शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

भाजपच्या 'हिंदू राष्ट्र' भूमिकेवर सुषमा अंधारेंचा निशाणा, पक्षाला सुचवलं 'नवं नाव'; म्हणाल्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2023 21:57 IST

"मला वाटते, जर हे हिंदुराष्ट्र असेल, हे हिंदुराष्ट्रच मानायचे असेल आणि येथील बौद्ध, ख्रिश्चन, पारशी, जैन आणि  मुस्लीम देवेंद्रजींना वाऱ्यावर सोडून द्यायचे असतील, तर तो त्यांचा प्रश्न आहे."

मुंबई : प्रदेश भाजपने आपल्या ट्विटर हँडलवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फोटोसह 'भारत हे हिंदुराष्ट्र आहे' असे ट्विट केले आहे. यानंतर आता राज्याच्या राजकारणात चर्चांना उधान आले आहे. भारत हे एक हिंदू राष्ट्रच आहे, अशी भूमिका भाजपने घेतली आहे. तर विरोधी पक्षातील काही नेते भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र असल्याचे म्हणत आहेत. यावर प्रतिक्रिया देताना शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी रोकठोक भाष्य करत, भाजपला पक्षाचे नाव बदलण्याचा सल्ला दिला आहे.

यावर बोलताना अंधारे म्हणाल्या, "मी याकडे फार चांगल्या अर्थाने पाहते. मला वाटते, जर हे हिंदुराष्ट्र असेल, हे हिंदुराष्ट्रच मानायचे असेल आणि येथील बौद्ध, ख्रिश्चन, पारशी, जैन आणि  मुस्लीम देवेंद्रजींना वाऱ्यावर सोडून द्यायचे असतील, तर तो त्यांचा प्रश्न आहे. पण जर असेच असेल, तर त्यांनी त्यांच्या पक्षाचे नाव भारतीय जनता पार्टी बदलून हिंदुस्तान जनता पार्टी करावे." 

काय होतं भाजपचं ट्विट? -"कोणी कितीही धर्मनिरपेक्षतेचा बुरखा पांघरला, लांगुलचालन केलं तरी त्यांच्या मानन्या न मानण्याने आम्हास फरक पडत नाही! भारत हे हिंदुराष्ट्रच आहे," असे ट्विट काल प्रदेश भाजपच्या ट्विटर हँडलवरून देवेंद्र फडणवीस यांच्या फोटोसह करण्यात आले आहे. तत्पूर्वी, लखनऊ येथे माध्यमांशी संवाद साधतांना उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनीही अशाच स्वरुपाची भूमिका मांडली होती.

...हिंदू राष्ट्राबद्दल काही भूमिका मांडली जात असेल तर ती चिंतेची बाब -भाजप नेत्यांकडून हिंदू राष्ट्राबद्दल मांडण्यात आलेल्या भूमिकेबाबत माध्यमांकडून विचारण्यात आलेल्या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही आपले मत व्यक्त केले आहे. "जगात धर्माला जास्त महत्त्व दिलेल्या राष्ट्रांची फार प्रगती झालेली दिसत नाही. अमेरिका, इंग्लंडसारख्या देशात सर्वांचे स्वागत केले जाते. त्यामुळे प्रगतीही त्या वेगाने होते. आपल्या देशात बहुसंख्य हिंदू आहेत, त्यामुळे देशातील सर्व व्यवस्थेवर हिंदू धर्मातील विद्वानांचा प्रभाव आहे. अमेरीकेसारख्या देशात कोणत्याही जातीधर्माचा भेदभाव केला जात नसल्याने तो देश प्रगतीपथावर गेला. त्याच पद्धतीने भारताची प्रगती आपण सर्वांनी धर्मनिरपेक्ष विचाराने आजवर करत आलो आहोत. पण, राज्यकर्त्यांमधील काही प्रमुख नेत्यांकडून हिंदू राष्ट्राबद्दल काही भूमिका मांडली जात असेल तर ती चिंतेची बाब आहे," असे म्हणत पाटील यांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे. 

टॅग्स :Sushma Andhareसुषमा अंधारेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा