शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारची शेतकऱ्यांना भेट; 'पंतप्रधान धन-धान्य कृषी योजने'साठी २४ हजार कोटींची तरतूद
2
मोठी बातमी! आनंदराज आंबेडकरांची एकनाथ शिंदेंना साथ; शिंदेसेना-रिपब्लिकन सेनेच्या युतीची घोषणा
3
MTNL Defaults: कर्जात बुडालीये 'ही' सरकारी कंपनी; बँकांना परत करू शकत नाहीये ८५८५ कोटींचं लोन, जाणून घ्या
4
बाबर क्रूर, अकबर सहिष्णू तर औरंगजेब मंदिर पाडणारा', NCERT ने पुस्तकात केले मोठे बदल
5
१६०० कोटी पगार! मेटा 'या' व्यक्तींसाठी उधळतोय पाण्यासारखा पैसा, कारण ऐकून धक्का बसेल!
6
तिकीट काढले विमानाचे, प्रवास घडला कारचा; Air India च्या प्रवाशांसोबत नेमके काय घडले?
7
भारताकडून ब्राह्मोस, जपानकडून युद्धनौका, आता तैवानसोबत मिळून चीनला आव्हान देणार हा देश
8
लँडिंगसाठी जागाच मिळेना, एकाच वेळी १७३ प्रवाशांचा जीव होता धोक्यात; इंडिगोच्या पायलटने 'अशी' दाखवली हुशारी!
9
गुहेत राहणाऱ्या रशियन महिलेने कसे कमावले पैसे, भारतात स्थायिक होण्याचे कारणही सांगितले
10
मुलाच्या हव्यासापोटी जन्मदाता बापच झाला हैवान; ७ वर्षांच्या लेकीला कालव्यात फेकून मारलं
11
श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती दररोज करता का? शुभ-लाभ होतात, स्वामी कायम सोबत राहतात!
12
Chaturmas 2025: चातुर्मासात गुरुवारपासून सुरू करा दत्तबावनी, फक्त पाळा 'हे' नियम!
13
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळ पहिल्या क्रमांकावर राज्य करणारे गोलंदाज!
14
एकटे PM मोदीच आठवड्याला १०० तास काम करतात; '७० तास'वरून ट्रोल झालेल्या नारायण मूर्तींचं प्रशस्तीपत्रक
15
गुवाहाटीची रहीमा सोनमपेक्षाही भयंकर! पतीला संपवलं अन् बेडरूमध्येच गाडलं, शांततेत झोपली; कशी पकडली गेली?
16
सूर्य गोचराने शुभ राजयोग: ७ राशींचे कल्याण, भाग्याची साथ; महिनाभर ‘हे’ करा, लाभच लाभ मिळवा!
17
चला हवा येऊ द्या! CHYD चं नवं शीर्षक गीत रिलीज; कॉमेडीच्या गँगवॉरची झलक बघा
18
मस्क अजूनही नंबर १, पण झुकरबर्गला बसला मोठा धक्का! AI च्या कामगिरीने 'हा' उद्योगपती झाला जगात दुसरा श्रीमंत!
19
IND vs ENG: शुभमन गिलने कोहलीसारखा ब्रँड बनण्याचा प्रयत्न करू नये, माजी क्रिकेटपटूचा महत्त्वाचा सल्ला!

पक्षकारांना निष्कारण त्रास देण्याच्या वृत्तीवर ताशेरे

By admin | Updated: March 18, 2016 02:37 IST

मुळात कायद्यानुसार न्यायालयात सादर करायच्या अर्जासोबत जो दस्तावेज जोडण्याची गरजच नाही असा दस्तावेज न जोडल्याचा आक्षेप घेऊन संबंधित प्रकरण न्यायालयापुढे सुनावणीसाठी

