शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
5
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
6
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
7
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
8
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
9
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
10
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
11
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
12
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
13
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
14
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
15
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
16
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
17
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
18
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
19
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
20
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 

तूर, उडदाच्या साठेबाजीचा संशय; मुंबई, अकोला, लातूर, सोलापूर रडारवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2023 08:44 IST

Mumbai: तूर आणि उडद या डाळींची संभाव्य साठेबाजी रोखण्यासाठी केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयाने पावले उचलली असून, राज्यातील मुंबई, अकोला, लातूर आणि सोलापूर हे चार जिल्हे रडारवर आहेत.

नवी दिल्ली : तूर आणि उडद या डाळींची संभाव्य साठेबाजी रोखण्यासाठी केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयाने पावले उचलली असून, राज्यातील मुंबई, अकोला, लातूर आणि सोलापूर हे चार जिल्हे रडारवर आहेत.

डाळ व्यापाऱ्यांनी त्यांच्याकडे असलेल्या साठ्यांची नियमित आणि प्रामाणिकपणे माहिती न दिल्यास अघोषित साठे जप्त करून कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा ग्राहक संरक्षण मंत्रालयाने दिला आहे. तूर आणि उडद डाळींच्या साठ्यांचा साप्ताहिक आढावा घेण्यासाठी  ग्राहक संरक्षण विभागाच्या अतिरिक्त सचिव निधी खरे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे. 

महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि तामिळनाडू या चार राज्यांतील १० शहरांमध्ये तूर आणि उडदडाळीच्या साठ्यांचे वास्तव जाणून घेण्यासाठी गेल्या आठवड्यात ग्राहक संरक्षण विभागाने आपल्या १२ वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवले होते. 

व्यापारी, आयातदारांनी माहिती लपवलीमहाराष्ट्रातील मुंबई, अकोला, लातूर, सोलापूरसह इंदूर, सालेम, चेन्नई, कलबुर्गी, जबलपूर आणि कटनी येथे अधिकाऱ्यांनी राज्य सरकारचे अधिकारी, डाळ मिलचे मालक, व्यापारी, आयातदार आणि बंदरांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. डाळींचे व्यापारी आणि आयातदार माहिती लपवत असल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. 

चेन्नई बंदरातून तूरडाळीची आयातडाळींच्या बाजारपेठांना भेटी देऊन व्यापाऱ्यांशी चर्चा करणाऱ्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांसोबत ग्राहक संरक्षण खात्याचे सचिव रोहितकुमार सिंह यांची बैठक झाली. तेलंगण, राजस्थान, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकचे व्यापारी चेन्नई बंदराच्या माध्यमातून तूरडाळीची आयात करीत असल्याची माहिती त्यांना देण्यात आली.

डाळ महागलीवर्षभरात तूरडाळीच्या दरात १५ टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे ग्राहकांच्या खिशावर मोठा भार पडत आहे. महाराष्ट्रात गेल्या वर्षी एप्रिलमध्ये प्रति क्विंटल ९ हजार १२५ रुपये दर होता. तोच या वर्षी एप्रिलमध्ये १० हजार ५०० रुपये झाला आहे. सर्वाधिक भाववाढ बिहारमध्ये झाली आहे. तेथे वर्षभरात ८८ टक्के भाव वाढले आहेत. मध्य प्रदेशात ३५ टक्के भाववाढ तर कर्नाटकात २३ टक्के भाववाढ झाली.

टॅग्स :foodअन्नInflationमहागाई