शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेचा नवीन व्हिप नेमू शकतात का?, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2023 08:19 IST

बहुमत चाचणीच्या अगोदरच उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यानंतर नवे सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे हे सरकार बेकायदेशीर आहे असं म्हणता येत नाही असं कोर्टाने सांगितले आहे.

मुंबई - राज्यातील सत्तासंघर्षाबाबत अखेर १० महिन्यांनी सुप्रीम कोर्टाने निकाल सुनावला आहे. या निकालात कोर्टाने राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्ष यांच्यावर ताशेरे ओढले आहेत. भरत गोगावले यांची निवड बेकायदेशीर असल्याचे सांगत पक्षाचा व्हिप नेमण्याचा अधिकार विधिमंडळ पक्षाला नाही तर राजकीय पक्षालाच आहे असं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नव्याने व्हिप नेमू शकतात का? असा प्रश्न उभा राहिला आहे. 

यावर कायदेतज्ज्ञ असीम सरोदे म्हणाले की, निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांना शिवसेना, धनुष्यबाण चिन्ह दिले आहे. तो निर्णय तसाच आहे. त्याला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली नाही. त्यामुळे शिवसेना एकनाथ शिंदेंकडे आहे. त्यामुळे शिंदे पुन्हा नव्याने व्हिप नेमू शकत नाही. निवडणूक आयोगाने शिवसेना शिंदेंकडे दिली आहे. त्यावर सुप्रीम कोर्टात प्रकरण प्रलंबित आहे. कोर्टाने त्यावेळच्या परिस्थितीवरून भरत गोगावलेंची निवड बेकायदेशीर ठरवली आहे. मात्र आता राजकीय पक्ष एकनाथ शिंदेंकडे आहे. ते पुन्हा व्हिप नेमू शकतात. कायदेशीरदृष्ट्या एकनाथ शिंदेंना संरक्षण आहे असं त्यांनी म्हटलं. 

तसेच उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला नसता तर आजचे चित्र वेगळे असते. राज्यपालांनी बहुमत चाचणी अपुऱ्या माहितीवर बोलावली असं कोर्ट म्हणाले. परंतु बहुमत चाचणीच्या अगोदरच उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यानंतर नवे सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे हे सरकार बेकायदेशीर आहे असं म्हणता येत नाही. त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर एकनाथ शिंदे सरकारला नवसंजीवनी मिळाली आहे. उद्धव ठाकरेंचा राजीनामा प्रयोग चुकला आहे असंही कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांनी सांगितले. 

घटनापीठाने दिला एकमताने निर्णयसाऱ्या देशाचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील न्या. एम. आर. शहा, न्या. कृष्ण मुरारी, न्या. हिमा कोहली, न्या. पी. एस. नरसिंहा यांच्या घटनापीठाने एकमताने संतुलित निकाल दिला. मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह १६ आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांच्याकडे सोपविला. या सुनावणीत केंद्रस्थानी आलेले नबम रेबिया प्रकरण सात न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे सोपविण्यात आले आहे. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेSupreme Courtसर्वोच्च न्यायालय