शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

कारखान्यांची धुराडी सोमवारपासून पेटणार, ऊस दराची घोषणा होणार का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2017 12:06 IST

सांगली : जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम  १ नोव्हेंबरला चालू होणार असला तरी, सोमवारपासूनच बहुतांशी साखर कारखान्यांची धुराडी पेटणार आहेत.

सांगली : जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम  १ नोव्हेंबरला चालू होणार असला तरी, सोमवारपासूनच बहुतांशी साखर कारखान्यांची धुराडी पेटणार आहेत. त्यादृष्टीने साखर कारखाना व्यवस्थापनांचे प्रयत्न चालू आहेत. टोळ्या कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात दाखल झाल्या असून, दराची घोषणा काय होणार का ? याकडे शेतक-यांचे लक्ष लागून राहिले आहे.जिल्ह्यातील यशवंत (नागेवाडी, ता. खानापूर), डफळे (ता. जत), तासगाव (तुरची, ता. तासगाव) या साखर कारखान्यांचे गळीत हंगाम या हंगामामध्ये बंद राहण्याची शक्यता आहे. उर्वरित हुतात्मा, राजारामबापूची सर्व युनिट, केन अ‍ॅग्रो, सोनहिरा, उदगिरी शुगर, वसंतदादा (दत्त इंडिया), निनाईदेवी (दालमिया), क्रांती, महांकाली, माणगंगा, मोहनराव शिंदे या कारखान्यांनी गळीत हंगामाची तयारी पूर्ण केली आहे.वसंतदादा (दत्त इंडिया) कारखान्याचा गळीत हंगाम सोमवार, दि. ३० आॅक्टोबरपासून चालू होणार आहे. उर्वरित साखर कारखान्यांचेही गळीत हंगाम पुढील आठवड्यात चालू होणार आहेत. त्यादृष्टीने कारखाना व्यवस्थापनाने तयारी पूर्ण केली आहे. कारखान्यांचा गळीत हंगाम दि. ३० आॅक्टोबरपाूसन पुढे चालू होणार असले तरी, यावेळी ते दर काय जाहीर करणार, याकडे शेतकरी आणि शेतकरी संघटनांचे लक्ष आहे. कारखान्यांनी गळीत हंगाम चालू करताना दराची घोषणा केली नाही, तर शेतकरी संघटनांची काय भूमिका असणार, याबाबतही चर्चा चालू आहे.स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊस परिषद झाली असून, त्यांनी दर जाहीर केल्याशिवाय उसाचे कांडेही तोडू देणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून बाहेर पडलेले कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी रयत क्रांती संघटना चालू केली आहे. या संघटनेची दराबाबत काय भूमिका असणार हेही महत्त्वाचे आहे. शरद जोशीप्रणित शेतकरी संघटनेची ६ नोव्हेंबरला सांगलीत राज्यस्तरीय ऊस परिषद होणार आहे. या ऊस परिषदेत त्यांची आंदोलनाची दिशा ठरणार आहे. शेतकरी संघटनेचे रघुनाथदादा पाटील यांनी ऊस दराबाबत अद्याप कोणतीही घोषणा केली नाही. यामुळे त्यांची साखर कारखान्यांच्या दराबाबत काय भूमिका असणार, याकडेही शेतक-यांचे लक्ष लागून राहिले आहे.सांगली जिल्ह्यात टोळ्या दाखलजिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम १ नोव्हेंबरपासून चालू होणार आहे. या पार्श्वभूमीवर उस्मानाबाद, बीड, अहमदनगर, सोलापूर, जत, आटपाडी, कवठेमहांकाळ तालुक्यातील ऊसतोड मजूरांच्या टोळ्या जिल्ह्यात दाखल झाल्या आहेत. वसंतदादा कारखान्याकडील दत्त इंडियाच्या टोळ्याही कारखाना परिसरात आल्या असून, तो परिसर गजबजला आहे. बैलगाडीचालक टोळ्या झोपड्या घालण्यामध्ये व्यस्त असल्याचे दिसत आहे.

टॅग्स :Sangliसांगली