शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

‘मोदींना भेटल्यावर उद्धव ठाकरे राजीनामा देणारच होते,पण त्या घटनेनं सारं काही बदललं", केसरकरांचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2022 17:13 IST

Deepak Kesarkar: शिवसेनेत झालेल्या बंडानंतर बंडखोर शिंदेगटातील नेते आणि उद्धव ठाकरेंसोबत असलेल्या शिवसेनेतील नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. त्यातच आता शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी अजून एक सनसनाटी गौप्यस्फोट केला आहे.

मुंबई - शिवसेनेत झालेल्या बंडानंतर बंडखोर शिंदेगटातील नेते आणि उद्धव ठाकरेंसोबत असलेल्या शिवसेनेतील नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. त्यातच आता शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी अजून एक सनसनाटी गौप्यस्फोट केला आहे. सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर नारायण राणेंनी सुरू केलेल्या बदनामीविरोधात मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना कल्पना दिली होती. तसेच त्यानंतर उद्धव ठाकरे आणि मोदींची भेट झाली होती. या भेटीनंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार होते, मात्र नारायण राणे यांना केंद्रात मंत्री बनवण्यात आल्याने उद्धव ठाकरे नाराज झाले आणि याबाबतची बोलणी थांबली, असा दावा दीपक केसरकर यांनी केला आहे. 

दीपक केसरकर म्हणाले की, नारायण राणे यांनी सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात आदित्य ठाकरेंवर केलेल्या आरोपांमुळे आमच्यासारखी लोकं जी शिवसेनेवर, ठाकरे कुटुंबावर प्रेम करतात ती दुखावली गेली होती. मी या संदर्भात भाजपाच्या नेत्यांकडे विचारणा केली होती. तुम्ही तुमचं व्यासपीठ अशा गोष्टींसाठी कसा वापरू देता? त्यावेळी त्या भाजपा नेत्यांनी सांगितलं होतं की आमच्या बहुतांश आमदारांचा अशा बदनामीला विरोध आहे. माझ्या मते राजकीय भवितव्य असलेल्या एखाद्या युवकाची बदनामी झाली तर ते योग्य ठरणार नाही. आपल्या घरातील तरुणाची, एखाद्या व्यक्तीची बदनामी होते, तेव्हा कुटुंबाला किती वेदना होतात, हे मी समजून शकतो. त्यामुळे कुणीही न सांगता मी स्वत: वैयक्तिक संपर्कातून पंतप्रधान नरेंद्र मोदींशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या कानी ही गोष्ट घातली. मोदी अत्यंत कर्तव्यकठोर व्यक्ती आहेत. त्यांनी ही माहिती व्यवस्थित ऐकून घेतली. सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर नारायण राणेंनी भाजपाच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेतली होती. त्यातून आदित्य ठाकरेंची जी बदनामी झाली त्यामुळे अनेक जण नाराज झाले होते. त्यामुळे मी पुढाकार घेतला, असे केसरकरांनी सांगितले.

केसरकर पुढे म्हणाले की, त्यानंतर उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांचा संवाद सुरू झाला. हे मुद्दे जसेच्या तसे आम्ही पोहोचवत होतो. त्यामुळे पुढच्या काळात उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदींची भेट झाली. त्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कुटुंबप्रमुख कसा असावा, हे दाखवून दिले. त्यांच्या निरोपामधून बाळासाहेबांबद्दलचा आदर, ठाकरे कुटुंबावरील प्रेम दिसून येतं होतं. त्यावेळीच उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा त्याग करण्याचं ठरवलं होतं. १५ दिवसांत उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपद सोडणार होते. परंतु उद्धव ठाकरे मुंबईत आले तेव्हा या गोष्टी कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवल्या पाहिजेत. अन्यथा गैरसमज निर्माण होतो, हे त्यांच्या लक्षात आलं. त्यामुळे त्यांनी वेळ मागून घेतला होता. यादरम्यान जी बोलणी होत होती त्यानुसार उद्धव ठाकरेंच्या मनात जे जे आहे त्यानुसार करण्याची तयारी मोदींनी केली होती. हे सर्व निरोप देत असताना केवळ तीन लोकांना माहिती होती. याची कल्पना रश्मी वहिनींनाही होती. काही खोटं बोलून कुणाची बदनामी करण्याची गरज नाही. मी जे घडलं, जसं घडलं हे महाराष्ट्रासमोर आणत आहे, असा गौप्यस्फोट दीपक केसरकर यांनी केला.

याचदरम्यान बराच वेळ निघून गेला आणि विधानसभेत १२ आमदारांच निलंबन झालं. निलंबन झालं तेव्हा भाजपाचा निरोप आला होता. आपली बोलणी होत असताना अशा प्रकारे आणि एवढ्या वेळासाठी निलंबन करणं योग्य नाही, असं त्यांचं मत होतं. त्यानंतर कोर्टानेही हे निलंबन रद्द ठरवलं. त्यानंतरच्या काळात नारायण राणेंचा समावेश केंद्रीय मंत्रिमंडळात झाला. त्यामुळे उद्धव ठाकरे नाराज झाले आणि ही बोलणी थांबली. मग दोन महिन्यांनी माझं पुन्हा उद्धव ठाकरेंशी बोलणं झालं. त्यात अशा गोष्टी होतच असतात. मात्र पुन्हा बोलणी सुरू होऊन चांगलं निष्पन्न व्हावं, अशी अपेक्षा होती. मात्र त्यांना असलेल्या वेळेच्या अभावामुळे हे बोलणं होऊ शकलं नाही. त्यानंतर एकनाथ शिंदेंच्या माध्यमातून मी प्रयत्न सुरू केले. अनिल देसाई, मिलिंद नार्वेकर यांनाही, याबाबत कल्पना दिली होती, असा दावाही दीपक केसरकर यांनी केला. 

टॅग्स :Deepak Kesarkarदीपक केसरकर Uddhav Thackerayउद्धव ठाकरेNarendra Modiनरेंद्र मोदीNarayan Raneनारायण राणे