शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
2
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
3
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
4
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
5
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
6
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
7
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
8
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
9
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
10
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
11
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
12
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
13
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
14
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
15
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
16
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
17
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
18
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
19
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
20
संजय शिरसाटांचा उपमुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप; अजित पवारांनी एका वाक्यात उत्तर दिले...

Supriya Sule On Narendra Modi : मोदीजी, तुम्ही महाराष्ट्राचा एवढा द्वेष का करता?; सुप्रिया सुळेंचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2022 23:56 IST

सुप्रिया सुळे यांनी वाचून दाखवला पंतप्रधानांचा पूर्ण कार्यक्रम.

“मोदीजी महाराष्ट्रात आले. त्यांचं स्वागत आहे. अतिथी देवो भव असं म्हणणाऱ्या महाराष्ट्राची संस्कृती आहे. प्रोटोकॉलप्रमाणे अजित पवार हे त्यांना घेण्यासाठी पुण्याच्या विमानतळावर गेले. त्यांचा मानसन्मानही केला. त्यांनी आपल्याला काय केलं?,” असा सवाल राष्ट्रीय काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. त्यांचा कार्यक्रम काय होता याची यादीही आपल्याकडे असल्याचं त्या म्हणाल्या.

“पावणे दोन वाजता दर्शन, २ वाजता मंदिराचं लोकार्पण, दर्शन अभंगगाथा, नंतर पब्लिक फंक्शन, २.०८ मिनिटांनी पंतप्रधान स्टेजवर येतील, २.०८-२.१२ त्यांचा सत्कार होईल, २.१२ ते २.१५ नितीन मोरेजी, २.१५-२.२० देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते, २.२०-२.२३ संत चोखामेळा गाथा, २.२३-३ वाजेपर्यंत पंतप्रधानांचं भाषण. यात अजित पवार यांचं नाव कुठेही दिसत नाही,” असं कार्यक्रमाची रूपरेषा सांगताना सुप्रिया सुळे म्हणाल्या. बसण्याच्या सोयीतही गंमत होती. एक नंबरच्या सीटवर नरेंद्र मोदी, २ नंबरला प्रोटोकॉलप्रमाणे अजित पवार याचं नाव आणि ३ नंबरला देवेंद्र फडणवीस. १ नंबरच्याचं भाषण बसायची जागा बरोबर भाषणही बरोबर, दोन नंबरच्याला बसायची जागा बरोबर पण भाषण नाही आणि तीन नंबर बसायची जागा आणि भाषणही हे लिहिलेलं असल्याचंही त्या म्हणाल्या.

“आमचं भाषण आम्ही विनंती पाठवली, ती तुम्ही कट करून पाठवली आणि व्यासपीठावर म्हणता भाषण करा हा आपला अपमान नाही का? टीव्हीसमोर तुम्ही भाषण करा म्हणताय पण तुमचंच ऑफिस दादांचं भाषण कट करून पाठवलंय. हे भाऊ म्हणून बोलत नाही. ते महाराष्ट्रात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी सरकारचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत,” असंही त्यांनी स्पष्ट केलं. ते आपल्या पक्षाचे नेते आहेत, पण ते तीन नंबरला. पहिले ते महाराष्ट्राचे आहेत, नंतर पुणे जिल्ह्याचे आहेत आणि नंतर ते आपले आहेत. आपला हक्क त्यांच्या जबाबदारीमुळे तीन नंबरला असल्याचंही त्यांनी नमूद केलं.… तर काही हरकत नव्हती“जर देशाचे पंतप्रधान येथे येतात, जर फडणवीसांचं भाषण नाही म्हटलं असतं तर समजू शकलो असतो तुम्ही दोघांनाही नाही म्हटलं. पंतप्रधानांची वेळ कमी असेल मान्य आहे. जर फडणवीस भाषण करू शकतात, तर राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांसमोर भाषण केलंच पाहिजे, हा माझा मराठी अस्मितेचा विषय आहे. हा महाराष्ट्राचा अपमान आहे. महाराष्ट्राच्या उपमुख्यमत्र्यांना तुम्ही नाही म्हटलं. हा पक्षपात नाही झाला का? भाजपतील देवेंद्र फडणवीस भाषण करू शकतात, पण महाविकास आघाडीतील अजित पवार भाषण करू शकत नाही. पंतप्रधानांना मला विचारायचंय मी नाराज नाही, पण मला आश्चर्य वाटतंय. तुम्हाला महाराष्ट्राचा इतका का द्वेष आहे याचं आश्चर्य वाटतंय. आज महाराष्ट्राचा अपमान झाला आहे,” असंही त्या म्हणाल्या.

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेNarendra Modiनरेंद्र मोदीAjit Pawarअजित पवारMaharashtraमहाराष्ट्र