शहरं
Join us  
Trending Stories
1
आयोगाच्या आदेशाआधीच नगरपालिकांसाठी तयारी; राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी, निवडणुकांची चाचपणी
2
आजचे राशीभविष्य : बुधवार २२ ऑक्टोबर २०२५; अचानक धनलाभ संभवतो, व्यापारी वर्गाचे गुंतलेले पैसे मिळतील
3
PM मोदींचा स्वदेशी नारा; जनतेला पत्र; ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ बुलंद करण्यासाठी प्रयत्न करा
4
बाधित क्षेत्र ३ हेक्टर मानून मदत; राज्य सरकारचा निर्णय, पूरग्रस्त शेतकऱ्यांना होणार लाभ
5
अपात्र लाडक्या बहिणींनी उकळले १६४ कोटी रुपये, १२ हजारांवर पुरूष तर अपात्र महिला ७७ हजार
6
मुंबई, नवी मुंबई, ठाण्यात ऐन दिवाळीत पावसाचा बार; पुढील तीन दिवस असेच वातावरण राहणार
7
उमेदवार जाहीर होताच महाआघाडीतील दरी स्पष्ट; राजद, काँग्रेस, डाव्या पक्षांनी केले दुहेरी अर्ज
8
बिहार निवडणूक २०२५: १२१ मतदारसंघांत एकूण १,३१४ उमेदवार; महिला मतदारांच्या आधारे ‘जदयु’ बळकट
9
“महाआघाडीला नव्हे, भाजप जनसुराजला घाबरतेय; आमचे उमेदवार फोडतेय”; प्रशांत किशोर यांचा आरोप
10
...तर H1B व्हिसाधारकांना वाढीव शुल्क लागणार नाही; पण वाढ कायम; ट्रम्प प्रशासनाकडून स्पष्टता
11
७ दिवसांत ३३ हजारांनी घसरला दर; लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर ८ हजारांनी गडगडली चांदी!
12
सर्व न्यायालयांमधील ‘सू’ व्यवस्था दयनीय; देशातील सर्व हायकोर्टांचा अहवाल सुप्रीम कोर्टात सादर
13
विभक्त पती, आईला फ्लॅटमध्ये राहण्यास हायकोर्टाची परवानगी; नेमके प्रकरण काय?
14
नवी मुंबई-पनवेलमध्ये आगीत ६ जणांचा मृत्यू; ठाण्यात एकाच दिवशी आगीच्या सहा घटना
15
झोपेत बायकोने नवऱ्याच्या अंगावर टाकलं उकळतं पाणी; जीव वाचवण्यासाठी पळताच अ‍ॅसिड टाकून जाळले
16
स्टीलच्या ग्लासात सुतळी बॉम्ब ठेवून फोडला; २० वर्षीय युवक जीवाला मुकला, कुठे घडला भयानक प्रकार?
17
WI vs BAN Super Over : ९ चेंडूंची सुपर ओव्हर! ३ फुकटच्या धावा; तरी वेस्ट इंडिजसमोर बांगलादेशची फजिती
18
भाजपा मंत्र्यांच्या समर्थकांची गुंडगिरी; युवकाला नाक घासून माफी मागायला लावली, पोलिसही हतबल
19
Womens World Cup : लाजिरवाण्या पराभवासह पाक संघ OUT; सेमीसह फायनल भारतात खेळवण्याचा मार्ग मोकळा!
20
सुवर्णाची झळाळी, शिर्डीत लक्ष्मीपूजनाचा सोहळा; साईमंदिरात दिवाळी, साई मूर्तीवर अडीच कोटींचे अलंकार

Jetty: गेटवे ऑफ इंडियाजवळ जेट्टीस मंजुरी! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 13:07 IST

दक्षिण मुंबईतील गेटवे ऑफ इंडियाजवळ नवीन प्रवासी जेट्टी आणि टर्मिनल उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : दक्षिण मुंबईतील गेटवे ऑफ इंडियाजवळ नवीन प्रवासी जेट्टी आणि टर्मिनल उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी या प्रकल्पाविरोधात दाखल केलेली याचिका फेटाळली. महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाने प्रस्तावित केलेला हा २२९ कोटी रुपयांचा प्रकल्प बॉम्बे उच्च न्यायालयाने १५ जुलै रोजी मंजूर केला होता. त्याविरोधात लॉरा डी’सूझा यांनी दाखल केलेले अपील सरन्यायाधीश भूषण गवई व न्यायमूर्ती के. विनोद चंद्रन यांच्या खंडपीठाने फेटाळले. खंडपीठाने सांगितले की, हा विषय सरकारच्या धोरणात्मक निर्णयाशी संबंधित असून, न्यायालय त्यात हस्तक्षेप करू शकत नाही.

कुलाबा परिसरातील ताजमहाल पॅलेस हॉटेललगत राहणाऱ्यांच्या तक्रारींवरूनच हा प्रकल्प थांबवता येणार नाही, असे खंडपीठाने स्पष्ट केले. फक्त त्या भागातील काही लोकांच्या आक्षेपांवरून विकास थांबवणे योग्य नाही. ‘आमची मुंबई’ म्हणजे फक्त तोच भाग नव्हे, गोरेगाव, डोंबिवली येथील लोकही त्याचा भाग आहेत, असे सरन्यायाधीश गवई यांनी सुनावणीदरम्यान नमूद केले.

याचिकाकर्त्याचा आक्षेपयाचिकाकर्त्यांचे वकील वरिष्ठ अधिवक्ता सी. यू. सिंग यांनी वाहतुकीची कोंडी आणि स्थानिकांच्या गैरसोयींचा विचार न करता हा प्रकल्प राबवला जात असल्याचा आक्षेप घेतला. आणखी एका वकिलाने हा प्रकल्प प्रचंड प्रमाणात असून, परिसराच्या रचनेस सुसंगत नाही, असेही सांगितले.

राज्य सरकार म्हणते... राज्य सरकारतर्फे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी हा प्रकल्प संपूर्ण मुंबईच्या सोयीसाठी आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. काही स्थानिकांना गैरसोय होईल म्हणून थांबवता येत नाही. या सुविधेमुळे दक्षिण मुंबईहून नवी मुंबई, मांडवा आणि अलिबागकडे जाण्यास लागणारा वेळ कमी होईल, असे ते म्हणाले.

प्रकल्पाची वैशिष्ट्ये गेटवे ऑफ इंडियाजवळ नवीन प्रवासी जेट्टी आणि टर्मिनल १.५ एकर समुद्र क्षेत्रावर उभारला जात असून, गेटवे ऑफ इंडियापासून २८० मीटर अंतरावर असेल. प्रकल्पात १५० वाहनांच्या पार्किंगची सोय, व्हीआयपी प्रतीक्षालय, तिकीट काउंटर, प्रशासकीय कार्यालये व समुद्रात खांबांवर उभारण्यात येणारी टेनिस रॅकेटसारखी जेटी यांचा समावेश आहे. 

उच्च न्यायालयाने गेटवे ऑफ इंडियाजवळ नवीन प्रवासी जेट्टी आणि टर्मिनल उभारण्याच्या प्रकल्पास मान्यता देताना काही अटी घातल्या होत्या. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर भारतीय नौदलाच्या सूचनेनुसार सध्या सार्वजनिक वापरातील चार जेटी टप्प्याटप्प्याने बंद करण्यात येतील. या जेट्यांमधून दरवर्षी ३५ लाख प्रवासी प्रवास करतात आणि सध्याची सुविधा अपुरी आहे. 

टॅग्स :water transportजलवाहतूक