शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत आधी लढाई, आता नरमाई; भाजप-शिंदेसेनेत आता होणार चर्चा
2
पुतिन यांच्या भारत भेटीने का खूश झाला आहे पाकिस्तानचा 'हा' शेजारी देश? काय फायदा होणार?
3
एसयूव्ही कार्स खरेदी करण्यासाठी सुवर्णकाळ! 'या' मॉडेल्सवर मिळतोय बंपर डिस्काउंट; एकीवर तर ३.२५ लाखांची सूट
4
काँग्रेस-भाजपा आणि डावे, निवडणुकीत कट्टर विरोधक आले एकत्र, या पक्षाविरोधात केली आघाडी   
5
धक्कादायक माहिती! गुजरातमधील मतदार याद्यांत १७ लाख मृतांची नावे
6
इंडिगोमुळे प्रवासी बेजार, थेट ठोठावलं सुप्रीम कोर्टाचं दार; CJI सूर्य कांत यांच्या घरी गेले याचिकाकर्ते! म्हणाले...
7
Suryakumar Yadav: सूर्यकुमार यादवचा मोठा पराक्रम, टी-२० क्रिकेटमध्ये मुंबईकडून खेळताना रचला इतिहास!
8
डॉ. बाबासाहेबांच्या हयातीतच कोल्हापूरकरांनी अर्धपुतळा उभारून दिली अनोखी मानवंदना!
9
Post Office ची जबरदस्त स्कीम, एकदा पैसे गुंतवा; नंतर व्याजाद्वारेच होईल ५ लाखांची कमाई, जाणून घ्या
10
इंडिगो नव्हे, इंडि-नो-गो! दिवसभरात १ हजार उड्डाणे, ३ दिवसांत २ हजारांपेक्षा जास्त विमानसेवा रद्द
11
देशात रस्ते अपघाताने घेतला १.७७ लाख जणांचा जीव, रस्ते परिवहन-महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची माहिती
12
सारा खान झाली मिसेस पाठक! क्रिशसोबत बांधली लग्नगाठ; सासरे सुनील लहरी गैरहजर?
13
Netflix-Warner Bros Deal: नेटफ्लिक्सनं वॉर्नर ब्रदर्सच्या खरेदीची केली घोषणा; पाहा किती कोटींना झाली ही धमाकेदार डील
14
लक्ष्य १०० अब्ज डॉलर व्यापाराचे! केवळ तेलविक्री नव्हे तर भारतातील वाहतूक व सेवेचा लाभ घेण्यास रशियन कंपन्या उत्सुक
15
मारायचं होतं एकीला, हत्या केली दुसऱ्याच शिक्षिकेची, धक्कादायक माहिती आली समोर  
16
RBI नं रेपो दरात कपात करताच 'या' दोन सरकारी बँकांनी कर्ज केली स्वस्त; पाहा काय आहेत नवे दर?
17
२० वर्षांचा ईएमआय १५ वर्षांत संपणार, घर-वाहन कर्ज झाले आणखी स्वस्त, ‘आरबीआय’कडून रेपो दरात कपात
18
IndiGo: विमानाला १२ तास विलंब, मदन लाल इंडिगोवर भडकले, विमानतळाला 'फिश मार्केट' म्हणाले!
19
इंडिगो विमान संकट, रेल्वेने मोर्चा सांभाळला, ३७ ट्रेनमध्ये वाढवले ११६ डबे, या दोन स्टेशनदरम्यान धावणार विशेष ट्रेन
20
आजचे राशीभविष्य, ०६ डिसेंबर २०२५: कुटुंबात मतभेदाचे प्रसंग उद्भवतील, नवीन कामात अपयशी होण्याची शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

Jetty: गेटवे ऑफ इंडियाजवळ जेट्टीस मंजुरी! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 13:07 IST

दक्षिण मुंबईतील गेटवे ऑफ इंडियाजवळ नवीन प्रवासी जेट्टी आणि टर्मिनल उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : दक्षिण मुंबईतील गेटवे ऑफ इंडियाजवळ नवीन प्रवासी जेट्टी आणि टर्मिनल उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी या प्रकल्पाविरोधात दाखल केलेली याचिका फेटाळली. महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाने प्रस्तावित केलेला हा २२९ कोटी रुपयांचा प्रकल्प बॉम्बे उच्च न्यायालयाने १५ जुलै रोजी मंजूर केला होता. त्याविरोधात लॉरा डी’सूझा यांनी दाखल केलेले अपील सरन्यायाधीश भूषण गवई व न्यायमूर्ती के. विनोद चंद्रन यांच्या खंडपीठाने फेटाळले. खंडपीठाने सांगितले की, हा विषय सरकारच्या धोरणात्मक निर्णयाशी संबंधित असून, न्यायालय त्यात हस्तक्षेप करू शकत नाही.

कुलाबा परिसरातील ताजमहाल पॅलेस हॉटेललगत राहणाऱ्यांच्या तक्रारींवरूनच हा प्रकल्प थांबवता येणार नाही, असे खंडपीठाने स्पष्ट केले. फक्त त्या भागातील काही लोकांच्या आक्षेपांवरून विकास थांबवणे योग्य नाही. ‘आमची मुंबई’ म्हणजे फक्त तोच भाग नव्हे, गोरेगाव, डोंबिवली येथील लोकही त्याचा भाग आहेत, असे सरन्यायाधीश गवई यांनी सुनावणीदरम्यान नमूद केले.

याचिकाकर्त्याचा आक्षेपयाचिकाकर्त्यांचे वकील वरिष्ठ अधिवक्ता सी. यू. सिंग यांनी वाहतुकीची कोंडी आणि स्थानिकांच्या गैरसोयींचा विचार न करता हा प्रकल्प राबवला जात असल्याचा आक्षेप घेतला. आणखी एका वकिलाने हा प्रकल्प प्रचंड प्रमाणात असून, परिसराच्या रचनेस सुसंगत नाही, असेही सांगितले.

राज्य सरकार म्हणते... राज्य सरकारतर्फे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी हा प्रकल्प संपूर्ण मुंबईच्या सोयीसाठी आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. काही स्थानिकांना गैरसोय होईल म्हणून थांबवता येत नाही. या सुविधेमुळे दक्षिण मुंबईहून नवी मुंबई, मांडवा आणि अलिबागकडे जाण्यास लागणारा वेळ कमी होईल, असे ते म्हणाले.

प्रकल्पाची वैशिष्ट्ये गेटवे ऑफ इंडियाजवळ नवीन प्रवासी जेट्टी आणि टर्मिनल १.५ एकर समुद्र क्षेत्रावर उभारला जात असून, गेटवे ऑफ इंडियापासून २८० मीटर अंतरावर असेल. प्रकल्पात १५० वाहनांच्या पार्किंगची सोय, व्हीआयपी प्रतीक्षालय, तिकीट काउंटर, प्रशासकीय कार्यालये व समुद्रात खांबांवर उभारण्यात येणारी टेनिस रॅकेटसारखी जेटी यांचा समावेश आहे. 

उच्च न्यायालयाने गेटवे ऑफ इंडियाजवळ नवीन प्रवासी जेट्टी आणि टर्मिनल उभारण्याच्या प्रकल्पास मान्यता देताना काही अटी घातल्या होत्या. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर भारतीय नौदलाच्या सूचनेनुसार सध्या सार्वजनिक वापरातील चार जेटी टप्प्याटप्प्याने बंद करण्यात येतील. या जेट्यांमधून दरवर्षी ३५ लाख प्रवासी प्रवास करतात आणि सध्याची सुविधा अपुरी आहे. 

टॅग्स :water transportजलवाहतूक