शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: जरांगे सांगत नाही तोपर्यंत आझाद मैदान सोडणार नाही; हायकोर्ट निर्देशांनंतरही मराठा आंदोलक ठाम
2
“बस… जरांगे आता थांबा! आंदोलन संपवून सरकारला सहकार्य करा, नामुष्की टाळा”; कुणी दिला सल्ला?
3
"काँग्रेसच्या स्टेजवरून माझ्या आईला शिवी दिली, हा अपमान..."; पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले भावूक
4
बुरख्यातली गर्लफ्रेंड निघाली मुलगा! एकत्र प्रवास करूनही ओळखू शकला नाही बॉयफ्रेंड; पुढचं ऐकून व्हाल हैराण
5
अवनीत कौरने विराट कोहलीच्या इंस्टाग्राम पोस्ट लाइकवर सोडलं मौन, म्हणाली - "मी कधीच विसरत नाही..."
6
"अकाली एक्झिट वगैरे शब्द...", प्रिया मराठेच्या निधनानंतर अभिजीतची भावुक पोस्ट
7
"लक्षात ठेवा तुमच्याही लोकांना, नेत्यांना महाराष्ट्रात यायचं आहे"; मनोज जरांगे मुख्यमंत्र्यांचं नाव घेऊन काय बोलले?
8
मतचोरीच्या ‘ॲटम बॉम्ब’नंतर आता फुटेल ‘हायड्रोजन बॉम्ब’; राहुल गांधींचा इशारा
9
पीटर नवारोंनी पुन्हा गरळ ओकली, मोदी-पुतिन-जिनपिंग यांच्या भेटीवर केले मोठे विधान
10
Manoj Jarange: '...तोपर्यंत मुंबई सोडणार नाही', नोटीसनंतर मनोज जरांगेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना इशारा
11
बलात्काराचा आरोप असलेला AAP आमदार गोळीबार करत पोलिसांच्या तावडीतून पळाला...
12
काय आहे शी जिनपिंग यांचा 'GGI फॉर्म्युला'?, अमेरिकेला थेट आव्हान; रशिया-भारताचा तात्काळ होकार
13
बनावट पासपोर्ट वापरल्यास कठोर शिक्षा; नवीन स्थलांतर व परदेशी नागरिक कायदा लागू
14
"भारतानं रोखलं आमचं SCO सदस्यत्व!"; मुस्लीम देश भडकला; म्हणाला, 'पाकिस्तान...'
15
Ganesh Festival 2025: 'घालीन लोटांगण' सुरू होताच स्वत:भोवती प्रदक्षिणा घालता का? थांबा, तुम्ही चुकताय
16
Lalbaugcha Raja: लालबागचा राजा मंडळाला मानवी हक्क आयोगाची नोटीस; ‘व्हीआयपी’ दर्शनाबाबत तक्रार!
17
औषधांवर २०० टक्क्यांपर्यंत टॅरिफ लावण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्लॅन; भारतावर किती होणार परिणाम?
18
सोन्याने गाठली विक्रमी पातळी! तुमच्या शहरात एक तोळ्याचा आजचा भाव काय? अचानक का आली तेजी?
19
४ शुभ योगात परिवर्तिनी एकादशी: तुळशीचा १ उपाय करा, पूर्ण पुण्य मिळवा; श्रीविष्णू कृपा करतील
20
MI च्या ताफ्यातून स्टार झालेल्या पोलार्डची शाहरुखच्या संघाकडून 'हिरोगिरी'! ८ चेंडूत ७ गगनचुंबी षटकार (VIDEO)

असाही ‘सामाजिक न्याय’ : मागासवर्गीय विद्यार्थ्यांना सरकार ठेवणार उपाशी! विचित्र आदेशाने खाण्याचे वांदे  

By यदू जोशी | Updated: August 14, 2018 06:11 IST

वसतिगृहातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना भोजन पुरविणाऱ्या पुरवठादारांचे पैसे देऊ नका, असा आदेश काढून राज्याच्या सामाजिक न्याय विभागाने मागास विद्यार्थ्यांच्या तोंडचा घास हिरावून घेतला आहे.

मुंबई - वसतिगृहातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना भोजन पुरविणाऱ्या पुरवठादारांचे पैसे देऊ नका, असा आदेश काढून राज्याच्या सामाजिक न्याय विभागाने मागास विद्यार्थ्यांच्या तोंडचा घास हिरावून घेतला आहे.राज्यात मागास विद्यार्थ्यांसाठी ४३५ वसतिगृहे असून, त्यात जवळपास ४५ हजार विद्यार्थी राहतात. शासकीय वसतिगृहांसाठी नवीन भोजन कंत्राट देण्याची प्रक्रिया सुरू आहे. पूर्वीच्या पुरवठादारांना भोजन पुरविण्याचे कंत्राट हे एप्रिल २०१८ पर्यंतच देण्यात आलेले होते. त्यानंतरही त्यांनी भोजन पुरविले.मात्र, आता त्यांनी एप्रिल २०१८ नंतर पुरविलेल्या भोजनाची देयके देऊ नयेत, असा विचित्र आदेश समाज कल्याण आयुक्तालयाचे सहआयुक्त माधव वैद्य यांनी काढला आहे. पुरवठादार हे भोजनाचा पुरवठा एप्रिलनंतरही करीत असल्याची बाब तीन-चार महिन्यांनंतर आयुक्तालयाच्या लक्षात कशी आली? जर कंत्राटाची मुदत संपली होती, तर भोजन पुरवठा का आणि कोणी करू दिला? पुरवठा मे, २0१८ मध्येच बंद का केला नाही, असे अनेक प्रश्न समोर आले आहेत.गाठीभेटी संस्कृतीला वाव!माधव वैद्य यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, मुदत संपूनही जे कंत्राटदार भोजन पुरवठा करीत आहेत, त्यांनाच नवीन निविदा प्रक्रिया अंतिम होईपर्यंत पुरवठ्याचे काम द्यावे, असा प्रस्ताव जिल्हा समाजकल्याण अधिकाºयांनी आम्हाला पाठविला, तरच आम्ही मुदतवाढ देऊ आणि आधीची देयकेही दिली जातील. वैद्य यांच्या या भूमिकेमुळे पुरवठादार, अधिकाºयांनी ‘गाठीभेटी’ संस्कृतीतून ‘अर्थपूर्ण’ व्यवहार केले, तर त्याच पुरवठादारांचे कंत्राट पुढे चालू ठेवले जाईल, असा दाट संशय व्यक्त केला जात आहे.विविध वादग्रस्त निर्णयांमुळे सामाजिक न्याय विभाग हा सध्या विधिमंडळाच्या लोकलेखा समितीच्या रडारवर आहे. सामाजिक न्याय विभागाच्या अनेक निर्णयांबद्दल लोकलेखा समितीने आपल्या अहवालात विभागाला धारेवर धरले होते. मुदत संपूनही भोजन पुरवठा सुरूच ठेवला, म्हणून लोकलेखा समितीने कानउघाडणी करू नये, म्हणून पुरविलेल्या भोजनाचा पैसा न देण्याची भूमिका विभागाने घेतली असल्याचे सांगण्यात येत आहे.आम्ही भोजन पुरवठा कसा चालू ठेवणार?एप्रिल ते आॅगस्ट या काळात पुरविलेल्या भोजनाचा पैसाच मिळणार नसेल तर आम्ही भोजन पुरवठा चालू कसा ठेवणार, असा सवाल या पुरवठादारांनी केल्याने मागास विद्यार्थ्यांच्या जेवणाचे वांदे होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Socialसामाजिकnewsबातम्या