शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

"अबकी बार गोळीबार सरकार; फडणवीस हे राज्याच्या इतिहासातील सर्वाधिक अपयशी गृहमंत्री"

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2024 15:23 IST

Supriya Sule vs Devendra Fadnavis, Salman Khan Firing Case: बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या घराबाहेर आज पहाटे गोळीबाराची घटना घडली. त्यावरून शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी  खरमरीत टीका एकनाथ शिंदे सरकार आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली.

Supriya Sule vs Devendra Fadnavis, Salman Khan Firing Case: बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या घराबाहेर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. पहाटे ५ वाजताच्या सुमारास गोळीबाराचा आवाज झाल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेनंतर पोलिसांनी त्या परिसरात सुरक्षेत वाढ केली असून पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोघांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत. यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया देताना, एकनाथ शिंदे सरकार आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली.

"अभिनेता सलमान खान याच्या घरासमोर गोळीबार झाल्याचे धक्कादायक घटना घडली आहे. राज्यातील या घटनेनंतर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. कायद्याचा धाक राहिला नसल्याने राज्यात गुन्हेगारी वाढली आहे. राज्याच्या इतिहासातील सर्वाधिक अपयशी गृहमंत्री हे देवेंद्र फडणवीस आहेत", असा हल्लाबोल सुप्रिया सुळे यांनी केला. "सलमान खानच्या घरासमोर गोळीबार धक्कादायक आहे. भर रस्त्यावर असं होत असेल तर हे राज्य सरकारचे आणि गृह विभागाचे अपयश आहे. मुंबईसारख्या ठिकाणी भर रस्त्यावर अशा प्रकारे गोळीबार होत असेल तर ही चिंतेची बाब आहे. 'अबकी बार, गोळीबार सरकार' या माझ्या वक्तव्यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाला आहे," असा खोचक टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला.

सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या, "राज्यात गोळीबाराच्या घटना सातत्याने घडत आहेत. पुण्यातदेखील कोयता गँगची दहशत सुरूच आहे. कोयता गँगला पुन्हा डोकं वर काढू देणार नाही, असं सांगितलं जातं. तरीही कोयता गँगची दहशत पुणे परिसरात कायम आहे. महाराष्ट्राच्या ट्रिपल इंजिन सरकारमधील नेत्यांचा गुन्हेगारीला आशीर्वाद आहे. महाराष्ट्रात गुन्हेगारी वाढली आहे. हे गृहमंत्र्यांचे अपयश आहे."

पोटातलं ओठावर आलं..

पुणे स्टेशन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यानंतर सुप्रिया सुळे म्हणाल्या, "ज्या भारताच्या सुपुत्राने आपल्याला संविधान दिलं अशा या महामानवाचे आशीर्वाद घेण्यासाठी आपण इथं आलो आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेलं संविधानाचे रक्षण आमच्याकडून नेहमी केलं जाणार आहे. भाजपचे खासदार आम्हाला संविधान बदलायचं आहे, असं बोलले होते. एक प्रकारे त्यांच्या पोटातलं ओठावर आलं असून या सरकारला संविधान बदलायचं आहे त्यासाठी त्यांनी ४०० पार ची घोषणा दिली आहे."

शरद पवारांवरील टीकेवर..

"शरद पवार यांच्यावर टीका ६० वर्षे सुरू आहे आणि त्यांच्यावर टीका केली की हेडलाईन होते हे सर्वांना माहीत आहे. दररोज शरद पवार यांच्या विरोधात कटकारस्थान सुरू आहे. आपलं नाणं गेलं ६० वर्ष मार्केटमध्ये खणखणीत आहे. ही चांगली बाब आहे. त्यांना काहीही करून शरद पवार यांना संपवायचं आहे आणि हे त्यांचं कटकारस्थान आहे", अशी टीका भाजपावर सुळे यांनी केली.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Supriya Suleसुप्रिया सुळेSharad Pawarशरद पवारSalman Khanसलमान खानDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदेFiringगोळीबार