शहरं
Join us  
Trending Stories
1
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
2
मुंबईतील चुरशीच्या लढतीत आणखी एक ट्विस्ट; शेवटच्या दिवशी नवा उमेदवार मैदानात!
3
“३५ वर्षे राजकारणात, लढायचे अन् जिंकायचे एवढेच उद्दिष्ट”; रवींद्र वायकर स्पष्ट केली भूमिका
4
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
5
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
6
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...
7
ठरलं! पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?
8
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
9
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!
10
'बोस यांनी मला स्पर्श केला अन्...'; महिलेच्या आरोपांवर राज्यपाल म्हणाले,'गोळी चालवा पण...'
11
Smriti Irani : "काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
12
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
13
कोविशील्ड लसीचे नेमके किती दुष्परिणाम?; कोरोना काळातील 'सुपरमॅन'ने सांगितलं 'सत्य'
14
"टीएमसी बंगालचे नाव खराब करत आहे", नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल
15
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
16
अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट अन् भाजप-ठाकरे गटात रंगलं ट्विटर वॉर, नेमकं काय घडलं ?
17
Share Market : शेअर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; रिलायन्स आपटला
18
MRF Share Price: एमआरएफ देणार आतापर्यंतचा सर्वाधिक डिविडंड, मोठ्या विक्रीमुळे शेअर्स ४ टक्क्यांपर्यंत घसरले
19
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
20
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?

सुप्रीम कोर्टाच्या निकालास ‘एलआयसी’कडून केराची टोपली , हंगामी कर्मचारी कायम करण्याचा आदेश धाब्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 3:04 AM

देशभरातील विविध विभागीय आणि शाखा कार्यालयांमध्ये अनेक वर्षे बदली, हंगामी किंवा अर्ध वेळ पद्धतीने काम केलेल्या तृतीय व चतुर्थ श्रेणीतील सुमारे आठ हजार कर्मचा-यांना नोकरीत कायम करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशास, भारतीय आयुर्विमा महामंडळाने (एलआयसी) केराची टोपली दाखविली आहे.

विशेष प्रतिनिधी मुंबई : देशभरातील विविध विभागीय आणि शाखा कार्यालयांमध्ये अनेक वर्षे बदली, हंगामी किंवा अर्ध वेळ पद्धतीने काम केलेल्या तृतीय व चतुर्थ श्रेणीतील सुमारे आठ हजार कर्मचा-यांना नोकरीत कायम करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशास, भारतीय आयुर्विमा महामंडळाने (एलआयसी) केराची टोपली दाखविली आहे.हे सर्व कर्मचारी एलआयसीच्या विविध कार्यालयांमध्ये शिपाई, हमाल, रखवालदार व पंप आॅपरेटर, लिफ्टमन, सफाई कामगार, झाडूवाले आणि सहायक टंकलेखक या पदांवर १९८५ नंतर अनेक वर्षे काम करीत होते. या कर्मचाºयांना नोकरीत कायम करण्याचा वाद औद्योगिक न्यायालयापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत तब्बल ३० वर्षे लढला गेला. कर्मचाºयांच्या बाजूने निकाल झाल्यावर, एलआयसी सर्वोच्च न्यायालयात गेली. तेथे अपील, रिव्ह्यू पीटिशन व क्युरेटिव्ह पीटिशन असे उपलब्ध कायदेशीर मार्ग स्वीकारूनही अपयश आल्याने, महामंडळास न्यायालयाचा आदेश न पाळण्यास आता कोणतीही सबब शिल्लक नाही.सर्वोच्च न्यायालयाचा शेवटचा आदेश गेल्या वर्षी ९ आॅगस्ट रोजी दिला गेला होता. त्यानुसार, एलआयसीने या कर्मचाºयांना सहा आठवड्यांत, मागील पगाराच्या फरकाची ५० टक्के रक्कम देऊन नोकरीत सामावून घ्यायचे होते. दरम्यानच्या काळात ज्यांचे निवृत्तीचे वय उलटून गेले असेल, ते कायम नोकरीत होते, असे मानून त्यांना पगाराच्या फरकाची ५० टक्के रक्कम व सर्व निवृत्तीचे लाभ द्यायचे होते.या आदेशास एक वर्ष उलटले, तरी एलआयसीने त्याचे पालन केलेले नाही. ‘इंटक’ प्रणीत ‘आॅल इंडिया नॅशनल लाइफ इन्श्युरन्स एम्प्लॉइज फेडरेशन’ने मध्यंतरी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाºयांची भेट घेऊन, निकालाची लगेच अंमलबजावणी करण्याची विनंती केली होती. त्याचा काही उपयोग झाला नाही, म्हणून फेडरेशनने ९ आॅगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयात कन्टेम्प्ट पीटिशन दाखल केले. गेल्या दोन महिन्यांत ते एकदाही सुनावणीस आले नाही. ३० वर्षे लढून मिळविलेला न्यायालयीन आदेशही सरकारी एलआयसी पाळत नसल्याने, हे कर्मचारी हतबल झाले आहेत.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय