शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

‘मोदींना भेटल्यावर उद्धव ठाकरे राजीनामा देणारच होते,पण त्या घटनेनं सारं काही बदललं", केसरकरांचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2022 17:13 IST

Deepak Kesarkar: शिवसेनेत झालेल्या बंडानंतर बंडखोर शिंदेगटातील नेते आणि उद्धव ठाकरेंसोबत असलेल्या शिवसेनेतील नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. त्यातच आता शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी अजून एक सनसनाटी गौप्यस्फोट केला आहे.

मुंबई - शिवसेनेत झालेल्या बंडानंतर बंडखोर शिंदेगटातील नेते आणि उद्धव ठाकरेंसोबत असलेल्या शिवसेनेतील नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. त्यातच आता शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी अजून एक सनसनाटी गौप्यस्फोट केला आहे. सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर नारायण राणेंनी सुरू केलेल्या बदनामीविरोधात मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना कल्पना दिली होती. तसेच त्यानंतर उद्धव ठाकरे आणि मोदींची भेट झाली होती. या भेटीनंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार होते, मात्र नारायण राणे यांना केंद्रात मंत्री बनवण्यात आल्याने उद्धव ठाकरे नाराज झाले आणि याबाबतची बोलणी थांबली, असा दावा दीपक केसरकर यांनी केला आहे. 

दीपक केसरकर म्हणाले की, नारायण राणे यांनी सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात आदित्य ठाकरेंवर केलेल्या आरोपांमुळे आमच्यासारखी लोकं जी शिवसेनेवर, ठाकरे कुटुंबावर प्रेम करतात ती दुखावली गेली होती. मी या संदर्भात भाजपाच्या नेत्यांकडे विचारणा केली होती. तुम्ही तुमचं व्यासपीठ अशा गोष्टींसाठी कसा वापरू देता? त्यावेळी त्या भाजपा नेत्यांनी सांगितलं होतं की आमच्या बहुतांश आमदारांचा अशा बदनामीला विरोध आहे. माझ्या मते राजकीय भवितव्य असलेल्या एखाद्या युवकाची बदनामी झाली तर ते योग्य ठरणार नाही. आपल्या घरातील तरुणाची, एखाद्या व्यक्तीची बदनामी होते, तेव्हा कुटुंबाला किती वेदना होतात, हे मी समजून शकतो. त्यामुळे कुणीही न सांगता मी स्वत: वैयक्तिक संपर्कातून पंतप्रधान नरेंद्र मोदींशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या कानी ही गोष्ट घातली. मोदी अत्यंत कर्तव्यकठोर व्यक्ती आहेत. त्यांनी ही माहिती व्यवस्थित ऐकून घेतली. सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर नारायण राणेंनी भाजपाच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेतली होती. त्यातून आदित्य ठाकरेंची जी बदनामी झाली त्यामुळे अनेक जण नाराज झाले होते. त्यामुळे मी पुढाकार घेतला, असे केसरकरांनी सांगितले.

केसरकर पुढे म्हणाले की, त्यानंतर उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांचा संवाद सुरू झाला. हे मुद्दे जसेच्या तसे आम्ही पोहोचवत होतो. त्यामुळे पुढच्या काळात उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदींची भेट झाली. त्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कुटुंबप्रमुख कसा असावा, हे दाखवून दिले. त्यांच्या निरोपामधून बाळासाहेबांबद्दलचा आदर, ठाकरे कुटुंबावरील प्रेम दिसून येतं होतं. त्यावेळीच उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा त्याग करण्याचं ठरवलं होतं. १५ दिवसांत उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपद सोडणार होते. परंतु उद्धव ठाकरे मुंबईत आले तेव्हा या गोष्टी कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवल्या पाहिजेत. अन्यथा गैरसमज निर्माण होतो, हे त्यांच्या लक्षात आलं. त्यामुळे त्यांनी वेळ मागून घेतला होता. यादरम्यान जी बोलणी होत होती त्यानुसार उद्धव ठाकरेंच्या मनात जे जे आहे त्यानुसार करण्याची तयारी मोदींनी केली होती. हे सर्व निरोप देत असताना केवळ तीन लोकांना माहिती होती. याची कल्पना रश्मी वहिनींनाही होती. काही खोटं बोलून कुणाची बदनामी करण्याची गरज नाही. मी जे घडलं, जसं घडलं हे महाराष्ट्रासमोर आणत आहे, असा गौप्यस्फोट दीपक केसरकर यांनी केला.

याचदरम्यान बराच वेळ निघून गेला आणि विधानसभेत १२ आमदारांच निलंबन झालं. निलंबन झालं तेव्हा भाजपाचा निरोप आला होता. आपली बोलणी होत असताना अशा प्रकारे आणि एवढ्या वेळासाठी निलंबन करणं योग्य नाही, असं त्यांचं मत होतं. त्यानंतर कोर्टानेही हे निलंबन रद्द ठरवलं. त्यानंतरच्या काळात नारायण राणेंचा समावेश केंद्रीय मंत्रिमंडळात झाला. त्यामुळे उद्धव ठाकरे नाराज झाले आणि ही बोलणी थांबली. मग दोन महिन्यांनी माझं पुन्हा उद्धव ठाकरेंशी बोलणं झालं. त्यात अशा गोष्टी होतच असतात. मात्र पुन्हा बोलणी सुरू होऊन चांगलं निष्पन्न व्हावं, अशी अपेक्षा होती. मात्र त्यांना असलेल्या वेळेच्या अभावामुळे हे बोलणं होऊ शकलं नाही. त्यानंतर एकनाथ शिंदेंच्या माध्यमातून मी प्रयत्न सुरू केले. अनिल देसाई, मिलिंद नार्वेकर यांनाही, याबाबत कल्पना दिली होती, असा दावाही दीपक केसरकर यांनी केला. 

टॅग्स :Deepak Kesarkarदीपक केसरकर Uddhav Thackerayउद्धव ठाकरेNarendra Modiनरेंद्र मोदीNarayan Raneनारायण राणे