शहरं
Join us  
Trending Stories
1
'विकसित भारत- जी राम जी' बिल लोकसभेत मंजूर, विरोधकांनी विधेयकाची कॉपी फाडून फेकली!
2
'मी हिजाबच्या विरोधात, पण नितीश कुमारांनी माफी मागावी', 'त्या' घटनेवर जावेद अख्तर संतापले
3
कर्नाटकात उडाला काँग्रेसच्या 'लाडकी बहीण' योजनेचा बोजवारा? दोन महिन्यांचे मानधन रखडले, खुद्द मंत्र्यांचीच कबुली!
4
वारंवार सांगूनही ऐकेना, शेवटी चाहत्याचा मोबाईल हिसकावला आणि...,जसप्रीत बुमराहचं धक्कादायक कृत्य  
5
Honda Vs TVS: १ लाखांपर्यंतच्या बजेटमध्ये बाईक खरेदी करायची आहे? कोणता ऑप्शन असेल बेस्ट
6
Video: भाविकांना घेऊन जाणारी कार ५० फूट खोल दरीत कोसळली, तीन जणांचा मृत्यू
7
तुमच्या बॅगेत ४० किलोहून अधिक सामान आहे?; ट्रेनमधून प्रवास करण्यापूर्वी जाणून घ्या, नवा नियम
8
अक्षय खन्नाच्या यशाचे 'गुपित': अभिनयच नाही, तर कुंडलीतील 'राजलक्षण राजयोग' बदलतोय नशीब
9
प्रसिद्ध माजी क्रिकेटपटू अन् दुबई एअरलाइन्सच्या माजी मालकाची पत्नी स्टेशवर सापडली; भीषण अवस्था, व्हिडीओ व्हायरल, नेमकं सत्य काय?
10
Bombay HC: मुंबई उच्च न्यायालय बॉम्बनं उडवून देण्याची धमकी, परिसरात खळबळ!
11
लग्न होत नसेल, नोकरी मिळत नसेल तर 'राम' नामाचा जप करा; भाजपा खासदारानं संसदेत सांगितला उपाय
12
काश्मीर खोऱ्यात सैन्याला मिळाले १२ हत्तींचे बळ! मिलिटरी ट्रेनने रणगाडे, अवजड शस्त्रास्त्रे नेण्यात यश...
13
भेटण्याची वेळ द्या सर..; प्रियंका गांधींच्या विनंतीला गडकरींचा लगेच होकार, नेमकी काय चर्चा झाली?
14
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
15
Rakhi Sawant : Video - "माफी मागा, मी तुमचं धोतर खेचलं तर...", नितीश कुमारांवर भडकली राखी सावंत
16
म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! सेबीने एक्सपेन्स रेशोचे नियम बदलले, कमाईवर थेट परिणाम
17
खळबळजनक! घर मालकिणीने भाडं मागितलं, कपलने तिलाच संपवलं; मृतदेहाचे तुकडे केले अन्...
18
परदेश दौऱ्यावर जाताय? ट्रॅव्हल इन्शुरन्स घेताना 'या' चुका टाळा; अन्यथा खिशाला बसू शकतो मोठा फटका
19
Bomb Threat: न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
20
सुरक्षा दलांची मोठी कामगिरी; छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात 3 नक्षलवादी ठार, शस्त्रसाठा जप्त
Daily Top 2Weekly Top 5

कारखान्यांची धुराडी सोमवारपासून पेटणार, ऊस दराची घोषणा होणार का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2017 12:06 IST

सांगली : जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम  १ नोव्हेंबरला चालू होणार असला तरी, सोमवारपासूनच बहुतांशी साखर कारखान्यांची धुराडी पेटणार आहेत.

सांगली : जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम  १ नोव्हेंबरला चालू होणार असला तरी, सोमवारपासूनच बहुतांशी साखर कारखान्यांची धुराडी पेटणार आहेत. त्यादृष्टीने साखर कारखाना व्यवस्थापनांचे प्रयत्न चालू आहेत. टोळ्या कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात दाखल झाल्या असून, दराची घोषणा काय होणार का ? याकडे शेतक-यांचे लक्ष लागून राहिले आहे.जिल्ह्यातील यशवंत (नागेवाडी, ता. खानापूर), डफळे (ता. जत), तासगाव (तुरची, ता. तासगाव) या साखर कारखान्यांचे गळीत हंगाम या हंगामामध्ये बंद राहण्याची शक्यता आहे. उर्वरित हुतात्मा, राजारामबापूची सर्व युनिट, केन अ‍ॅग्रो, सोनहिरा, उदगिरी शुगर, वसंतदादा (दत्त इंडिया), निनाईदेवी (दालमिया), क्रांती, महांकाली, माणगंगा, मोहनराव शिंदे या कारखान्यांनी गळीत हंगामाची तयारी पूर्ण केली आहे.वसंतदादा (दत्त इंडिया) कारखान्याचा गळीत हंगाम सोमवार, दि. ३० आॅक्टोबरपासून चालू होणार आहे. उर्वरित साखर कारखान्यांचेही गळीत हंगाम पुढील आठवड्यात चालू होणार आहेत. त्यादृष्टीने कारखाना व्यवस्थापनाने तयारी पूर्ण केली आहे. कारखान्यांचा गळीत हंगाम दि. ३० आॅक्टोबरपाूसन पुढे चालू होणार असले तरी, यावेळी ते दर काय जाहीर करणार, याकडे शेतकरी आणि शेतकरी संघटनांचे लक्ष आहे. कारखान्यांनी गळीत हंगाम चालू करताना दराची घोषणा केली नाही, तर शेतकरी संघटनांची काय भूमिका असणार, याबाबतही चर्चा चालू आहे.स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊस परिषद झाली असून, त्यांनी दर जाहीर केल्याशिवाय उसाचे कांडेही तोडू देणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून बाहेर पडलेले कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी रयत क्रांती संघटना चालू केली आहे. या संघटनेची दराबाबत काय भूमिका असणार हेही महत्त्वाचे आहे. शरद जोशीप्रणित शेतकरी संघटनेची ६ नोव्हेंबरला सांगलीत राज्यस्तरीय ऊस परिषद होणार आहे. या ऊस परिषदेत त्यांची आंदोलनाची दिशा ठरणार आहे. शेतकरी संघटनेचे रघुनाथदादा पाटील यांनी ऊस दराबाबत अद्याप कोणतीही घोषणा केली नाही. यामुळे त्यांची साखर कारखान्यांच्या दराबाबत काय भूमिका असणार, याकडेही शेतक-यांचे लक्ष लागून राहिले आहे.सांगली जिल्ह्यात टोळ्या दाखलजिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम १ नोव्हेंबरपासून चालू होणार आहे. या पार्श्वभूमीवर उस्मानाबाद, बीड, अहमदनगर, सोलापूर, जत, आटपाडी, कवठेमहांकाळ तालुक्यातील ऊसतोड मजूरांच्या टोळ्या जिल्ह्यात दाखल झाल्या आहेत. वसंतदादा कारखान्याकडील दत्त इंडियाच्या टोळ्याही कारखाना परिसरात आल्या असून, तो परिसर गजबजला आहे. बैलगाडीचालक टोळ्या झोपड्या घालण्यामध्ये व्यस्त असल्याचे दिसत आहे.

टॅग्स :Sangliसांगली