मुंबई : मुळात कायद्यानुसार न्यायालयात सादर करायच्या अर्जासोबत जो दस्तावेज जोडण्याची गरजच नाही असा दस्तावेज न जोडल्याचा आक्षेप घेऊन संबंधित प्रकरण न्यायालयापुढे सुनावणीसाठी लावण्याचे रोखून ठेवून पक्षकारांना निष्कारण त्रास देण्याच्या स्वत:च्याच प्रशासनाच्या वृत्तीवर मुंबई उच्च न्यायालयाने कडक ताशेरे मारले आहेत.बुधवारी दिलेल्या निकालपत्रात हे ताशेरे मारताना न्या. गौतम पटेल न्यायालयाच्या प्रशासनास उद्देशून लिहितात, या वृत्तीमुळे न्यायालयांविषयी वाईट प्रतिमा जनमानसात तयार होते. न्याय मागण्यासाठी येणाऱ्या पक्षकाराला, निरर्थक अशी आडमुठी भूमिका घेऊन, आपण अमूक-तमूक करता येऊ शकत नाही, असे सांगून वाटेला लावू शकत नाही. लोकांचे कायद्याच्या समस्या सोडविण्यासाठी न्यायालये आहेत व प्रत्येक समस्येवर कायद्याने तोडगा काढला जाऊ शकतो. हे करत असताना आपण कायद्याचे पालन जरूर करायला हवे. पण जेथे कायद्यात एखादे बंधन नाही, असे बंधन नियम अथवा कार्यपद्धतीच्या नावाने घालणे न्यायाला साथ देणार नव्हे तर त्यात बाधा आणणारे आहे.कल्याण येथील विनिता अंकित वर्मा या विधवेने वारसा प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज केला होता. त्यांचे पती अंकित भगवतीचरण वर्मा यांचे गेल्या वर्षी ११ मे रोजी निधन झाले. आपण आणि १६ वर्षांची मुलगी व आठ वर्षांचा मुलगा असे तिघे दिवंगत अंकित यांचे वारस असल्याचे विनिता यांनी त्यांच्या अर्जात म्हटले होते. तसेच अंकित यांच्या आईचे त्यांच्याआधीच निधन झाल्याने नमूद केले होते. विनिता यांनी अर्जासोबत अंकित यांचा मृत्यूदाखला व दोन्ही मुलांचे जन्मदाखले जोडले होते. परंतु अंकितच्या आईचा मृत्यूदाखला जोडला नाही, असा आक्षेप घेऊन प्रशासनाने त्यांचा अर्ज रोखला होता. प्रशासनाने ज्या मृत्यू दाखल्याचा आग्रह धरला तसा दाखला सादर करणे अपेक्षितच नाही, असा निष्कर्ष न्या. पटेल यांनी नोंदविला. अशा कोणत्याही प्रकरणात न्यायालयाने कारणास्तव अशा पूर्वमृत्यू झालेल्या व्यक्तीचा मृत्यूदाखला सादर करण्याचे निर्देश दिल्याखेरीज तसा दाखला अर्जासोबत जोडण्याचा आग्रह धरू नये, असे निर्देशही त्यांनी दिले. (विशेष प्रतिनिधी)सर्व आयुष्य यातच जाईलन्या. पटेल यांनी म्हटले की, मुळात वारसा प्रमाणपत्रामुळे ते घेणाऱ्यांना मृताच्या संपत्तीत कोणताही कायदेशीर हक्क मिळत नाही. त्यामुळे मृताच्या पश्चात त्याच्या मालमत्तेचे अशा व्यक्ती फार अशा प्रमाणपत्रामुळे व्यवस्थापक ठरतात. अशा प्रामणपत्रासाठी केलेल्या अर्जासोबतही आधीच्या पिढ्यांच्या मृत्यूदाखल्यांचा प्रशासन आग्रह धरू लागले तर पक्षकाराचे संपूर्ण आयुष्य असे दाखले गोळा करण्यातच जाईल. कारण एकदा अशी निरर्थक मागणी करायची म्हटले की, ती केवळ लगेचच्या मागच्या पिढीपुरती मर्या दित न राहता कितीही पिढ्यांपर्यंत मागे जाऊ शकेल.