शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
4
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
5
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
6
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
7
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
8
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
11
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
12
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
13
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
14
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
19
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
20
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत

उपराजधानीत सायबर गुन्ह्यांचा व्हायरस वाढतोय!

By admin | Updated: January 9, 2017 16:29 IST

सायबर क्राईम किंवा आयटी अ‍ॅक्टअंतर्गत २६८ गुन्हे दाखल झाले आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे यातील ७० टक्के गुन्हे हे गेल्या २ वर्षांतील आहेत.

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 9 : गेल्या ५ वर्षांमध्ये उपराजधानीत इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कॅशलेसच्या युगात आता ई-सेवा थेट मोबाईलपर्यंत येऊन पोहोचल्या आहेत. युवापिढीसाठी तर इंटरनेट दैनंदिन जीवनातील अविभाज्य घटक आहे. परंतु ई-क्रांतीसोबतच सायबर क्राईमच्या प्रकरणांमध्येदेखील वाढ होत आहे. गेल्या ५ वर्षांमध्ये नागपुरात सायबर क्राईम किंवा आयटी अ‍ॅक्टअंतर्गत २६८ गुन्हे दाखल झाले आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे यातील ७० टक्के गुन्हे हे गेल्या २ वर्षांतील आहेत. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.

उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी शहरातील सायबर क्राईमसंदर्भात माहितीच्या अधिकाराअंतर्गत विचारणा केली होती. २०१२ ते नोव्हेंबर २०१६ या कालावधीत सायबर क्राईमचे किती गुन्हे दाखल करण्यात आले, किती आरोपींना अटक करण्यात आली हे प्रश्न त्यांनी विचारले होते. यासंदर्भात मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार जानेवारी २०१२ ते नोव्हेंबर २०१६ या कालावधीत भादंवि, सायबर तसेच आयटी अ‍ॅक्ट मिळून एकूण २६८ गुन्हे दाखल करण्यात आले. २०१५ व २०१६ मध्ये यातील सुमारे ७० टक्के म्हणजेच १८८ गुन्ह्यांची नोंद झाली. दरवर्षी सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढतच असल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे.सायबर गुन्ह्यांची वर्षनिहाय आकडेवारीवर्ष गुन्हे२०१२१५ २०१३१९ २०१४४६२०१५ ९८२०१६ (नोव्हेंबरपर्यंत)९० १०३ गुन्हेगारांना अटकमाहितीच्या अधिकाराअंतर्गत प्राप्त झालेल्या माहितीनुसार गेल्या पाच वर्षात ह्यसायबर क्राईमच्या गुन्ह्याअंतर्गत १०३ गुन्हेगारांना अटक करण्यात आली. गेल्या २ वर्षात हा आकडा ५० इतका होता.