शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

साखर कारखाने प्राप्तिकरमुक्त; इथेनॉलसाठी तातडीने निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2021 08:18 IST

Sugar factories : विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनी साखर कारखान्यांसमोर उभ्या असलेल्या आर्थिक प्रश्नांचा निवाडा करण्यासाठी शहा यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.

- विकास झाडे

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना आता २०१६ नंतरचा आयकर लागणार नाही, केंद्र सरकारच्या या भूमिकेचे स्वागत करीत महाराष्ट्रातील शिष्टमंडळाने बुधवारी केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांना बैठकीत कर्जाचे पुनर्गठण करावे व इथेनॉलसाठी तातडीने निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी केली आहे.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनी साखर कारखान्यांसमोर उभ्या असलेल्या आर्थिक प्रश्नांचा निवाडा करण्यासाठी शहा यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. महाराष्ट्रातील साखर कारखान्यांकडून १९५८ ते २०१६ या कालावधीत ८ हजार ३०० कोटी रूपये कर थकीत आहे यावर तोडगा काढावा. साखर उद्योगाला दिलेल्या कर्जाचे पुनर्गठण व्हावे यावर विस्तृत चर्चा करण्यात आली.

२०१६ च्या आधीच्या थकीत वसुलीबाबत कारखान्यांना नोटिसा पाठविण्यात आलेल्या आहेत ती वसुली रद्द करण्यासाठी आम्ही पाठपुरावा करू अशी माहिती फडणवीस यांनी दिली. महत्त्वाचा निर्णय घेतल्याबद्दल फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सहकार मंत्री अमित शाह यांचे आभार मानले. ज्या सहकारी साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जास्त दर दिला होता, तो नफा गृहीत धरून आयकर खात्याने कारखान्यांना सरसकट नोटिसा पाठविल्या होत्या.

मात्र, आता या प्रकरणी अर्थ मंत्रालयाने स्पष्टीकरण देत शेतकऱ्यांना दिलेल्या वाढीव रकमेसाठी केवळ एफआरपीचा विचार केला जाणार नाही तर, विविध राज्य सरकारांनी निश्चित केलेल्या किमान ऊस दरांचाही त्यात समावेश असल्याचे म्हटले आहे. 

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखाने