शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
4
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
5
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
6
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
7
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
8
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
9
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
10
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
11
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
12
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
13
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
14
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
15
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
16
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
17
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
18
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
19
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
20
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ

शिवसेनेची पहिली शाखा स्थापन करणाऱ्या शिवसैनिकाची आत्महत्या; उस्मानाबादेतील ह्दयद्रावक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2022 14:08 IST

शहरात चहाची टपरी चालवत दत्तात्रय वऱ्हाडे यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवायचे. निवडणुका आल्या की चहाची टपरी बंद करत शिवसेनेच्या प्रचारासाठी गावोगावी पायपीट करायचे.

उस्मानाबाद – १९६६ साली शिवसेनाप्रमुखबाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली. बाळासाहेबांच्या वाणीनं राज्यभरात अनेक निष्ठावंत शिवसैनिक तयार केले. बाळासाहेब ठाकरे यांच्या एकवचनी कारभारामुळे लाखो शिवसैनिक बाळासाहेबांसाठी जीव ओवाळून टाकण्यास तयार असायचे. बाळासाहेबांनीही कधी शिवसैनिकाला वाऱ्यावर सोडलं नाही. शिवसैनिकांमुळेच मी शिवसेनाप्रमुख आहे हे वाक्य बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे. बाळासाहेब ठाकरे आणि शिवसैनिक यांचं प्रेमाचं नातं होतं. शिवसैनिक बाळासाहेबांना दैवत मानतात. मात्र उस्मानाबाद जिल्ह्यातील घडलेल्या एका घटनेमुळे अनेकांना मोठा धक्का बसला आहे.

उस्मानाबाद येथे शिवसेनेची पहिली शाखा स्थापन करणाऱ्या एका शिवसैनिकांने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. आर्थिक विवंचनेतून दत्तात्रय वऱ्हाडे नावाच्या शिवसैनिकाने आत्महत्या केली आहे. वऱ्हाडे हे कट्टर निष्ठावंत शिवसैनिक म्हणून ओळखले जायचे. १९८४ मध्ये बाळासाहेबांच्या विचाराने प्रेरित होऊन वयाच्या २२ व्या वर्षी दत्तात्रय वऱ्हाडे यांनी शिवसेनेची पहिली शाखा स्थापन केली होती.

कोणत्याही निवडणुकीत शिवसेनेच्या प्रचारासाठी सज्ज असलेले दत्तात्रय वऱ्हाडे घरोघरी जात धनुष्यबाणावरच शिक्का मारा अशी विनवणी लोकांना करायचे. बाळासाहेब ठाकरे यांना दैवत मानत वऱ्हाडे यांनी मोजक्या कार्यकर्त्यांसह उस्मानाबादेत शिवसेनेचा पहिला झेंडा रोवला. त्याकाळी कुठलंही आर्थिक पाठबळ नसताना उधारीचे पैसे घेऊन वऱ्हाडे यांनी शाखा स्थापन केली.

शहरात चहाची टपरी चालवत दत्तात्रय वऱ्हाडे यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवायचे. निवडणुका आल्या की चहाची टपरी बंद करत शिवसेनेच्या प्रचारासाठी गावोगावी पायपीट करायचे. वऱ्हाडे यांना ४ मुली आणि २ मुले असून आर्थिक बाजू कमकुवत असल्याने मुलांचे शिक्षण अर्धवट राहिलं. चहाच्या टपरीवर मिळणाऱ्या पैशातून त्यांनी मुलींची लग्न केली. घरची बिकट परिस्थिती असतानाही शिवसेनेवरील त्यांची निष्ठा कधी कमी झाली नाही. शिवसेनेच्या प्रचारासाठी कायम ते हजर होते असं त्यांच्या मुलांनी सांगितले. त्यामुळे बाळासाहेबांची शिवसेना आणि शिवसैनिक हे नातं किती घट्ट होते ते जाणून येते. मात्र याच शिवसैनिकाने अखेर आर्थिक परिस्थितीला कंटाळून आत्महत्या केल्यानं परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येते.

उद्धव ठाकरेंच्या दीर्घायुष्यासाठी पायी तिरुपतीला निघालेल्या शिवसैनिकाचा वाटेतच मृत्यू

अलीकडेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांना दीर्घायुष्य लाभावे यासाठी बीडमधील एका कट्टर शिवसैनिकाने तिरुपती बालाजीपर्यंत पदयात्रा काढली होती. पण, या पदयात्रेदरम्यान त्या शिवसैनिकाचे निधन झाल्याची घटना घडली होती. उद्धव ठाकरे यांच्या दीर्घायुष्यासाठी सुमंत रुईकर (Sumant Ruikar) व त्यांच्या मित्रासह तिरुपती बालाजीकडे पायी निघाले होते. सुमंत रुईकर यांना तिरुपतीकडे जाताना ताप आल्याने कर्नाटकातील रायचूर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. प्रकृती खालावल्याने रुईकर यांचे निधन झाले होते.  

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरे