शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

Maharashtra Politics: “बच्चू कडू आमचा भाऊ, रवी राणांची आमदारकी रद्द झाली पाहिजे”; सुषमा अंधारेंची आग्रही मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2022 16:05 IST

Maharashtra News: माफी मागून सुटका होणार नाही. रवी राणांच्या राजीनाम्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतला पाहिजे, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे.

Maharashtra Politics: आताच्या घडीला अनेकविध मुद्द्यावरून राजकारण तापलेले पाहायला मिळाले आहे. शिंदे गटाला पाठिंबा देणारे बच्चू कडू आणि भाजप समर्थक रवी राणा यांच्यातील वादावर अखेर पडदा पडला आहे. रवी राणा यांनी शब्द मागे घेतल्यानंतर आता बच्चू कडू यांनीही पहिली वेळ आहे म्हणून माफी देतो, असे सांगत हा वाद मिटल्याचे जाहीर केले. मात्र, या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आमदार रवी राणा यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

रवी राणा यांची आमदारकी रद्द करण्याचा ठराव विधानसभेत मांडला पाहिजे. फक्त माफीने काम चालणार नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. रवी राणा यांचा राजीनामा घेतला गेला नाही तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांविषयी असा समज होईल की, तुमचे पडद्यामागून वेगळे कारस्थान सुरु आहे, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे. 

रवी राणा बच्चू कडूंचा अशाप्रकारे अपमान करु शकत नाहीत

रवी राणा यांनी नुसती माघार घेऊन कसे चालेल. मला वाईट वाटते, बच्चू कडू आमचा भाऊ आहे. रवी राणा त्यांचा अशाप्रकारे अपमान करु शकत नाहीत. रवी राणा यांनी अक्षम्य चूक केलेली आहे. तुम्ही एका मान्यताप्राप्त लोकप्रतिनिधीची प्रतिमा मलिन करता, त्याच्या प्रतिमेला आणि विश्वासर्हतेला तडा जाईल, अशी विधाने करता. त्यामुळे अशी सवंग, उथळ आणि बेजबाबदार वक्तव्य करणाऱ्या सदस्याचे सभागृहाचे सदस्यत्व रद्द करण्याची जबाबदारी राज्यपाल कोश्यारी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आहे, असे सांगत सुषमा अंधारे यांनी टीका केली आहे. 

दरम्यान, सर्व प्रकल्प गुजरातमध्ये नेले जात आहेत. महाराष्ट्राला कंगाल करण्याचे काम सुरू आहे. यासाठीच देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली आहे. मात्र, मुंबई व सिंधुदुर्ग महाराष्ट्रपासून वेगळे करण्याचा भाजपचा कुटील डाव आहे. यात एकनाथ शिंदे अळीमिळी चूप करून बसले आहेत, याच वाईट वाटत आहे, या शब्दांत सुषमा अंधारे यांनी हल्लाबोल केला. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Sushma Andhareसुषमा अंधारेBacchu Kaduबच्चू कडूRavi Ranaरवि राणा