शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेचा नवीन व्हिप नेमू शकतात का?, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2023 08:19 IST

बहुमत चाचणीच्या अगोदरच उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यानंतर नवे सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे हे सरकार बेकायदेशीर आहे असं म्हणता येत नाही असं कोर्टाने सांगितले आहे.

मुंबई - राज्यातील सत्तासंघर्षाबाबत अखेर १० महिन्यांनी सुप्रीम कोर्टाने निकाल सुनावला आहे. या निकालात कोर्टाने राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्ष यांच्यावर ताशेरे ओढले आहेत. भरत गोगावले यांची निवड बेकायदेशीर असल्याचे सांगत पक्षाचा व्हिप नेमण्याचा अधिकार विधिमंडळ पक्षाला नाही तर राजकीय पक्षालाच आहे असं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नव्याने व्हिप नेमू शकतात का? असा प्रश्न उभा राहिला आहे. 

यावर कायदेतज्ज्ञ असीम सरोदे म्हणाले की, निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांना शिवसेना, धनुष्यबाण चिन्ह दिले आहे. तो निर्णय तसाच आहे. त्याला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली नाही. त्यामुळे शिवसेना एकनाथ शिंदेंकडे आहे. त्यामुळे शिंदे पुन्हा नव्याने व्हिप नेमू शकत नाही. निवडणूक आयोगाने शिवसेना शिंदेंकडे दिली आहे. त्यावर सुप्रीम कोर्टात प्रकरण प्रलंबित आहे. कोर्टाने त्यावेळच्या परिस्थितीवरून भरत गोगावलेंची निवड बेकायदेशीर ठरवली आहे. मात्र आता राजकीय पक्ष एकनाथ शिंदेंकडे आहे. ते पुन्हा व्हिप नेमू शकतात. कायदेशीरदृष्ट्या एकनाथ शिंदेंना संरक्षण आहे असं त्यांनी म्हटलं. 

तसेच उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला नसता तर आजचे चित्र वेगळे असते. राज्यपालांनी बहुमत चाचणी अपुऱ्या माहितीवर बोलावली असं कोर्ट म्हणाले. परंतु बहुमत चाचणीच्या अगोदरच उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यानंतर नवे सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे हे सरकार बेकायदेशीर आहे असं म्हणता येत नाही. त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर एकनाथ शिंदे सरकारला नवसंजीवनी मिळाली आहे. उद्धव ठाकरेंचा राजीनामा प्रयोग चुकला आहे असंही कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांनी सांगितले. 

घटनापीठाने दिला एकमताने निर्णयसाऱ्या देशाचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील न्या. एम. आर. शहा, न्या. कृष्ण मुरारी, न्या. हिमा कोहली, न्या. पी. एस. नरसिंहा यांच्या घटनापीठाने एकमताने संतुलित निकाल दिला. मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह १६ आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांच्याकडे सोपविला. या सुनावणीत केंद्रस्थानी आलेले नबम रेबिया प्रकरण सात न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे सोपविण्यात आले आहे. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेSupreme Courtसर्वोच्च न्यायालय