शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

Sushma Andhare : "...तर महाराष्ट्रासाठी धोक्याची घंटा, मुख्यमंत्र्यांनी तानाजी सावंतांचा राजीनामा घ्यावा"

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2023 15:36 IST

Sushma Andhare Slams Tanaji Sawant : ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आरोग्यमंत्र्यांवर जोरदार निशाणा साधला आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा राजीनामा घ्यावा असं देखील म्हटलं आहे. 

नांदेडमध्ये 24 तासांत 24 जणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे यात नवजात बालकांचाही समावेश आहे. या घटनेवरुन आरोग्य यंत्रणेवर जोरदार टीका करण्यात येत आहे. अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. याच दरम्यान ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आरोग्यमंत्र्यांवर जोरदार निशाणा साधला आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा राजीनामा घ्यावा असं देखील म्हटलं आहे. 

"आरोग्यमंत्री म्हणून तानाजी सावंत यांची कामगिरी निराशाजनक नाही तर चिंताजनक आहे. आरोग्यदायी महाराष्ट्रासाठी एकनाथ शिंदे यांनी तात्काळ तानाजी सावंतांचा राजीनामा घ्यायला हवा" अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली. यासोबतच आम्ही मृतांच्या नातेवाईकांना 5-10 लाख मदत दिली, असं म्हणून गेलेले जीव परत येत नाहीत असं देखील म्हटलं आहे. सुषमा अंधारे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. 

"नांदेडच्या शासकीय रुग्णालयात 24 तासांत 24 रुग्णांचा मृत्यू होणं धक्कादायक प्रकार आहे. काही दिवसांपूर्वी ठाण्यामध्ये अशाच पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात देखील 18 जणांचा मृत्यू झाला होता. या एकूण सगळ्या घडामोडी पाहता आरोग्यमंत्री म्हणून तानाजी सावंत हे अयशस्वी ठरत आहेत."

"महाराष्ट्राचं आरोग्य खातं अशा आरोग्यमंत्र्यांच्या हातात दिलं तर ही महाराष्ट्रासाठी धोक्याची घंटा असेल हे मुख्यमंत्र्यांनी समजून घ्यावं. आम्ही मृतांच्या नातेवाईकांना 5-10 लाख मदत दिली, असं म्हणून गेलेले जीव परत येत नाहीत. कृपया या घटनेचं गांभीर्य मुख्यमंत्र्यांनी ओळखावं" असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे. 

"भाजपा प्रचारावर हजारो कोटी खर्च करते पण मुलांच्या औषधांसाठी पैसे नाहीत?"

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी देखील नांदेड घटनेवरून भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. "महाराष्ट्रातील नांदेड येथील शासकीय रुग्णालयात औषधांच्या कमतरतेमुळे 12 नवजात बालकांसह 24 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी अत्यंत दुःखद आहे. मी सर्व शोकग्रस्त कुटुंबांप्रती मनापासून संवेदना व्यक्त करतो. भाजपा सरकार आपल्या प्रचारावर हजारो कोटी रुपये खर्च करते, पण मुलांच्या औषधांसाठी पैसे नाहीत? भाजपाच्या नजरेत गरिबांच्या जीवाची किंमत नाही" असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :Sushma Andhareसुषमा अंधारेNandedनांदेडTanaji Sawantतानाजी सावंतEknath Shindeएकनाथ शिंदे