शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
2
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
3
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
4
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
5
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
6
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
7
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
8
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
9
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
10
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
11
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
12
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
13
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
14
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
15
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
16
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
17
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
18
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
19
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
20
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी

कारखान्यांची धुराडी सोमवारपासून पेटणार, ऊस दराची घोषणा होणार का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2017 12:06 IST

सांगली : जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम  १ नोव्हेंबरला चालू होणार असला तरी, सोमवारपासूनच बहुतांशी साखर कारखान्यांची धुराडी पेटणार आहेत.

सांगली : जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम  १ नोव्हेंबरला चालू होणार असला तरी, सोमवारपासूनच बहुतांशी साखर कारखान्यांची धुराडी पेटणार आहेत. त्यादृष्टीने साखर कारखाना व्यवस्थापनांचे प्रयत्न चालू आहेत. टोळ्या कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात दाखल झाल्या असून, दराची घोषणा काय होणार का ? याकडे शेतक-यांचे लक्ष लागून राहिले आहे.जिल्ह्यातील यशवंत (नागेवाडी, ता. खानापूर), डफळे (ता. जत), तासगाव (तुरची, ता. तासगाव) या साखर कारखान्यांचे गळीत हंगाम या हंगामामध्ये बंद राहण्याची शक्यता आहे. उर्वरित हुतात्मा, राजारामबापूची सर्व युनिट, केन अ‍ॅग्रो, सोनहिरा, उदगिरी शुगर, वसंतदादा (दत्त इंडिया), निनाईदेवी (दालमिया), क्रांती, महांकाली, माणगंगा, मोहनराव शिंदे या कारखान्यांनी गळीत हंगामाची तयारी पूर्ण केली आहे.वसंतदादा (दत्त इंडिया) कारखान्याचा गळीत हंगाम सोमवार, दि. ३० आॅक्टोबरपासून चालू होणार आहे. उर्वरित साखर कारखान्यांचेही गळीत हंगाम पुढील आठवड्यात चालू होणार आहेत. त्यादृष्टीने कारखाना व्यवस्थापनाने तयारी पूर्ण केली आहे. कारखान्यांचा गळीत हंगाम दि. ३० आॅक्टोबरपाूसन पुढे चालू होणार असले तरी, यावेळी ते दर काय जाहीर करणार, याकडे शेतकरी आणि शेतकरी संघटनांचे लक्ष आहे. कारखान्यांनी गळीत हंगाम चालू करताना दराची घोषणा केली नाही, तर शेतकरी संघटनांची काय भूमिका असणार, याबाबतही चर्चा चालू आहे.स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊस परिषद झाली असून, त्यांनी दर जाहीर केल्याशिवाय उसाचे कांडेही तोडू देणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून बाहेर पडलेले कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी रयत क्रांती संघटना चालू केली आहे. या संघटनेची दराबाबत काय भूमिका असणार हेही महत्त्वाचे आहे. शरद जोशीप्रणित शेतकरी संघटनेची ६ नोव्हेंबरला सांगलीत राज्यस्तरीय ऊस परिषद होणार आहे. या ऊस परिषदेत त्यांची आंदोलनाची दिशा ठरणार आहे. शेतकरी संघटनेचे रघुनाथदादा पाटील यांनी ऊस दराबाबत अद्याप कोणतीही घोषणा केली नाही. यामुळे त्यांची साखर कारखान्यांच्या दराबाबत काय भूमिका असणार, याकडेही शेतक-यांचे लक्ष लागून राहिले आहे.सांगली जिल्ह्यात टोळ्या दाखलजिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम १ नोव्हेंबरपासून चालू होणार आहे. या पार्श्वभूमीवर उस्मानाबाद, बीड, अहमदनगर, सोलापूर, जत, आटपाडी, कवठेमहांकाळ तालुक्यातील ऊसतोड मजूरांच्या टोळ्या जिल्ह्यात दाखल झाल्या आहेत. वसंतदादा कारखान्याकडील दत्त इंडियाच्या टोळ्याही कारखाना परिसरात आल्या असून, तो परिसर गजबजला आहे. बैलगाडीचालक टोळ्या झोपड्या घालण्यामध्ये व्यस्त असल्याचे दिसत आहे.

टॅग्स :Sangliसांगली