शहरं
Join us  
Trending Stories
1
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
2
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
3
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
4
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
5
छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर गोळीबार, कर्मचाऱ्याच्या पोटात लागली गोळी
6
Radhika Yadav : राधिकाला मारण्यापूर्वी स्वत:लाच संपवणार होते वडील; टेनिसपटूच्या हत्या प्रकरणात पुन्हा नवा ट्विस्ट
7
अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, घडलं काय?
8
पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी जामीन मिळवला अन् बाहेर येताच फरार झाला सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील आरोपी!  
9
चातुर्मासातील पहिले पंचक रविवारपासून, अजिबात करू नका ‘ही’ कामे; ५ दिवस ठरणार अत्यंत अशुभ?
10
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?
11
Electric Car: एका चार्जवर ३ देश फिरले, 'या' इलेक्ट्रिक कारची गिनीज बूकमध्ये नोंद होणार!
12
Plane Crash: पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर
13
"सैफ रुग्णालयात असताना करीना कपूरच्या कारवरही हल्ला झाला", रोनित रॉयचा धक्कादायक खुलासा
14
Tarot Card: या सप्ताहात परिस्थितीचा करा स्वीकार, भावनेत न गुंतता करा सारासार विचार!
15
Air India Plane Crash: टेकऑफ ते क्रॅश होईपर्यंत 'त्या' ९८ सेकंदात काय झालं?; AAIB चा रिपोर्ट, धक्कादायक खुलासे
16
अमृता सुभाषची झाली फसवणूक? ठळक अक्षरात लिहिलं CHEATED; "ह्याबद्दल बोलूच पण..."
17
अन्न-पाणीही मिळेना, लोकांची होतेय तडफड! गाझामध्ये मदत केंद्राजवळच ७९८ लोकांचा मृत्यू
18
चातुर्मासातील पहिली संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय वेळ काय? बाप्पा होईल प्रसन्न, ‘असे’ करा पूजन
19
Maharashtra Co-op Bank case: आमदार रोहित पवार यांच्याविरोधात ईडीने दाखल केले पुरवणी आरोपपत्र
20
Radhika Yadav : "इथे खूप बंधनं, मला जीवनाचा आनंद घ्यायचाय..."; राधिकाचं कोचसोबतचं WhatsApp चॅट समोर

कोरोना मृतांच्या कुटुंबीयांना भरपाई का दिली नाही ? सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्रासह अनेक राज्यांना फटकारले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2021 20:10 IST

महाराष्ट्रात 1 लाखाहून अधिक मृत्यू, 37 हजार जणांची ऑनलाइन नोंदणी पण एकाही व्यक्तीला नुकसान भरपाई नाही.

नवी दिल्ली: कोरोना काळात लाखो रुग्णांचा मृत्यू झाला. अनेकदा या कोरोना मृतांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली जाते. यातच आता कोरोना मृतांच्या कुटुंबीयांना भरपाई न दिल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे. तसेच, कोर्टाने महाराष्ट्र, राजस्थान, पश्चिम बंगालसह अनेक राज्यांना फटकारले आहे.

महाराष्ट्र सरकारला फटकारलेसुप्रीम कोर्टाने राज्य सरकारांना कोविड मृतांच्या कुटुंबीयांना 50,000 रुपये नुकसान भरपाई न देण्याबाबत मानवी भूमिका घेण्यास सांगितले आहे. महाराष्ट्रातील एकाही व्यक्तीला आतापर्यंत नुकसान भरपाई देण्यात आलेली नाही, हे हास्यास्पद आहे. महाराष्ट्र सरकारने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रावर आम्ही अजिबात खूश नाही, असे कोर्टाने म्हटले.

कोरोना मृतांच्या माहितीसाठी ऑनलाइन पोर्टल सुरू करण्यात आले आहे. याबाबत बोलताना न्यायालयाने म्हटले की, महाराष्ट्रात 1 लाखाहून अधिक मृत्यू झाले आणि 37 हजार जणांनी ऑनलाइन नोंदणी केल्या. पण, आजपर्यंत एकाही व्यक्तीला नुकसान भरपाई मिळालेली नाही. यानंतर महाराष्ट्र सरकारचे वकील सचिन पाटील यांनी लवकरच याबाबत प्रतिज्ञापत्र दाखल करणार असल्याची माहिती दिली. इतर राज्यांमधील परिस्थिती

पश्चिम बंगालमध्ये 19,000 हून अधिक मृत्यू झाले आहेत, परंतु 467 अर्ज प्राप्त झाले आहेत. तर, आतापर्यंत 110 जणांना नुकसान भरपाई दिली आहे. राजस्थानमध्ये जवळपास 9,000 मृत्यू, परंतु आतापर्यंत केवळ 595 अर्ज आले आणि आतापर्यंत कोणालाही नुकसान भरपाई मिळालेली नाही. उत्तर प्रदेशात 22 हजार लोकांचा मृत्यू झाले, 16518 अर्ज प्राप्त झाले आणि 9,372 जणांना भरपाई मिळाली आहे.

या प्रकरणाची पुढील सुनावणी 10 डिसेंबरला होणार आहे

सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची पुढील सुनावणी 10 डिसेंबर रोजी होणार आहे. गेल्या महिन्यातच केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला दोन आठवड्यांत ऑनलाइन पोर्टल तयार करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. याद्वारे कोविड-19 मुळे जीव गमावलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांकडून नुकसानभरपाईचा दावा केला जाऊ शकतो. सुप्रीम कोर्टाने सांगितले की, कोरोनाव्हायरस साथीच्या आजारामुळे अनेक लोक आहेत ज्यांनी आपले नातेवाईक गमावले आहेत. या लोकांना अजूनही नुकसान भरपाई योजनेची माहिती नाही. अशा परिस्थितीत सरकारने व्यापक प्रसिद्धी करायला हवी.

राज्य सरकार कुटुंबांना 50,000 रुपयांची भरपाई देणार आहे

सप्टेंबरमध्ये केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात सांगितले की, कोविडमुळे मृत्यू झालेल्या कुटुंबांना राज्य सरकारे 50,000 रुपयांची भरपाई देतील. भविष्यात यात बळी पडलेल्या लोकांसह आत्तापर्यंत जीव गमावलेल्या लोकांना ही भरपाई दिली जाईल, असेही न्यायालयाला सांगण्यात आले. केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयासमोर प्रतिज्ञापत्र दाखल करून हे पैसे राज्य सरकारे देणार असल्याचे सांगितले होते. यासाठी राज्ये त्यांच्या संबंधित आपत्ती प्रतिसाद निधी वापरू शकतात. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSupreme Courtसर्वोच्च न्यायालय