शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

"...याची जाहीर कबुलीच त्यांनी दिलीय", फडणवीसांच्या 'त्या' विधानानंतर सुप्रिया सुळेंची पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2024 11:06 IST

Supriya Sule Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या एका विधानावर बोट ठेवत सुप्रिया सुळे यांनी महायुती सरकारवर टीका केली. 

Supriya Sule Mahayuti : विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली नसली, तरी राज्यात राजकीय प्रचार हळूहळू जोर धरू लागला आहे. आरोप-प्रत्यारोप जोरात सुरू असून, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारबद्दल केलेल्या एका विधानावरून सुप्रिया सुळेंनीमहायुतीवर निशाणा साधला आहे. 

देवेंद्र फडणवीस यांच्या विधानाचा व्हिडीओ पोस्ट करत सुप्रिया सुळे यांनी महायुती सरकारच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. 

सुप्रिया सुळेंची पोस्ट काय? खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, "चला बरं झालं, स्वतः उपमुख्यमंत्री महोदयांनीच सांगून टाकलं की, त्यांच्या सरकारचा वेग गोगलगायीचा आहे. या सरकारमध्ये फाईल पुढे जाण्यासाठी धक्का मारावा लागतो असंही त्यांनी कबूल केलेय."

ज्योतिबा फुलेंचा विचार, महायुतीला टोला

सुप्रिया सुळे पुढे म्हणतात, "थोडक्यात महायुतीच्या काळात प्रशासन गतीमान वगैरे सांगणाऱ्या जाहिराती साफ खोट्या आहेत याची जाहीर कबुलीच त्यांनी दिलीय? थोर समाजसुधारक क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले द्रष्टेपणाने म्हणालेच होते -'विद्येविना मती गेली। मतिविना नीती गेली। नीतिविना गती गेली। गतिविना वित्त गेले। वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले।।" 

हे सरकार सपशेल अपयशी ठरले आहे -सुप्रिया सुळे

"खोकेबाजीच्या अविद्येचे एवढे सगळे प्रताप झाले. या खोकेबाजीमुळे या सरकारची मती गेली, मती गेली म्हणून नीती गेली, नीती गेली म्हणून गती गेली, गती गेली म्हणून उद्योग परराज्यात जाऊ लागले म्हणजेच वित्त गेले. वित्त नाही म्हणून शेतकरी, गोरगरीब, शोषित, वंचितांच्या हक्काचं हे सरकार देऊ शकत नाही. तात्पर्य काय तर महायुतीचे हे सरकार सर्व आघाड्यांवर सपशेल अपयशी ठरले आहे", अशी टीका सुप्रिया सुळे यांनी महायुती सरकारवर केली आहे. 

देवेंद्र फडणवीस काय बोलले?

"आमच्याकडे सरकारमध्ये जी फाईल असते, तिला गोगलगायीची पावले असतात. ती गोगलगायीच्याच पावलाने पुढे जाते, तिला धक्काच मारावा लागतो. धक्का मारल्याशिवाय काहीच पुढे जात नाहीत. अर्थसंकल्पात आपण विद्यापीठाची घोषणा केली. शासन निर्णय काढले आणि आज मला अतिशय आनंद आहे की, पहिले मराठी भाषा विद्यापीठ हे रिद्धपूरला स्थापन झाले आहे", असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.  

टॅग्स :PoliticsराजकारणSupriya Suleसुप्रिया सुळेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४MahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडी