शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
6
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
7
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
8
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
9
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
10
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
11
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
12
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
13
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
14
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
15
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
16
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
17
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
18
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
19
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती

10th,12th Exam: कुठलाही ताण न घेता दहावी, बारावीच्या परीक्षेची तयारी विद्यार्थ्यांनी सुरू ठेवावी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2021 06:09 IST

10th,12th Exam: इतर मंडळांनी दहावीच्या परीक्षांबाबत जाहीर केलेला पॅटर्न राज्य मंडळासाठी लागू होईल का?

प्रत्येक शिक्षण मंडळ स्वायत्त आहे. त्यांची स्वतःची धोरणे, निर्णय प्रणाली असते. सध्याची काेराेनाची परिस्थिती पाहता विद्यार्थी हित व सुरक्षितता लक्षात घेऊनच परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तज्ज्ञांशी चर्चा सुरू आहे. त्यानुसार नवीन वेळापत्रकाची आखणी हाेईल; मात्र इतर मंडळांप्रमाणेच निर्णय घेतला जाणार की नाही, याबद्दल आताच सांगता येणार नाही. काेराेनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर दहावी, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. इतर मंडळांप्रमाणे परीक्षा रद्द करून अंतर्गत मूल्यमापनावर निकाल जाहीर करावा, अशी मागणी पालकांकडून होत आहे. त्यामुळेच राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची परीक्षेसंदर्भातील नेमकी काय भूमिका आहे, हे राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांच्याकडून जाणून घेण्याचा केलेला प्रयत्न.

नवीन वेळापत्रक विद्यार्थ्यांना कधीपर्यंत मिळेल ?नवीन वेळापत्रकासाठी मंडळाचे सदस्य काम करीत असून, त्याची आखणी करून लवकरात लवकर ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहाेचावे, असा आमचा प्रयत्न आहे. नियमित व दिव्यांग विद्यार्थ्यांना वाढीव वेळ, आपल्याच शाळेत / महाविद्यालयांत केंद्र, सुरक्षात्मक उपाययोजना या सवलती कायम राहतील. प्रात्यक्षिक परीक्षांचे नियोजनही अशाच प्रकारे हाेईल. जून महिन्यात परीक्षेचे वेळापत्रक लागणार असल्याने देण्यात आलेली जून महिन्यातील विशेष संधी विद्यार्थ्यांना पुन्हा दिली जाईल की नाही, याचा पुनर्विचार करण्यात येईल.

पालकांनी मागणी केलेल्या ऑनलाइन परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन अशा पर्यायांचा विचार सुरू आहे का?दहावी, बारावीच्या परीक्षांचे मूल्यमापन हा त्या विद्यार्थ्याच्या शैक्षणिक भवितव्याचा पाया असतो. कुठे प्रवेश घ्यायचा, कोणती शाखा निवडायची, हे या मूल्यांकनावरूनच ठरते. त्यामुळे वरील पर्याय ही तात्पुरती व्यवस्था असली तरी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताच्या दृष्टीनेही विचार व्हायला हवा. म्हणूनच परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला.

निकाल कमीतकमी वेळात लागतील, यादृष्टीने काेणते प्रयत्न सुरू आहेत?सुरक्षित पद्धतीने परीक्षा घेणे हे जसे आव्हान आहे तसेच त्यांचा निकाल कमीत कमी वेळेत लावणे हे यंदाचे शिक्षण मंडळाचे उद्दिष्ट आहे. त्यादृष्टीने जिल्हा पातळीपासून राज्य पातळीपर्यंत यंत्रणेची चाचपणी केली जात आहे. विभागीय मंडळाकडून पेपर्स येण्याची वाट पाहण्यापेक्षा जिल्हा पातळीवर थेट शिक्षकांकडून त्यांचे कलेक्शन होईल, असे प्रयत्न सुरू आहेत.

शिक्षकांच्या लसीकरणासंदर्भात काय नियोजन आहे?सद्यस्थितीत राज्यातील ४५ वर्षे व त्यापुढील शिक्षक लसीकरण करून घेत आहेत, त्यांना तशा सूचना दिल्या आहेत. ४५ वर्षांखालील शिक्षक, पर्यवेक्षक, परीक्षांच्या कामात सहभागी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या लसीकरणासाठी शिक्षण मंडळाने आरोग्य विभागास प्रस्ताव दिला आहे. येत्या काही दिवसांत त्यावर निर्णयाची अपेक्षा असून, परीक्षेपूर्वी लसीकरण पूर्ण करून घेतले जाईल.

पालक, विद्यार्थ्यांसाठी काय संदेश आहे?काेराेनामुळे सुरक्षेची भीती विद्यार्थी, पालकांच्या मनात आहेच, शिवाय परीक्षा कशा पार पडतील, याचा मानसिक तणावही आहे; मात्र कुठलाही  ताण न घेेता   परीक्षेची तयारी सुरू ठेवा, मिळालेल्या वेळेकडे संधी म्हणून पाहत तिचा सदुपयोग करा. येणाऱ्या काळात आपण या परिस्थितीतून निश्चितच सुखरूप बाहेर पडून नवीन शैक्षणिक करिअरकडे वाटचाल करू, याची खात्री बाळगा.(मुलाखत : सीमा महांगडे)

 

टॅग्स :examपरीक्षा