शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
2
Mumbai Local Train Update: वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
3
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
4
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
5
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग
6
Rakhi Sawant : "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमानसाठी सोन्याची अंगठी घेतली"; राखी सावंतचा धक्कादायक दावा
7
सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय! लाखों भारतीय मुस्लिमांवर होणार थेट परिणाम; नेमकं प्रकरण काय?
8
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
9
वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर
10
Prabodhini Ekadashi 2025: विष्णूंची योगनिद्रा संपताच सलग २१ दिवस करा ही 'प्रभावी उपासना
11
Share Market Today: शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स २७० अंकांनी वधारला; Nifty २४,९४२ च्या पार, 'या' स्टॉक्समध्ये तेजी
12
VIDEO: भारताला विजयी केल्यावर जेमिमा रॉड्रिग्जची वडिलांना घट्ट मिठी, बाप-लेकीला भावना अनावर
13
अनिल अंबानींच्या रिलायन्स ग्रुपवर ₹४१,९२१ कोटींच्या महाघोटाळ्याचा आरोप! 'कोबरापोस्ट'चा सनसनाटी दावा, ग्रुपने आरोप फेटाळले
14
मंदिरातून झाली 'मदिरा दान'ची घोषणा! आज सकाळपासूनच देशी दारूचा ठेक्यावर उसळली गर्दी, १० ची दिली होती वेळ...
15
₹५ लाखांचं बनतील ₹५० कोटी; ५ स्टेप फॉर्म्युला जो तुम्हाला देईल फायनान्शिअल फ्रीडम आणि अनस्टॉबेल ग्रोथ
16
पाकिस्तान-अफगाणिस्तान यांच्यात युद्धविराम? तुर्की बनला सरपंच; शहबाज शरीफ यांची तालिबाननं जिरवली
17
Sushant Singh Rajput : सुशांत सिंह राजपूतची हत्या? बहीण श्वेता कीर्तीचा धक्कादायक खुलासा; म्हणाली, "२ लोकांनी..."
18
Rohit Arya : थरारक! ८ कमांडोंची बाथरूममधून एन्ट्री, ३५ मिनिटांत...; १७ मुलांच्या रेस्क्यूची इनसाईड स्टोरी
19
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - ३१ ऑक्टोबर २०२५; विवाहेच्छुकांचे विवाह जुळतील, मित्रांकडून भेटवस्तू मिळतील
20
बापरे! ऑर्डर केला १.८५ लाखांचा Samsung Z Fold; बॉक्स उघडताच...; ऑनलाईन खरेदीत भानगड

पवारांच्या भूमिकेबद्दल खळबळजनक दावे; अजितदादांसमोरच सुनील तटकरे कडाडले, नेमकं काय म्हणाले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2023 12:25 IST

सरकारमध्ये सहभागी होण्याच्या अजित पवारांच्या निर्णयाची पाठराखण करत सुनील तटकरे यांनी शरद पवार यांच्या भूमिकेबद्दल अनेक खळबळजनक दावे केले आहेत.

कर्जत : राष्ट्रवादीत पडलेल्या ऐतिहासिक फुटीनंतर शरद पवार आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील दोन गटांमध्ये जोरदार संघर्ष सुरू आहे. अजित पवार गटाने आज कर्जतमध्ये राज्यव्यापी शिबिराचं आयोजन केलं असून या शिबिरात प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सरकारमध्ये सहभागी होण्याच्या निर्णयाची पाठराखण करत राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांच्या भूमिकेबद्दल अनेक खळबळजनक दावे केले आहेत. तसंच अजित पवार यांच्यावर होणाऱ्या आरोपांना आक्रमक प्रत्युत्तर दिलं आहे.

राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसमोर बोलताना सुनील तटकरे म्हणाले की, "भाजपसोबत सरकारमध्ये सहभागी होऊन आम्ही काहीतरी महापाप केल्याचा आरोप होत आहे. मात्र शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची बैठक झाली होती. या बैठकीत तत्कालीन प्रदेशाध्यक्षांसह सर्व आमदारांनी सह्या करून भाजपसोबत सरकारमध्ये सहभागी होण्यासाठी एक निवेदन तयार केलं होतं. यामध्ये शाहु-फुले-आंबेडकरांच्या विचारधारेचे एकमेव नेते म्हणवून घेणाऱ्या ठाणे परिसरातील नेत्याचाही समावेश होता. तेव्हा एक समिती स्थापन करून भाजपसोबत युतीच्या चर्चेसाठी आम्हाला आमच्या केंद्रीय नेतृत्वाकडून मुभा देण्यात आली होती. पण नंतर तो निर्णय बदलण्यात आला," असा गौप्यस्फोट सुनील तटकरे यांनी केला आहे.

