शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

भाजपच्या 'हिंदू राष्ट्र' भूमिकेवर सुषमा अंधारेंचा निशाणा, पक्षाला सुचवलं 'नवं नाव'; म्हणाल्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2023 21:57 IST

"मला वाटते, जर हे हिंदुराष्ट्र असेल, हे हिंदुराष्ट्रच मानायचे असेल आणि येथील बौद्ध, ख्रिश्चन, पारशी, जैन आणि  मुस्लीम देवेंद्रजींना वाऱ्यावर सोडून द्यायचे असतील, तर तो त्यांचा प्रश्न आहे."

मुंबई : प्रदेश भाजपने आपल्या ट्विटर हँडलवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फोटोसह 'भारत हे हिंदुराष्ट्र आहे' असे ट्विट केले आहे. यानंतर आता राज्याच्या राजकारणात चर्चांना उधान आले आहे. भारत हे एक हिंदू राष्ट्रच आहे, अशी भूमिका भाजपने घेतली आहे. तर विरोधी पक्षातील काही नेते भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र असल्याचे म्हणत आहेत. यावर प्रतिक्रिया देताना शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी रोकठोक भाष्य करत, भाजपला पक्षाचे नाव बदलण्याचा सल्ला दिला आहे.

यावर बोलताना अंधारे म्हणाल्या, "मी याकडे फार चांगल्या अर्थाने पाहते. मला वाटते, जर हे हिंदुराष्ट्र असेल, हे हिंदुराष्ट्रच मानायचे असेल आणि येथील बौद्ध, ख्रिश्चन, पारशी, जैन आणि  मुस्लीम देवेंद्रजींना वाऱ्यावर सोडून द्यायचे असतील, तर तो त्यांचा प्रश्न आहे. पण जर असेच असेल, तर त्यांनी त्यांच्या पक्षाचे नाव भारतीय जनता पार्टी बदलून हिंदुस्तान जनता पार्टी करावे." 

काय होतं भाजपचं ट्विट? -"कोणी कितीही धर्मनिरपेक्षतेचा बुरखा पांघरला, लांगुलचालन केलं तरी त्यांच्या मानन्या न मानण्याने आम्हास फरक पडत नाही! भारत हे हिंदुराष्ट्रच आहे," असे ट्विट काल प्रदेश भाजपच्या ट्विटर हँडलवरून देवेंद्र फडणवीस यांच्या फोटोसह करण्यात आले आहे. तत्पूर्वी, लखनऊ येथे माध्यमांशी संवाद साधतांना उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनीही अशाच स्वरुपाची भूमिका मांडली होती.

...हिंदू राष्ट्राबद्दल काही भूमिका मांडली जात असेल तर ती चिंतेची बाब -भाजप नेत्यांकडून हिंदू राष्ट्राबद्दल मांडण्यात आलेल्या भूमिकेबाबत माध्यमांकडून विचारण्यात आलेल्या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही आपले मत व्यक्त केले आहे. "जगात धर्माला जास्त महत्त्व दिलेल्या राष्ट्रांची फार प्रगती झालेली दिसत नाही. अमेरिका, इंग्लंडसारख्या देशात सर्वांचे स्वागत केले जाते. त्यामुळे प्रगतीही त्या वेगाने होते. आपल्या देशात बहुसंख्य हिंदू आहेत, त्यामुळे देशातील सर्व व्यवस्थेवर हिंदू धर्मातील विद्वानांचा प्रभाव आहे. अमेरीकेसारख्या देशात कोणत्याही जातीधर्माचा भेदभाव केला जात नसल्याने तो देश प्रगतीपथावर गेला. त्याच पद्धतीने भारताची प्रगती आपण सर्वांनी धर्मनिरपेक्ष विचाराने आजवर करत आलो आहोत. पण, राज्यकर्त्यांमधील काही प्रमुख नेत्यांकडून हिंदू राष्ट्राबद्दल काही भूमिका मांडली जात असेल तर ती चिंतेची बाब आहे," असे म्हणत पाटील यांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे. 

टॅग्स :Sushma Andhareसुषमा अंधारेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा