडू या चार राज्यांतील १० शहरांमध्ये तूर आणि उडदडाळीच्या साठ्यांचे वास्तव जाणून घेण्यासाठी गेल्या आठवड्यात ग्राहक संरक्षण विभागाने आपल्या १२ वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवले होते. 

व्यापारी, आयातदारांनी माहिती लपवलीमहाराष्ट्रातील मुंबई, अकोला, लातूर, सोलापूरसह इंदूर, सालेम, चेन्नई, कलबुर्गी, जबलपूर आणि कटनी येथे अधिकाऱ्यांनी राज्य सरकारचे अधिकारी, डाळ मिलचे मालक, व्यापारी, आयातदार आणि बंदरांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. डाळींचे व्यापारी आणि आयातदार माहिती लपवत असल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. 

चेन्नई बंदरातून तूरडाळीची आयातडाळींच्या बाजारपेठांना भेटी देऊन व्यापाऱ्यांशी चर्चा करणाऱ्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांसोबत ग्राहक संरक्षण खात्याचे सचिव रोहितकुमार सिंह यांची बैठक झाली. तेलंगण, राजस्थान, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकचे व्यापारी चेन्नई बंदराच्या माध्यमातून तूरडाळीची आयात करीत असल्याची माहिती त्यांना देण्यात आली.

डाळ महागलीवर्षभरात तूरडाळीच्या दरात १५ टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे ग्राहकांच्या खिशावर मोठा भार पडत आहे. महाराष्ट्रात गेल्या वर्षी एप्रिलमध्ये प्रति क्विंटल ९ हजार १२५ रुपये दर होता. तोच या वर्षी एप्रिलमध्ये १० हजार ५०० रुपये झाला आहे. सर्वाधिक भाववाढ बिहारमध्ये झाली आहे. तेथे वर्षभरात ८८ टक्के भाव वाढले आहेत. मध्य प्रदेशात ३५ टक्के भाववाढ तर कर्नाटकात २३ टक्के भाववाढ झाली.

टॅग्स :foodअन्नInflationमहागाई