शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
3
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
4
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
5
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
6
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
7
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
8
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
9
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
10
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
11
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
12
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
13
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
14
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
15
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
16
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
17
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
18
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
19
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
20
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Political Crisis : सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय राजकारणाला दिशा देणारा आणि ऐतिहासिक निर्णय : राहुल शेवाळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2023 15:05 IST

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात आज निकाल जाहीर करण्यात आला. दरम्यान, तुर्तास तरी राज्य सरकारला धोका नसल्याचं स्पष्ट झालंय.

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात आज निकाल जाहीर करण्यात आला. त्यामध्ये, शिंदे गट, भाजप आणि राज्यपालांना न्यायालयाने फटकारले. शिंदे गटाने प्रतोदपदी केलेली भरत गोगावलेंची नेमणूक बेकायदेशीर असल्याचंही न्यायालयानं म्हटलं. तर, १६ आमदारांच्या नियुक्तीचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. मात्र, शिंदे सरकार तरलं असून सध्यातरी राज्य सरकारला कुठलाही धोका नाही. यासंदर्भात न्यायालयाने महत्त्वाची टिपण्णी केली आहे. दरम्यान, न्यायालयाचा निकाल हा राजकारणाला दिशा देणारा आणि ऐतिहासिक असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी दिली. पत्रकारांशी साधलेल्या संवादादरम्यान त्यांनी यावर भाष्य केलं.

“सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं मी स्वागत करतो. हा एक ऐतिहासिक आणि भारतीय राजकारणाला दिशा देणारा निर्णय आहे. अपात्रतेच्या संदर्भात आणि व्हिपसंदर्भातही निर्णय आता अध्यक्षांकडे असेल. राजकीय पक्षाचे अधिकार निवडणूक आयोगानं एकनाथ शिंदे यांच्याकडे दिले आहे. त्यामुळे तोही मुद्दा आता मार्गी लागलाय. निवडणूक आयोगाची प्रक्रियेवरही न्यायालयानं जी टिपण्णी केली त्यावर नंतर स्पष्टता येईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेच राजकीय पक्षाचे सर्व अधिकार आहेत. एकनाथ शिंदे यांनी नियुक्त केलेले व्हिप आता भरत गोगावले आहेत. त्याचा निर्णय आता अध्यक्ष घेतील,” असं शेवाळे यांनी स्पष्ट केलं. 

राज्यपालांच्या भूमिकेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं टिपण्णी केली आहे. सरकारला आता कोणताही धोका नाही. यासंदर्भात आता अध्यक्ष निर्णय घेतील, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

नबाम रेबिया प्रकरण मोठ्या घटनापीठाकडे

शिंदे गटाने नियुक्त केलेल्या भरत गोगावले यांची नियुक्ती ही बेकायदेशीर असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय. तसंच सर्वोच्च न्यायालयानं नबाम रेबिया प्रकरण मोठ्या घटनापीठाकडे वर्ग केलंय. तर अध्यक्षांच्या अधिकारांचं प्रकरणही ७ सदस्यीय घटनापीठाकडे पाठवलं आहे. सर्वोच्च न्यायालयानं राज्यपालांवर ताशेरे ओढले असून, त्यांना बहुमत चाचणी बोलावण्याची गरज नसल्याचंही सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं. पक्षांतर्गत वाद मिटवण्यासाठी बहुमत चाचणीचा वापर करता येता कामा नये, असंही निरीक्षण यावेळी नोंदवण्यात आलं.

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्षShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदे