शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
3
सिंधू पाणी करार मोडल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
4
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
5
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
6
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
7
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
8
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
9
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
10
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
11
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
12
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
13
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
14
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
15
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
16
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
17
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
18
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
19
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
20
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली

“३० वर्ष नीलम गोऱ्हे पक्षात होत्या, त्यांनी किती कमावले, मातोश्रीवर...”; ठाकरे गटाचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2025 14:10 IST

Shiv Sena Thackeray Group Vs Shinde Group: नीलम गोऱ्हे चापलूस, बदमाश आहेत, त्या कायम मातोश्रीवर पडीक असायच्या. फिल्डवर कधी काम करायच्या नाहीत. अनेक गोष्टी त्यांच्याच हातात होत्या, असा पलटवार ठाकरे गटातील नेत्यांनी केला आहे.

Shiv Sena Thackeray Group Vs Shinde Group: गेल्या अनेक दिवसांपासून ठाकरे गटाला लागलेली गळती थांबताना दिसत नाही. संपूर्ण राज्यातून ठाकरे गटाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते उद्धव ठाकरे यांना जय महाराष्ट्र करून पक्षाला सोडचिठ्ठी देत आहेत आणि शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत आहेत. पक्षाला लागलेली गळती थांबवण्यात ठाकरे गटाला यश येताना दिसत नाही. तर आगामी काळात आणखी मोठ्या प्रमाणावर ठाकरे गटातील अनेक जण शिंदे गटात येणार असल्याचे दावे केले जात आहे. यातच शिवसेना शिंदे गटाच्या ज्येष्ठ नेत्या नीलम गोऱ्हे यांनी केलेल्या एका विधानामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्ह असल्याचे सांगितले जात आहे. 

उद्धव ठाकरे गटाचे लोकही फार समोर नाहीत त्यामुळे ते असताना मला बोललेले फार आवडले असते. नेत्यांना संपर्कच नको असेल तर आपण तिथे नकोसे झालो हे समजावे. २ मर्सिडिज गाड्या मिळाल्यावर एक पद असे होते. बाळासाहेब ठाकरे जोपर्यंत होते तोपर्यंत त्यांचे सगळीकडे लक्ष होते, मात्र त्यानंतर त्यात खूप बदल होत गेले. २०१९ ला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हा आम्हालाही खूप धन्य वाटले. बाळासाहेबांचा मुलगा मुख्यमंत्री झाला हे कारण होते. मात्र आमदारांना भेटी मिळणार नाहीत. कुठल्याही विषयावर भेट नाही. या सर्व गोष्टीचा विचार केला स्थित्यंतरे होण्यामागे बरीच कारणे असतात. त्यावर वेगळी चर्चा करायला जरूर माझी तयारी आहे, असे नीलम गोऱ्हे यांनी म्हटले आहे. साहित्य संमेलनात नीलम गोऱ्हे यांची मुलाखत घेण्यात आली. त्यावेळी त्यांनी हे विधान केले. 

३० वर्ष नीलम गोऱ्हे पक्षात होत्या, त्यांनी किती कमावले

यावरून आता ठाकरे गटाने पलटवार करण्यास सुरुवात केली आहे. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी नीलम गोऱ्हे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. दोन मर्सिडीज? नीलम गोऱ्हे या आमच्या पक्षात खूप काळ राहिल्या आहेत. जवळपास ३० वर्ष त्यांनी आमच्या पक्षात काढली आहेत. त्या जे काही म्हणत आहेत, त्यात तथ्य असेल तर प्रश्न पडला आहे की, मग नीलम गोऱ्हे यांनी किती कमावले असेल. कारण आमच्याकडे इतर कुठल्याही माणसांना नीलम गोऱ्हे मातोश्रीवर फिरकू द्यायच्या नाहीत. ३० वर्ष त्याच मातोश्रीवर असल्यासारख्या असायच्या. त्यामुळे सर्व नेमणुकांचे अधिकार हे जवळपास नीलम गोऱ्हे यांच्याकडे होते. त्यांच्याच सहीने गोष्टी पुढे सरकायच्या. निश्चितपणे ही सगळी कामाई नीलम गोऱ्हे यांच्याकडे जात असेल त्यांना याबाबत विचारले पाहिजे, फिल्डवर कधी काम करायच्या नाहीत. मातोश्रीवर कधी कोणी जावे, कोणाला भेटायला वेळ द्यायचा, कोणाला नाही द्यायचा, कोणाला पद द्यायचे, कोणाला पद द्यायचे नाही, प्रवेश सगळे त्या बघायच्या. त्यामुळे त्यांनी प्रचंड कमाई केली असेल. त्यांचा वार्षिक कमाईचा एव्हरेज किती आहे हा विचारायला पाहिजे होते, या शब्दांत सुषमा अंधारे यांनी पलटवार केला. 

दरम्यान,  नीलम गोऱ्हेंनी एवढा पैसा ठेवलाच कुठे? हा खरा माझा प्रश्न आहे. या प्रश्नाचे उत्तर दिले पाहिजे. इतक्या सगळ्या पैशांचे तुम्ही काय केले. दुसरा कोणताही माणूस मातोश्रीवर वावरत नव्हता. पक्ष फुटीनंतर, त्या सगळ्या काळात फक्त आणि फक्त पक्षात नीलम गोऱ्हेच होत्या. नीलम गोऱ्हे यांनी त्या पैशाचे काय केले आणि त्या पैशांचं स्त्रोत काय होता, त्याची विल्हेवाट कशी लावली. त्यांनी परदेशात किती पैसे गुंतवले. कुठे कुठे प्रॉपर्टी घेतली. नेमके काय-काय केले, हे सगळे नीलम गोऱ्हे यांना विचारले पाहिजे. चापलूसी करून किंवा बदमाशी करून मर्जी मिळवून पद मिळवणारी लोक असतील, तर अशा लोकांवर अजिबात आपण वेळ वाया घालवायचा नाही. आमच्या नजरेत नीलम गोऱ्हे ४ वेळा आमदार असल्या काय आणि नीलम गोरे विधानसभेवर असल्या काय आमच्या नजरेत नीलम गोऱ्हे एक क्रमांकाच्या चापलूस, बदमाश आणि गद्दार आहेत, अशी बोचरी टीका सुषमा अंधारे यांनी केली. 

 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेSushma Andhareसुषमा अंधारेNeelam gorheनीलम गो-हे