शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह आणि एकनाथ शिंदेंमध्ये ५० मिनिटे बैठक; रवींद्र चव्हाणांबाबत तक्रारीचा सूर, काय घडलं?
2
दिल्लीत तक्रार अन् मुंबईत डिल? उपमुख्यमंत्री पदासाठी शिंदेचा नेता भाजपशी जुळवून घेण्याच्या प्रयत्नात, अंधारेंचा दावा
3
Ashish Shelar:... तर मुंबईत अजित पवार गटाशी युती करणार नाही, आशिष शेलार यांचा इशारा!
4
SBI मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४१,८२६ चं फिक्स व्याज; परताव्याची गॅरंटी
5
आजचे राशीभविष्य - २० नोव्हेंबर २०२५, 'या' राशीच्या व्यक्तींसाठी आज लाभदायी दिवस, शेअर-सट्टा ह्यात धनलाभ होईल
6
Mahayuti: एकनाथ शिंदे दिल्लीत, अजित पवार ‘वर्षा' बंगल्यावर, महायुतीत 'ऑल इज वेल'?
7
Dombivli: डोंबिवलीत भाजप मजबूत, मनसेच्या माजी नगरसेवकांसाठी शिंदेसेनेने टाकले जाळे!
8
Ulhasnagar: पक्षांतर करणाऱ्यांच्या फोटोला आधी फासले काळे; नंतर सन्मानाने स्थान!
9
India- Israel: भारत-इस्रायलचे संबंध आणखी होणार वृद्धिंगत!
10
Andhra Pradesh: आंध्र प्रदेशात सात नक्षलवाद्यांचा खात्मा, ५० जणांना अटक; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त
11
Palghar: पालघरमध्ये शिक्षकाच्या मारहाणीला घाबरून मुलं लपली जंगलात, मग पुढं काय घडलं?
12
SC: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे का ढकलत नाहीत? न्यायालयाकडून राज्य सरकारला जाब
13
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
14
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
15
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
16
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
17
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
18
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
19
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
20
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
Daily Top 2Weekly Top 5

क्रिकेटमध्ये अशा चुका होत असतात

By admin | Updated: July 13, 2017 02:11 IST

‘चॅम्पियन्स ट्रॉफी अंतिम सामन्यानंतर माझ्याविषयी कोण काय बोलतं यावर मी विचार करत नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ‘चॅम्पियन्स ट्रॉफी अंतिम सामन्यानंतर माझ्याविषयी कोण काय बोलतं यावर मी विचार करत नाही. क्रिकेटमध्ये अशा चुका होत असतात. अशा चुका मुद्दामहून होत नाही,’ अशा शब्दांत भारताचा स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजा याने भारत - पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफी अंतिम सामन्याविषयी आपली प्रतिक्रीया दिली. इंग्लंडमध्ये पाकिस्तानविरुद्ध झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी अंतिम सामन्यात जडेजा व हार्दिक पांड्या यांच्यात झालेल्या गोंधळामुळे पांड्या धावबाद झाला होता. यानंतर क्रिकेटप्रेमींनी सोशल मीडियाद्वारे जडेजावर टीका केली होती. याविषयी विचारले असता जडेजा म्हणाला की, ‘जे कट्टर क्रिकेटप्रेमी आहेत, त्यांना माहित आहे की क्रिकेटमध्ये अशा चुका होत असतात. असे धावबाद कोणताही खेळाडू मुद्दामहून करत नाही. ती एक नकळतपणे झालेली चुक होती आणि खेळामध्ये असे होत असते.’वेस्ट इंडिज दौऱ्याहून जडेजा थेट मुंबईत बुधवारी एका कार्यक्रमासाठी उपस्थित झाला होता. यावेळी त्याने म्हटले की, ‘आयपीएल युवा खेळाडूंसाठी खूप चांगली संधी असते. मी आयपीएलद्वारेच राजस्थान रॉयल्स संघातून स्वत:ला सिध्द केले. माझ्यासाठी ती मोठी संधी होती. निवडकर्त्यांचे लक्ष वेधण्याचा माझा प्रयत्न होता. प्रत्येक युवा खेळाडूने आयपीएलद्वारे मिळालेली संधी साधली, तर तो उच्च क्रिकेट खेळू शकतो.’विदेशामध्ये आश्विन - जडेजा अपयशी ठरतात अशी नेहमी टीका होते, याबाबत विचारले असता जडेजा म्हणाला, ‘टिकाकारांचे काम असते टीका करणे. मी त्यांच्यासाठी नाही, तर माझ्यासाठी खेळतो. मी प्रत्येक परिस्थितीमध्ये माझा सर्वोत्तम खेळ करण्याचा प्रयत्न करतो.’ तसेच, ‘मी माझ्या खेळामध्ये काही खास बदल केले नव्हते. माझे सर्व लक्ष खेळावर केंद्रीत होते. महत्त्वाचे म्हणजे मी अधिक मेहनत घेण्यावर भर दिला आणि त्याचा मोठा फायदा झाला,’ असेही जडेजाने म्हटले.>आज लोकांकडे वेळेची कमतरता आहे. टी२० सामना साडेतीन तासांत संंपतो. एकेरी दुहेरीपेक्षा क्रिकेटप्रेमींना चौकार षटकार आवडतात. त्यामुळे टी२० लोकप्रिय आहे. पण यामुळे कसोटी क्रिकेट अजिबात संपणार नाही. जागतिक स्तरावर कसोटी क्रिकेटला मोठा मान आहे. इंग्लंडसारख्या देशात आजही मोठ्या संख्येने कसोटी क्रिकेट बघायला क्रिकेटप्रेमी येतात. टी२० आणि कसोटी क्रिकेट पूर्णपणे वेगळे असून, ते आपआपल्या जागी आहेत. - रवींद्र जडेजा