शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
2
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
3
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
4
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
5
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, युट्यूबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
6
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
7
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
8
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
9
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
10
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
11
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
12
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
13
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
14
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
15
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
16
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
17
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
18
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
19
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
20
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा

"...याची जाहीर कबुलीच त्यांनी दिलीय", फडणवीसांच्या 'त्या' विधानानंतर सुप्रिया सुळेंची पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2024 11:06 IST

Supriya Sule Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या एका विधानावर बोट ठेवत सुप्रिया सुळे यांनी महायुती सरकारवर टीका केली. 

Supriya Sule Mahayuti : विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली नसली, तरी राज्यात राजकीय प्रचार हळूहळू जोर धरू लागला आहे. आरोप-प्रत्यारोप जोरात सुरू असून, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारबद्दल केलेल्या एका विधानावरून सुप्रिया सुळेंनीमहायुतीवर निशाणा साधला आहे. 

देवेंद्र फडणवीस यांच्या विधानाचा व्हिडीओ पोस्ट करत सुप्रिया सुळे यांनी महायुती सरकारच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. 

सुप्रिया सुळेंची पोस्ट काय? खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, "चला बरं झालं, स्वतः उपमुख्यमंत्री महोदयांनीच सांगून टाकलं की, त्यांच्या सरकारचा वेग गोगलगायीचा आहे. या सरकारमध्ये फाईल पुढे जाण्यासाठी धक्का मारावा लागतो असंही त्यांनी कबूल केलेय."

ज्योतिबा फुलेंचा विचार, महायुतीला टोला

सुप्रिया सुळे पुढे म्हणतात, "थोडक्यात महायुतीच्या काळात प्रशासन गतीमान वगैरे सांगणाऱ्या जाहिराती साफ खोट्या आहेत याची जाहीर कबुलीच त्यांनी दिलीय? थोर समाजसुधारक क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले द्रष्टेपणाने म्हणालेच होते -'विद्येविना मती गेली। मतिविना नीती गेली। नीतिविना गती गेली। गतिविना वित्त गेले। वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले।।" 

हे सरकार सपशेल अपयशी ठरले आहे -सुप्रिया सुळे

"खोकेबाजीच्या अविद्येचे एवढे सगळे प्रताप झाले. या खोकेबाजीमुळे या सरकारची मती गेली, मती गेली म्हणून नीती गेली, नीती गेली म्हणून गती गेली, गती गेली म्हणून उद्योग परराज्यात जाऊ लागले म्हणजेच वित्त गेले. वित्त नाही म्हणून शेतकरी, गोरगरीब, शोषित, वंचितांच्या हक्काचं हे सरकार देऊ शकत नाही. तात्पर्य काय तर महायुतीचे हे सरकार सर्व आघाड्यांवर सपशेल अपयशी ठरले आहे", अशी टीका सुप्रिया सुळे यांनी महायुती सरकारवर केली आहे. 

देवेंद्र फडणवीस काय बोलले?

"आमच्याकडे सरकारमध्ये जी फाईल असते, तिला गोगलगायीची पावले असतात. ती गोगलगायीच्याच पावलाने पुढे जाते, तिला धक्काच मारावा लागतो. धक्का मारल्याशिवाय काहीच पुढे जात नाहीत. अर्थसंकल्पात आपण विद्यापीठाची घोषणा केली. शासन निर्णय काढले आणि आज मला अतिशय आनंद आहे की, पहिले मराठी भाषा विद्यापीठ हे रिद्धपूरला स्थापन झाले आहे", असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.  

टॅग्स :PoliticsराजकारणSupriya Suleसुप्रिया सुळेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४MahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडी