शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

असाही ‘सामाजिक न्याय’ : मागासवर्गीय विद्यार्थ्यांना सरकार ठेवणार उपाशी! विचित्र आदेशाने खाण्याचे वांदे  

By यदू जोशी | Updated: August 14, 2018 06:11 IST

वसतिगृहातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना भोजन पुरविणाऱ्या पुरवठादारांचे पैसे देऊ नका, असा आदेश काढून राज्याच्या सामाजिक न्याय विभागाने मागास विद्यार्थ्यांच्या तोंडचा घास हिरावून घेतला आहे.

मुंबई - वसतिगृहातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना भोजन पुरविणाऱ्या पुरवठादारांचे पैसे देऊ नका, असा आदेश काढून राज्याच्या सामाजिक न्याय विभागाने मागास विद्यार्थ्यांच्या तोंडचा घास हिरावून घेतला आहे.राज्यात मागास विद्यार्थ्यांसाठी ४३५ वसतिगृहे असून, त्यात जवळपास ४५ हजार विद्यार्थी राहतात. शासकीय वसतिगृहांसाठी नवीन भोजन कंत्राट देण्याची प्रक्रिया सुरू आहे. पूर्वीच्या पुरवठादारांना भोजन पुरविण्याचे कंत्राट हे एप्रिल २०१८ पर्यंतच देण्यात आलेले होते. त्यानंतरही त्यांनी भोजन पुरविले.मात्र, आता त्यांनी एप्रिल २०१८ नंतर पुरविलेल्या भोजनाची देयके देऊ नयेत, असा विचित्र आदेश समाज कल्याण आयुक्तालयाचे सहआयुक्त माधव वैद्य यांनी काढला आहे. पुरवठादार हे भोजनाचा पुरवठा एप्रिलनंतरही करीत असल्याची बाब तीन-चार महिन्यांनंतर आयुक्तालयाच्या लक्षात कशी आली? जर कंत्राटाची मुदत संपली होती, तर भोजन पुरवठा का आणि कोणी करू दिला? पुरवठा मे, २0१८ मध्येच बंद का केला नाही, असे अनेक प्रश्न समोर आले आहेत.गाठीभेटी संस्कृतीला वाव!माधव वैद्य यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, मुदत संपूनही जे कंत्राटदार भोजन पुरवठा करीत आहेत, त्यांनाच नवीन निविदा प्रक्रिया अंतिम होईपर्यंत पुरवठ्याचे काम द्यावे, असा प्रस्ताव जिल्हा समाजकल्याण अधिकाºयांनी आम्हाला पाठविला, तरच आम्ही मुदतवाढ देऊ आणि आधीची देयकेही दिली जातील. वैद्य यांच्या या भूमिकेमुळे पुरवठादार, अधिकाºयांनी ‘गाठीभेटी’ संस्कृतीतून ‘अर्थपूर्ण’ व्यवहार केले, तर त्याच पुरवठादारांचे कंत्राट पुढे चालू ठेवले जाईल, असा दाट संशय व्यक्त केला जात आहे.विविध वादग्रस्त निर्णयांमुळे सामाजिक न्याय विभाग हा सध्या विधिमंडळाच्या लोकलेखा समितीच्या रडारवर आहे. सामाजिक न्याय विभागाच्या अनेक निर्णयांबद्दल लोकलेखा समितीने आपल्या अहवालात विभागाला धारेवर धरले होते. मुदत संपूनही भोजन पुरवठा सुरूच ठेवला, म्हणून लोकलेखा समितीने कानउघाडणी करू नये, म्हणून पुरविलेल्या भोजनाचा पैसा न देण्याची भूमिका विभागाने घेतली असल्याचे सांगण्यात येत आहे.आम्ही भोजन पुरवठा कसा चालू ठेवणार?एप्रिल ते आॅगस्ट या काळात पुरविलेल्या भोजनाचा पैसाच मिळणार नसेल तर आम्ही भोजन पुरवठा चालू कसा ठेवणार, असा सवाल या पुरवठादारांनी केल्याने मागास विद्यार्थ्यांच्या जेवणाचे वांदे होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Socialसामाजिकnewsबातम्या