शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

साखर कारखाने करणार उसापासून थेट इथेनॉल निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 05:59 IST

अधिसूचना जारी; अतिरिक्त साखर उत्पादनावर पर्याय

- चंद्रकांत कित्तुरे कोल्हापूर : उसापासून थेट इथेनॉल तयार करण्याला केंद्र सरकारने साखर कारखान्यांना परवानगी दिली आहे. यासाठी ऊस नियंत्रण अध्यादेश १९६६ मध्ये सुधारणा करणारी अधिसूचना केंद्रीय अन्न मंत्रालयाने गुरुवारी जारी केली आहे.या अधिसूचनेनुसार कारखान्यांना यापुढे उसाच्या रसापासून किंवा ‘बी मोलॅसिस’पासून थेट इथेनॉल निर्मिती करण्याला परवानगी देण्यात आली. एखाद्या कारखान्यात अशा पद्धतीने तयार होणारे ६०० लिटर इथेनॉल म्हणजे १ टन साखर असे प्रमाण गृहीत धरून उसातील साखरेचा सरासरी उतारा काढला जाणार आहे.मागणी २५० लाख टन असताना यंदा देशात साखरेचे उत्पादन ३२२ लाख टन झाल्याने अतिरिक्त साखरेचा प्रश्न निर्माण झाला आहे. साखरेचे दर घसरल्याने कारखाने अडचणीत आल्यामुळे शेतकऱ्यांची सुमारे २२ हजार कोटींची ऊस बिले थकीत होती. ती देता यावीत, कारखाने अडचणीतून बाहेर यावेत यासाठी केंद्र सरकारने विविध उपाययोजना केल्या. साखरेवरील आयात कर दुप्पट, २० लाख टन साखर निर्यातीला परवानगी, निर्यातीसाठी शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रतिटन ५५ रुपये अनुदान, साखरेचा किमान विक्री दर निश्चित करणे, दरमहा खुल्या बाजारात किती साखर विकायची याचा कोटा कारखान्यांना ठरवून देणे आदींचा त्यामध्ये समावेश आहे.या उपाययोजनेचाच एक भाग म्हणून गेल्या महिन्यात केंद्राने इथेनॉलचे दर निश्चित केले आहेत. त्यानुसार ‘बी मोलॅसिस’पासून तयार होणाºया इथेनॉलचे दर प्रतिलिटर ४७.४९ रूपये तर ‘सी मोलॅसिस’पासून तयार होणाºया इथेनॉलचे दर ४३.७० रूपये असे निश्चित केले. हे दर १ डिसेंबर २०१८ पासून लागू होतील. देशात पेट्रोलमध्ये १० टक्के इथेनॉल मिसळण्याला परवानगी आहे. मात्र, कमी उपलब्धतेमुळे केवळ ४ टक्के इथेनॉलच पेट्रोलमध्ये मिसळले जाते.इथेनॉल प्रकल्पाला बिनव्याजी कर्जयेत्या हंगामात उसाची उपलब्धता जादा असल्याने देशातील साखरेचे उत्पादन ३५५ लाख टनावर जाईल, असा अंदाज आहे. त्यामुळेच इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. इथेनॉल प्रकल्पाला पहिली पाच वर्षे बिनव्याजी कर्ज देण्यात येणार आहे.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेMaharashtraमहाराष्ट्र