'२०१६-१७मध्येही झाला होता प्रयत्न'

भाजपसोबत युती करण्यासाठी याआधी अनेक प्रयत्न झाल्याचे सांगताना सुनील तटकरे म्हणाले की, "२०१४ मध्ये विधानसभा निवडणुकीचे पूर्ण निकाल हाती येण्याआधीच मी प्रदेशाध्यक्ष असल्याने मला आणि प्रफुल्ल पटेल यांना आमच्या नेतृत्वाने सूचना दिली की, भाजपला पाठिंबा देण्याचे जाहीर करा. भाजपने न मागताही आम्ही त्यांना पाठिंबा दिला. त्यानंतर साहेबांनी सांगितल्यानुसार मी अलिबागला पक्षाचं एक शिबीर बोलावलं. त्या शिबिरातही भाजपसोबत जाण्याची चर्चा झाली. २०१६ मध्ये आम्हाला पुन्हा सांगण्यात आलं की आपल्याला भाजपसोबत सरकारमध्ये सहभागी व्हायचं आहे. लोकसभेचं जागावाटप, मंत्रिपदांचं वाटपही ठरलं होतं. मात्र शेवटच्या क्षणी काही घडामोडी घडल्या आणि आपण सरकारमध्ये सहभागी होऊ शकलो नाही," असा दावा तटकरेंनी केला.

'आरोप झाल्यानंतर पक्ष पाठीशी उभा राहिला नाही'

"आघाडी सरकारमध्ये मी, अजित दादा आणि छगन भुजबळ यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाले. मात्र त्या काळात पक्ष आमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला नाही. एकच गोष्ट १०० वेळा सांगितल्याने लोकांनाही ती खरी वाटू लागली," अशा शब्दांत सुनील तटकरे यांनी शरद पवारांबद्दल अप्रत्यक्षरित्या नाराजी बोलून दाखवली आहे.

'अजितदादांबद्दल तो अत्यंत वाईट शब्द वापरला गेला'

राष्ट्रवादी पक्षाच्या नावावर आणि चिन्हावर दोन्ही गटांनी दावा केल्याने सध्या निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरू आहे. या सुनावणीदरम्यान दोन्ही बाजूंने एकमेकांवर जोरदार हल्ले चढवले जात आहेत. यावेळी अजित पवार यांचं पक्षसंघटनेसाठी योगदान नसल्याचा दावा शरद पवार गटाकडून करण्यात आला. तसंच ते भेकड असल्याचंही म्हटलं गेलं. यावर बोलताना सुनील तटकरेंनी म्हटलं की, "निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरू असताना काल अजितदादांबद्दल दुर्दैवाने एक शब्द वापरला गेला. त्या शब्दाचा अर्थ अत्यंत तिखट आहे. पण तो मी तुम्हाला सांगणार आहे, कारण तुमचंही रक्त खवळलं पाहिजे. युक्तिवादात अजित पवार हे भेकड असल्याचं म्हटलं गेलं. हे तुम्हाला मान्य आहे का? अजितदादा जर भेकड असते तर सरकारमध्ये सहभागी होण्याची हिंमत दाखवू शकले नसते. अजितदादांचा निर्णय कसा क्रांतीकारी आहे, हे आपल्याला आता कृतीतून दाखवून द्यावं लागेल. त्यासाठीच आपण हे दोन दिवसीय अधिवेशन बोलावलं आहे."

दरम्यान, "पहाटेच्या शपथविधीवेळीही अजित पवारांबद्दल संशयाचं मळभ निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र ५ जुलै रोजी एमईटी येथे झालेल्या मेळाव्यात अजित पवार यांनी स्पष्ट शब्दांत आपली भूमिका जाहीर केल्याने ते सगळं मळभ दूर झालं," असंही सुनील तटकरे म्हणाले.

टॅग्स :sunil tatkareसुनील तटकरेSharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवार