शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

भंडारा-गोंदियाची पोटनिवडणूक रोखण्यास सुप्रीम कोर्टाचाही नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 04:22 IST

भंडारा-गोंदिया पोटनिवडणुकीत निवडून येणाऱ्या नव्या लोकसभा सदस्यास पुरता एक वर्षाचाही कालावधी मिळणार नसल्याने ही पोटनिवडणूक घेतली जाऊ नये ही मागणी सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी अमान्य केली. लोकसभेची जागा रिक्त झाल्यानंतर ती सहा महिन्यांत भरणे निवडणूक आयोगावर कायद्याने बंधनकारक असल्याने ही पोटनिवडणूक थांबविली जाऊ शकत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

- विशेष प्रतिनिधीमुंबई : भंडारा-गोंदिया पोटनिवडणुकीत निवडून येणाऱ्या नव्या लोकसभा सदस्यास पुरता एक वर्षाचाही कालावधी मिळणार नसल्याने ही पोटनिवडणूक घेतली जाऊ नये ही मागणी सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी अमान्य केली. लोकसभेची जागा रिक्त झाल्यानंतर ती सहा महिन्यांत भरणे निवडणूक आयोगावर कायद्याने बंधनकारक असल्याने ही पोटनिवडणूक थांबविली जाऊ शकत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.लोहिया वॉर्ड,े गोंदिया येथील एक शेतकरी प्रमोद लक्ष्मण गुडधे यांनी ही निवडणूक घेतली जाऊ नये यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका केली होती. ती ११ एप्रिल रोजी फेटाळली गेली. त्याविरुद्ध गुडधे यांनी सर्वोच्च न्यायालयात केलेली विशेष अनुमती याचिका (एसएलपी) सरन्यायाधीश न्या. दिपक मिस्रा , न्या. अजय खानविलकर व न्या. डॉ. धनंजय च्ंद्रचूड यांच्या खंडपीठाने फेटाळली.गेल्या निवडणुकीत या मतदारसंघातून निवडून आलेले भाजपाचे खासदार नाना पटोले यांनी राजीनामा दिल्याने ही पोटनिवडणूक होत असून त्याचे मतदान २८ मे रोजी व्हायचे आहे.पोटनिवडणूक न घेण्यासंबंधी गुडधे यांच्यावतीने ज्येष्ठ वकील विकास सिंग व अ‍ॅड. अनघा देसाई यांनी केलेला युक्तिवाद थोडक्यात असा होता. सन २००१४ मध्ये निवडणूक मेमध्ये झाली पण आचारसंहिता मार्चपासून लागू झाली होती. आताही मेमध्ये पोटनिवडणूक घेतली तर निवडून येणाºया खासदारास पुरता एक वर्षाचा कालावधीही मिळणार नाही, लोकसभेची निवडणूक जून २०१९ किंवा त्याआधीही होईल.त्यांचे असेही म्हणणे होते की, गेल्या निवडणुकीत १४ कोटी रुपयांचा खर्च झाला होता. आताही जेमतेम तेवढाच खर्च येईल. पोटनिवडणुकीत निवडून येणाºया खासदारास खासदार निधीचे पाच कोटी रुपये लोककल्याणाच्या कामांवर खर्च करणे शक्यही होणार नाही.खंडपीठाने म्हटले की, लोकप्रतिनिधित्व कायद्याच्या कलम १५१ (ए) अन्वये रिकाम्या जागेची सहा महिन्यांत निवडणूक घेणे निवडणूक आयोगावर बंधनकारक आहे. पटोले यांनी गेल्या ८ डिसेंबर रोजी राजीनामा दिला व लोकसभा अध्यक्षांनी तो १४ डिसेंबर रोजी स्वीकराला. म्हणजेच ही जागा त्या दिवशी रिकामी झाली व तेव्हापासून सहा महिन्यांत ती भरणे बंधनकारक आहे. न्यायालयाने म्हटले की, पोटनिवडणुकीत निवडून येणाºया सदस्यास एक वर्षाहून कमी कालावधी मिळणार असेल तर सहा महिन्यांत पोटनिवडणूक न घेण्याची मुभा आहे. परंतु प्रस्तूत प्रकरणात निवडून येणाºया सदस्यास एक वर्षाचा कालावधी मिळणार आहे कारण सध्याच्या लोकसभेची मुदत १४ जूनपर्यंत आहे. निवडणुकीच्या आधी आचारसंहिता लागू होणे किंवा निवडणुकीवर होणारा खर्च वायफळ ठरणे हे मुद्दे गैरलागू आहेत.असा झाला याचिकेचा प्रवासच्२६ फेब्रुवारी: गुडधे यांची नागपूर खंडपीठात याचिका.च्२३ मार्च: पोटनिवडणूक जाहीर करण्यास हायकोर्टाची अंतरिम मनाई.च्११ एप्रिल: उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्याने मनाईसुद्धा उठली.च्१६ एप्रिल: सर्वोच्च न्यायालयात ‘एसएलपी’ दाखल.च्२३ एप्रिल: सर्वोच्च न्यायालयाचा निकाल राखीव.च्२३ एप्रिल: निकालाची वाट न पाहता निवडणूक आयोगाकडून पोटनिवडणूक जाहीरच्०९ मे: एलएलपी फेटाळली.

टॅग्स :ElectionनिवडणूकSupreme Courtसर्वोच्च न्यायालयMaharashtraमहाराष्ट्र