शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

सुपर एक्सप्रेस वेने नागपूर - मुंबई १० तासांत, मुख्यमंत्र्यांची घोषणा

By admin | Published: July 31, 2015 8:07 PM

नागपूर व मुंबईला जोडण्यासाठी ८०० किलोमीटरचा सुपर एक्सप्रेस वे तयार करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

ऑनलाइन लोकमत 
मुंबई, दि. ३१ - नागपूर व मुंबईला जोडण्यासाठी ८०० किलोमीटरचा सुपर एक्सप्रेस वे तयार करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. नागपूर - अमरावती - औरंगाबाद - घोटी मार्गे मुंबईत येणारा हा एक्सप्रेस वे २०१९ पर्यंत पूर्ण करण्यात येणार असून यासाठी ३० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 
शुक्रवारी विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपराजधानी नागपूर व राजधानी मुंबईला जोडण्यासाठी सुपर एक्सप्रेस वेचा प्रकल्प हाती घेण्याची घोषणा केली आहे. या सुपर एक्सप्रेस वे वेमुळे विदर्भ, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्र मुंबईशी जोडले जाईल व प्रदाशेक समतोल विकासाच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा ठरेल असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. या सुपर एक्सप्रेव वेवर सीसीटीव्ही, वायफाय अशा अत्याधूनिक सुविधा असतील. तसेच शक्य असेल तिथे रस्त्यालगत आय टी पार्क, स्मार्ट सिडी व शैक्षणिक संकुले उभारण्याचा मनोदयही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. हा सुपर एक्सप्रेस वे दोन टप्प्यात बांधण्यात येणार असून या रस्त्यामुळे नागपूर - मुंबई प्रवास अवघ्या १० तासांत शक्य होणार आहे. केंद्र सरकार व राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्या संयुक्त भागीदारीतून रस्त्याचे काम केले जाणार आहे.