शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फुटीची जोरदार चर्चा, राऊतांचा दावा आणि प्रकाश आंबेडकरांच्या भविष्यावरून चर्चेला उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2023 07:55 IST

Maharashtra Politics: संजय राऊत यांनी पवार यांच्या हवाल्याने केलेला दावा आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी १५ दिवसांत राज्याच्या राजकारणात दोन मोठे स्फोट होणार असल्याचा केलेला दावा यावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. 

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यातील दोन दिवसांपूर्वीच्या भेटीवेळी हजर असलेले खा. संजय राऊत यांनी पवार यांच्या हवाल्याने केलेला दावा आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी १५ दिवसांत राज्याच्या राजकारणात दोन मोठे स्फोट होणार असल्याचा केलेला दावा यावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. 

राऊत यांनी शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे गट) मुखपत्रात रविवारी असे लिहिले की, उद्धव ठाकरेंसोबत मी शरद पवार यांना भेटलो. तेव्हा पवार हे ठाकरेंना म्हणाले की, कोणालाही मनापासून सोडून जायचे नाही. पण कुटुंबाला टार्गेट केले जात आहे. कुणाला काही व्यक्तिगत निर्णय घ्यायचे असतील तर तो त्यांचा प्रश्न आहे पण पक्ष म्हणून भाजपबरोबर जाण्याचा निर्णय आम्ही घेणार नाही. या बैठकीत पवार-ठाकरे यांचे असे मत पडले की जे भाजपबरोबर जातील ते राजकीय आत्महत्या करतील. पवार असेही म्हणाले की, जे भीतीने आज पक्ष सोडत आहेत त्यांना मी सांगतो की तुम्ही भाजपत गेल्याने टेबलावरची फाइल कपाटात जाईल पण ईडी, सीबीआयच्या फायली कधीही बंद होत नाहीत.  पवार-ठाकरे यांच्या या बैठकीतील माहिती खा. राऊत यांनी उघड केल्यानंतर भाजपमध्ये जाण्यासाठी पवार यांच्या कुटुंबातील कोणावर दबाव आहे, अजित पवार  भाजपसोबत जाणार का, या चर्चांना उधाण आले. 

असे लढवले गेले तर्कअजित पवार हे राष्ट्रवादीच्या ३५ ते ४० आमदारांसह भाजपसोबत जातील व मुख्यमंत्री होतील असा दावा एका इंग्रजी दैनिकाने रविवारी केला. मध्यंतरी अजित पवार हे पुण्यातून एकाएकी नॉट रिचेबल झाले होते तेव्हा ते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे या राष्ट्रवादीच्या नेत्यांसह दिल्लीत भाजप नेत्यांना भेटले, असे वृत्तही सूत्रांच्या हवाल्याने देण्यात आले. या सगळ्या गोंधळात अजित पवार हे महाविकास आघाडीच्या नागपुरात आयोजित मेळाव्याला उपस्थित होते. 

गृहमंत्री अमित शाह हे शनिवारी मुंबईत आले असता आपली त्यांच्याशी भेट झालीच नाही. मी रात्री मुंबईला गेलो नव्हतो. पुण्यात ‘जिजाई’ या माझ्याच घरी होतो. ढगात गोळ्या मारण्यात अर्थ नाही.- अजित पवार, माजी उपमुख्यमंत्री.

अजित पवारांचे गणित- मुख्यमंत्री शिंदे गटाच्या १६ आमदारांना सर्वोच्च न्यायालयाने अपात्र ठरविले तरी शिंदे सरकार टिकेल, असे भाकीत अजित पवार यांनी वर्तविले. - ते म्हणाले, शिंदे सरकारला १६५ आमदारांचा पाठिंबा आहे. पैकी १६ अपात्र ठरले तरी शिंदे सरकारला १४९ आमदारांचा पाठिंबा असेल. १६ आमदार अपात्र ठरल्यास सभागृहाचे संख्याबळ २७२ असेल. 

राष्ट्रवादी काँग्रेस कधी कोणाचा घात करेल हे सांगता येत नाही. राष्ट्रवादी ज्या सत्तेत आहे त्यात आम्ही राहणार नाही. - संजय शिरसाट, आमदार, शिंदे शिवसेनाअजित पवारांसारखे नेते भाजपसोबत जाणार असतील तर आमचा विरोध नसेल.- खा. गजानन कीर्तीकर, शिंदे गटआमच्या सरकारला जो मदत करेल, समर्थन देईल त्याचे स्वागतच करू. - आशिष शेलार, अध्यक्ष, मुंबई भाजप

फडणवीस काय म्हणाले होते?काँग्रेस व राष्ट्रवादीचे काही आमदार आमच्या संपर्कात असून योग्य वेळी त्यांचा पक्षप्रवेश होईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वीच एका मुलाखतीत म्हटले होते. आमचे सरकार स्थिर असून एकदा शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील, असेही ते म्हणाले होते. 

कारवायांचा धाक दाखवून अजित पवार, रोहित पवार यांच्यावर  दबाव आणला जात असल्याचा आरोप खा. राऊत यांनी नागपुरात माध्यमांशी बोलताना केला. 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारSupriya Suleसुप्रिया सुळे