शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
4
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
5
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
6
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
7
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
8
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
9
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
10
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
11
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
12
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
13
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
14
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
15
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
16
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
18
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
19
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
20
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
Daily Top 2Weekly Top 5

कमी दराने साखर विक्री करणाऱ्यांवर थेट फौजदारीच, साखर आयुक्तांचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 14:57 IST

केंद्र सरकारने साखरेचा निर्धारीत केलेल्या दरापेक्षा कमी दराने साखरेची विक्री करणारे कारखाने व साखर व्यापाऱ्यांवर थेट फौजदारी दाखल करण्याचा निर्णय साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी घेतला. राज्यातील १६ कारखान्यांबाबत आयुक्तांकडे तक्रारी आल्या असून त्यातील ७ कारखाने पश्चिम महाराष्ट्रातील  असल्याची माहिती पुढे आली आहे. याबाबत पुण्यात बैठक घेऊन आयुक्तांनी गुरूवारी कारखान्यांना चांगलीच तंबी दिली.

ठळक मुद्देकमी दराने साखर विक्री करणाऱ्यांवर थेट फौजदारीच, साखर आयुक्तांचा निर्णय१६ कारखाने रडारवर, पश्चिम महाराष्ट्रातील  ७ कारखान्यांचा समावेश?

कोल्हापूर : केंद्र सरकारने साखरेचा निर्धारीत केलेल्या दरापेक्षा कमी दराने साखरेची विक्री करणारे कारखाने व साखर व्यापाऱ्यांवर थेट फौजदारी दाखल करण्याचा निर्णय साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी घेतला. राज्यातील १६ कारखान्यांबाबत आयुक्तांकडे तक्रारी आल्या असून त्यातील ७ कारखाने पश्चिम महाराष्ट्रातील  असल्याची माहिती पुढे आली आहे. याबाबत पुण्यात बैठक घेऊन आयुक्तांनी गुरूवारी कारखान्यांना चांगलीच तंबी दिली.यंदाचा हंगामात साखरेच्या दरात घसरण झाल्याने कारखान्यांसमोर पेच निर्माण झाला. साखरेवर बॅँकांकडून मिळणारी उचल आणि ऊसाची एफआरपी यामध्ये मोठी तफावत राहिल्याने शेतकऱ्यांना पैसे देणे अवघड झाले. एफआरपीची रक्कम दोन टप्यात देण्याचा निर्णय घेतला. बाजारातील साखरेचा दरात वाढ करण्यासाठी केंद्र सरकारने साखरेचा किमान भाव प्रतिक्विंटल २९०० रूपये निश्चित केला.

किमान भाव निश्चित केल्यानंतर साखरेचे मार्केट काही प्रमाणात स्थिर झाले. तरीही एफआरपीचे पैसे देता येईनात. त्याची दखल घेऊन केंद्र सरकारने फेबु्रवारी महिन्यात साखरेच्या किमान दरात प्रतिक्विंटल २०० रूपयांची वाढ करत तो ३१०० रूपये केला.साखर कारखान्यांना मदत करण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला पण कारखान्यांनी साखर विक्रीच्या नादात किमान दरापेक्षा कमी दराने साखर विक्री सुरू केली. त्याचा परिणाम थेट बाजारावर होऊन इतर कारखान्यांच्या साखर विक्रीवर परिणाम झाला. ही साखर बाजारात आल्याने बाजारात साखरेचा दर वाढेना. याविरोधात साखर आयुक्तांकडे राज्य साखर संघाने तक्रार केली होती.

याबाबत गुरूवारी आयुक्त शेखर गायकवाड यांनी राज्यातील कारखानदारांची बैठक बोलावून चांगलीच कानउघडणी केली. १६ कारखान्यांबाबत तक्रारी आल्या आहेत. त्यांच्यासह साखर खरेदी करणाºया व्यापाºयांची चौकशी करून संबधितांवर फौजदारी दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.

किमान भाव रद्द होण्याचा धोकाकेंद्र सरकारने शेतकरी व कारखान्यांसाठी साखरेचा किमान भाव निश्चित केला. पण कारखानेच कायद्याची पायमल्ली करणार असतील तर हा निर्णय रद्द करण्याचा निर्णय केंद्राच्या पातळीवर होऊ शकतो.

साखर कारखानदारीला बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारने चांगला निर्णय घेतला. पण कारखानेच स्वताच्या पायावर दगड मारून घेत आहेत. आयुक्तांनी घेतलेली भूमिका योग्यच आहे.- पी. जी. मेढे (साखर तज्ञ) 

 

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेkolhapurकोल्हापूर