शहरं
Join us  
Trending Stories
1
"कोण बसवणार आहे मला? काय बोलताय"; 'वंदे मातरम्'वर बोलत असताना राजनाथ सिंह प्रचंड भडकले
2
'क्वीन इज बॅक'..! कणखर मानसिकतेची 'रन'रागिणी! स्मृती मानधना पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत
3
“मंत्री येणार म्हणून फक्त देखावा नको, ३६५ दिवस प्रवाशांना सेवा द्या”: मंत्री प्रताप सरनाईक
4
लग्न करताच 'या' कपलला मिळतात 2.5 लाख रुपये, 90% लोकांना ही योजनाच माहीत नाही!
5
VIDEO: नववधूला सरप्राईज! शेजारी बसलेला नवरदेव अचानक उठला अन् सुरु केला भन्नाट डान्स
6
भाजपाच्या मित्रपक्षातील नेत्याचे बाबरी मशि‍दीला समर्थन; म्हणाले, “मुस्लीम समजाला अधिकार...”
7
"जेवढ्या दिवसांपासून मोदी PM आहेत, जवळपास तेवढे दिवस नेहरू जेलमध्ये होते"; 'वंदे मातरम'वरील चर्चेदरम्यान प्रियांका गांधींचा निशाणा
8
निवृत्तीसाठी कोणता फंड सर्वोत्तम? EPF, PPF की NPS? कोणासाठी कोणती योजना चांगली? वाचा तज्ज्ञांचा सल्ला
9
क्रिकेट चाहत्यांना धक्का! पुढील वर्षीचा टी२० वर्ल्ड कप मोबाईलवर दिसणार नाही? जिओस्टारने घेतली माघार
10
२०२५ च्या शेवटी भारतीय गुगलवर का सर्च करताहेत ५२०१३१४? अर्थ समजल्यावर तुम्हीही व्हाल हैराण
11
"उदय सामंतांसारखे खुर्ची पाहून पळून जाणारे ते नाहीत"; अंबादास दानवेंकडून भास्कर जाधवांची पाठराखण
12
'वंदे मातरम्'वर चर्चेची गरजच काय? बंगालचा उल्लेख करत प्रियंका गांधींचा सरकार हल्लाबोल...
13
तपोवन वृक्षतोड प्रकरणी सयाजी शिंदे यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट; बैठकीत काय चर्चा झाली?
14
"परीक्षेच्या चार दिवस आधी…" T20 वर्ल्ड कप तयारीच्या प्रश्नावर सूर्यानं दिला थेट शाळेचा दाखला
15
आदित्य ठाकरेंना विरोधी पक्षनेतेपद दिलं तर काय करणार? भास्कर जाधव यांचं मोठं विधान, म्हणाले...
16
'सध्यातरी' शब्दात अडकले वडेट्टीवार; मग म्हणाले, "मुद्दाम बोललो..., जेलमध्ये जाईन, पण भाजपमध्ये जाणार नाही...!" नेमकं काय घडलं?
17
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! ८वा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारने लोकसभेत दिली 'डेटलाइन'
18
करून दाखवलं! हात गमावले पण 'तो' खचला नाही; पायांनी रचला इतिहास, ११ गोल्डसह १८ मेडल्स
19
ऑस्ट्रेलियन तरुणीवर सपासप वार, वाळूत अर्ध्यापर्यंत पुरलं, भारतात पळून आला; पण अखेर सापडलाच!
20
ट्रेनमध्ये भीक मागत होती अनाथ मुलगी; गोलूने वाईट नजरेपासून वाचवलं, घरी आणलं अन् लग्नच केलं
Daily Top 2Weekly Top 5

न्यायव्यवस्थेतील दिरंगाईमुळे हैदराबादच्या एन्काउंटरला समर्थन : उज्ज्वल निकम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 12:30 IST

विश्वास कमी होणार नाही, मात्र एखाद्या क्रूर गुन्ह्यासाठी जलद यंत्रणा हवी

ठळक मुद्देहैदराबाद येथील एका तरुणीवर अत्याचार केलेल्या चार आरोपींचा एन्काउंटरमध्ये मृत्यू झालाभविष्यात संबंधित पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना कायदेशीर संकटांचा सामना करावा लागणारआरोपींना कठोर शिक्षा झाल्यास क्रूर गुन्ह्यांना आळा बसेल, अशा गुन्ह्यांची पुनरावृत्ती होणार नाही

सोलापूर : हैदराबाद येथे एका तरुणीवर अत्याचार करून तिचा जाळून खून केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या चार आरोपींना एन्काउंटरमध्ये गोळ्या घालून मारण्यात आले. या कारवाईचे स्थानिक व देशभरात स्वागत करण्यात आले, मात्र न्यायव्यवस्थेवरचा विश्वास कमी झाला असे नाही. क्रूर गुन्ह्यातील आरोपींना लवकर शिक्षा होत नाही, याची खंत लोकांमध्ये आहे, असे मत सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी ‘लोकमत’ शी बोलताना व्यक्त केले. 

सोलापुरात गाजलेल्या अ‍ॅड. राजेश कांबळे खून प्रकरणात सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती झाली आहे. मंगळवारी त्यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात येऊन माहिती घेतली. शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, हैदराबाद येथील एका तरुणीवर झालेला अत्याचार हा अतिशय क्रूर पद्धतीचा होता. पोलिसांनी तत्काळ चार आरोपींना अटक केली, तपासासाठी घटनास्थळी घेऊन गेल्यानंतर झालेल्या चकमकीत चौघांचा मृत्यू झाला. सर्वसामान्य नागरिक म्हणून मी त्यांना त्यांची शिक्षा मिळाली, असे म्हणेन. कायद्याचा अभ्यासक म्हणून बोलायचं झालं तर पोलिसांना न्याय देण्याचा अधिकार नाही, असेही अ‍ॅड. उज्ज्वल निकम म्हणाले. 

एखादा क्रूर गुन्हा घडल्यानंतर विशिष्ट मुदतीत खटल्याचा निकाल लागला पाहिजे. आरोपींविरुद्ध आरोप सिद्ध होत असतील तर त्वरित शिक्षा होणे अपेक्षित आहे. गुन्हेगारी वृत्तीला थांबवता येत नाही, मात्र त्याला आळा घालण्यासाठी कायद्याचा जरब आणि भीती निर्माण झालीच पाहिजे. आरोपींना कठोर शिक्षा झाल्यास क्रूर गुन्ह्यांना आळा बसेल. अशा गुन्ह्यांची पुनरावृत्ती होणार नाही, असेही अ‍ॅड. उज्ज्वल निकम यावेळी बोलताना म्हणाले. 

पोलिसांना चौकशीला सामोरे जावे लागणार - हैदराबाद येथील एका तरुणीवर अत्याचार केलेल्या चार आरोपींचा एन्काउंटरमध्ये मृत्यू झाला. मात्र भविष्यात संबंधित पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना कायदेशीर संकटांचा सामना करावा लागणार आहे. कर्मचाºयांची चौकशी होईल, प्रसंगी संबंधितांच्या नोकºया जाऊ शकतात. कारवाईनंतर लोकांनी आनंदोत्सव केला तरी अशा प्रसंगी कर्मचारी व अधिकारी यांच्या बाजूने कोणी येणार नाही. कारवाई करणे तसे सोपे आहे, मात्र पुढे कायदेशीर बाबी निस्तरणे अवघड आहे, असेही यावेळी अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. 

टॅग्स :SolapurसोलापूरUjjwal Nikamउज्ज्वल निकमCourtन्यायालयPoliceपोलिसhyderabad caseहैदराबाद प्रकरण