शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

“आता निवडणुका झाल्यास भाजप तोंडावर आपटेल, जागे व्हा अन्यथा...”; पक्षाला घरचा आहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2023 17:38 IST

राज्यात आज निवडणुका झाल्यास महाविकास आघाडी भाजप-शिंदे गटाला चितपट करू शकते, असा दावा करण्यात आला आहे.

Maharashtra Politics: राज्यात अनेकविध राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. एकाबाजूला लोकसभा निवडणुकीसाठी पक्षांनी जय्यत तयारीला सुरुवात केली असून, दुसरीकडे लोकसभेसोबत राज्यातील विधानसभा निवडणुका होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. यातच आता निवडणुका झाल्यास भाजपला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागू शकते, असा घरचा आहेर देत पक्षातील ज्येष्ठ नेत्याने आता तरी जागे व्हा, असा सल्ला दिला आहे. 

भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी एक ट्विट करत महाराष्ट्र भाजपला जागे होण्याचे आवाहन केले आहे. आज निवडणुका झाल्या तर भाजप तोंडघशी पडणार हे निश्चित. महाविकास आघाडी त्यांना अगदी आरामात चितपट करण्याच्या स्थितीत आहे. भाजप नेतृत्वाने झोपेतून जागे व्हावे, असा सल्ला सुब्रमण्यम स्वामी यांनी दिला आहे. 

एनडीएची मतदानाची टक्केवारी केवळ ३९.३ टक्के

आज महाराष्ट्रात निवडणुका झाल्या, तर एनडीएची मतदानाची टक्केवारी केवळ ३९.३ टक्के राहणार आहे. भाजपला ३३.८ टक्के तर शिवसेना शिंदे गटाला केवळ ४.४ टक्के मते मिळण्याचा अंदाज आहे. दुसरीकडे महाविकास आघाडी झपाट्याने आपला जनाधार वाढवत आहे. स्वामींच्या म्हणण्यानुसार, आज निवडणूक झाल्यास महाविकास आघाडीला ४७.७ टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसला १९.९ टक्के मते मिळू शकतील, तर राष्ट्रवादीला १५.३ टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाला १२.५ टक्के मते मिळण्याची अपेक्षा आहे, असे म्हटले जात आहे. आज निवडणुका झाल्या तर महाविकास आघाडीला भाजपपेक्षा ८.४ टक्के जास्त मते मिळण्याची चिन्हे असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, भाजपने तातडीने सावध व्हायला हवे, असे स्वामी म्हणतात. महाराष्ट्र हे मोठे राज्य आहे. तिथे भाजपचा एवढा पराभव झाला तर ते भविष्यासाठी चांगले नाही. भाजप नेतृत्वाने झोपेतून जागे होऊन पक्षाची स्थिती मजबूत करण्यासाठी आवश्यक पावले उचलावीत, असा सल्ला स्वामींनी दिला आहे. 

 

टॅग्स :Subramanian Swamyसुब्रहमण्यम स्वामीBJPभाजपाMahavikas Aghadiमहाविकास आघाडी