शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

सरकार स्थापनेबाबत दिल्लीत होणारी बैठक शेवटची: सुनील तटकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2019 12:58 IST

शरद पवारांच्या निवासस्थानी आज काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाच्या राष्ट्रीय नेत्यांची बैठक होणार आहे.

मुंबई : महाराष्ट्रातील सत्तास्थापनेवरून मिर्माण झालेला पेच सोडवण्यासाठी दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या राज्यातील प्रमुख नेत्यांची आज दिल्लीत बैठक होणार असल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र सरकार स्थापनेबाबत होणारी ही बैठक शेवटची असणार असल्याचा दावा राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी केला आहे.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीवेळी बोलताना ते म्हणाले की, शरद पवारांच्या निवासस्थानी आज काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाच्या राष्ट्रीय नेत्यांची बैठक होणार आहे. यात सत्तास्थापनेबाबत चर्चा होणार आहे.त्यानंतर अंतिम निर्णय सोनिया गांधी आणि शरद पवार हे घेतील. तसेच आज होणारी बैठक ही शेवटची बैठक असणार असल्याचे सुद्धा तटकरे म्हणाले.

विशेष म्हणजे याआधी सुद्धा या दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये अनेक बैठका झाल्या होत्या. मात्र त्यांनतर सुद्धा निर्णय होत नव्हता. मंगळवारी शरद पवार आणि सोनिया गांधी यांची सुद्धा बैठक झाली. त्यांनतर आता आज पुन्हा काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्यांची दिल्लीत बैठक होणार आहे. तसेच या बैठकीचा अहवाल दोन्ही पक्षाचे नेते आपल्या पक्षश्रेष्ठींकडे देणार आहेत.

तर महाराष्ट्रात गेल्या अनेक दिवसांपासून महाशिवआघाडीमध्ये सरकार स्थापनेवरुनचा गुंता पवारांनीच सोडवला म्हणता येईल. कारण, महाशिवआघाडीबाबतचं कोडं आता पवारांनीच उलगडलंय. 'शिवसेनेसोबत सत्तास्थापनेची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. किमान समान कार्यक्रम आज निश्चित होईल. सरकार स्थापनेबाबतची चर्चा 2-3 दिवसात संपेल', असे शरद पवारांनी म्हटलंय.