शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
2
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
3
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
4
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
5
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
6
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
7
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
8
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
10
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
11
Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
12
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
13
धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० जणांचा मृत्यू
14
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
15
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
16
Jawhar Nagar Parishad Election Result 2025: जव्हार नगरपरिषदेवर भाजपचा भगवा, १४ जागांवर उधळला गुलाल, पूजा उदावंत नगरध्यक्ष; शिंदे सेनेला फक्त एवढ्या जागा
17
बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई?
18
Newasa Nagar Panchayat Elections Results 2025 : नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर शंकरराव गडाखांचा दबदबा कायम
19
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
20
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना मृतांच्या कुटुंबीयांना भरपाई का दिली नाही ? सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्रासह अनेक राज्यांना फटकारले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2021 20:10 IST

महाराष्ट्रात 1 लाखाहून अधिक मृत्यू, 37 हजार जणांची ऑनलाइन नोंदणी पण एकाही व्यक्तीला नुकसान भरपाई नाही.

नवी दिल्ली: कोरोना काळात लाखो रुग्णांचा मृत्यू झाला. अनेकदा या कोरोना मृतांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली जाते. यातच आता कोरोना मृतांच्या कुटुंबीयांना भरपाई न दिल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे. तसेच, कोर्टाने महाराष्ट्र, राजस्थान, पश्चिम बंगालसह अनेक राज्यांना फटकारले आहे.

महाराष्ट्र सरकारला फटकारलेसुप्रीम कोर्टाने राज्य सरकारांना कोविड मृतांच्या कुटुंबीयांना 50,000 रुपये नुकसान भरपाई न देण्याबाबत मानवी भूमिका घेण्यास सांगितले आहे. महाराष्ट्रातील एकाही व्यक्तीला आतापर्यंत नुकसान भरपाई देण्यात आलेली नाही, हे हास्यास्पद आहे. महाराष्ट्र सरकारने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रावर आम्ही अजिबात खूश नाही, असे कोर्टाने म्हटले.

कोरोना मृतांच्या माहितीसाठी ऑनलाइन पोर्टल सुरू करण्यात आले आहे. याबाबत बोलताना न्यायालयाने म्हटले की, महाराष्ट्रात 1 लाखाहून अधिक मृत्यू झाले आणि 37 हजार जणांनी ऑनलाइन नोंदणी केल्या. पण, आजपर्यंत एकाही व्यक्तीला नुकसान भरपाई मिळालेली नाही. यानंतर महाराष्ट्र सरकारचे वकील सचिन पाटील यांनी लवकरच याबाबत प्रतिज्ञापत्र दाखल करणार असल्याची माहिती दिली. इतर राज्यांमधील परिस्थिती

पश्चिम बंगालमध्ये 19,000 हून अधिक मृत्यू झाले आहेत, परंतु 467 अर्ज प्राप्त झाले आहेत. तर, आतापर्यंत 110 जणांना नुकसान भरपाई दिली आहे. राजस्थानमध्ये जवळपास 9,000 मृत्यू, परंतु आतापर्यंत केवळ 595 अर्ज आले आणि आतापर्यंत कोणालाही नुकसान भरपाई मिळालेली नाही. उत्तर प्रदेशात 22 हजार लोकांचा मृत्यू झाले, 16518 अर्ज प्राप्त झाले आणि 9,372 जणांना भरपाई मिळाली आहे.

या प्रकरणाची पुढील सुनावणी 10 डिसेंबरला होणार आहे

सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची पुढील सुनावणी 10 डिसेंबर रोजी होणार आहे. गेल्या महिन्यातच केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला दोन आठवड्यांत ऑनलाइन पोर्टल तयार करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. याद्वारे कोविड-19 मुळे जीव गमावलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांकडून नुकसानभरपाईचा दावा केला जाऊ शकतो. सुप्रीम कोर्टाने सांगितले की, कोरोनाव्हायरस साथीच्या आजारामुळे अनेक लोक आहेत ज्यांनी आपले नातेवाईक गमावले आहेत. या लोकांना अजूनही नुकसान भरपाई योजनेची माहिती नाही. अशा परिस्थितीत सरकारने व्यापक प्रसिद्धी करायला हवी.

राज्य सरकार कुटुंबांना 50,000 रुपयांची भरपाई देणार आहे

सप्टेंबरमध्ये केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात सांगितले की, कोविडमुळे मृत्यू झालेल्या कुटुंबांना राज्य सरकारे 50,000 रुपयांची भरपाई देतील. भविष्यात यात बळी पडलेल्या लोकांसह आत्तापर्यंत जीव गमावलेल्या लोकांना ही भरपाई दिली जाईल, असेही न्यायालयाला सांगण्यात आले. केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयासमोर प्रतिज्ञापत्र दाखल करून हे पैसे राज्य सरकारे देणार असल्याचे सांगितले होते. यासाठी राज्ये त्यांच्या संबंधित आपत्ती प्रतिसाद निधी वापरू शकतात. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSupreme Courtसर्वोच्च न्यायालय