शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

माजी सैनिकाला भूखंड द्या, उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 04:26 IST

१९७१च्या भारत-पाक युद्धात गंभीररीत्या जखमी झालेल्या सातारा येथील माजी सैनिकाला सरकारच्या धोरणाप्रमाणे भूखंड द्या

मुंबई : १९७१च्या भारत-पाक युद्धात गंभीररीत्या जखमी झालेल्या सातारा येथील माजी सैनिकाला सरकारच्या धोरणाप्रमाणे भूखंड द्या, असा आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला मंगळवारी दिला, तसेच त्यांना सरकारचे सर्व लाभही देण्याचे निर्देश न्यायालयाने सरकारला दिले.न्या. अभय ओक व न्या. रियाझ छागला यांनी राज्य सरकारला या प्रकरणी ५० हजारांचा दंड ठोठावत ही रक्कम याचिकाकर्ते हिंदुराव जगन्नाथ यांना देण्याचे निर्देश दिले. सरकारकडून जे लाभ मिळायला हवेत, ते मिळविण्यासाठी याचिकाकर्त्यांना धावपळ करावी लागली. एक सैनिक राज्य सरकारच्या उदासीन कारभाराला बळी पडला, हे दुर्दैव आहे, असे म्हणत न्यायालयाने याचिकाकर्त्यांना राज्य सरकारच्या धोरणानुसार सर्व लाभ देण्याचे निर्देश सरकारला दिले.याचिकाकर्ते ‘२१६ मीडियम रेजिमेंट’मध्ये ड्रायव्हर म्हणून काम करीत होते. १९७१च्या युद्धात त्यांच्या पायाला बंदुकीची गोळी लागून हाडाचा संसर्ग झाला. १९७५मध्ये ते निवृत्त झाले तोपर्यंत त्यांना कायमचे अपंगत्व आले. सेवा निवृत्तीनंतर त्यांनी राज्य सरकारच्या ३० डिसेंबर १९७१च्या अधिसूचनेनुसार सर्व लाभ मिळावेत, यासाठी केंद्र व राज्य सरकारशी अनेकदा पत्रव्यवहार केला. मात्र, त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही.

टॅग्स :Mumbai High Courtमुंबई हायकोर्टMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार