शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

माजी सैनिकाला भूखंड द्या, उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 04:26 IST

१९७१च्या भारत-पाक युद्धात गंभीररीत्या जखमी झालेल्या सातारा येथील माजी सैनिकाला सरकारच्या धोरणाप्रमाणे भूखंड द्या

मुंबई : १९७१च्या भारत-पाक युद्धात गंभीररीत्या जखमी झालेल्या सातारा येथील माजी सैनिकाला सरकारच्या धोरणाप्रमाणे भूखंड द्या, असा आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला मंगळवारी दिला, तसेच त्यांना सरकारचे सर्व लाभही देण्याचे निर्देश न्यायालयाने सरकारला दिले.न्या. अभय ओक व न्या. रियाझ छागला यांनी राज्य सरकारला या प्रकरणी ५० हजारांचा दंड ठोठावत ही रक्कम याचिकाकर्ते हिंदुराव जगन्नाथ यांना देण्याचे निर्देश दिले. सरकारकडून जे लाभ मिळायला हवेत, ते मिळविण्यासाठी याचिकाकर्त्यांना धावपळ करावी लागली. एक सैनिक राज्य सरकारच्या उदासीन कारभाराला बळी पडला, हे दुर्दैव आहे, असे म्हणत न्यायालयाने याचिकाकर्त्यांना राज्य सरकारच्या धोरणानुसार सर्व लाभ देण्याचे निर्देश सरकारला दिले.याचिकाकर्ते ‘२१६ मीडियम रेजिमेंट’मध्ये ड्रायव्हर म्हणून काम करीत होते. १९७१च्या युद्धात त्यांच्या पायाला बंदुकीची गोळी लागून हाडाचा संसर्ग झाला. १९७५मध्ये ते निवृत्त झाले तोपर्यंत त्यांना कायमचे अपंगत्व आले. सेवा निवृत्तीनंतर त्यांनी राज्य सरकारच्या ३० डिसेंबर १९७१च्या अधिसूचनेनुसार सर्व लाभ मिळावेत, यासाठी केंद्र व राज्य सरकारशी अनेकदा पत्रव्यवहार केला. मात्र, त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही.

टॅग्स :Mumbai High Courtमुंबई हायकोर्टMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार