शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांवर कडक कारवाई होईल, पोलीस महासंचालकांची माहिती; राज ठाकरेंच्या भाषणावरही बोलले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2022 13:29 IST

राज्यात कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचं आणि जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्यात येईल अशा स्पष्ट सूचना राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी दिल्या आहेत.

मुंबई-

राज्यात कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचं आणि जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्यात येईल अशा स्पष्ट सूचना राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी दिल्या आहेत. राज्यात सर्वधर्मांमध्ये एकोपा राहावा यासाठी राज्याचं पोलीस दल तैनात आहे. सर्व पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसंच राज्यात ३० हजार होमगार्ड तैनात आहेत. याशिवाय राज्य राखीव दलाच्या ७ तुकड्या देखील सज्ज आहेत, अशी माहिती रजनीश सेठ यांनी यावेळी दिली. 

राज ठाकरेंच्या भाषणाबाबत बोलत असताना रजनीश सेठ यांनी औरंगाबादचे पोलीस आयुक्त याबाबत कारवाई करण्यात सक्षम आहेत असं म्हटलं आहे. राज ठाकरेंच्या भाषणाचा अभ्यास औरंगाबादच्या पोलीस आयुक्तांकडून केला जात आहे. त्यावर कायदेशीररित्या कारवाई करण्यास औरंगाबादचे पोलीस सक्षम आहेत. ते भाषणाचा अभ्यास करुन निर्णय घेतली, असंही रजनीश सेठ यांनी सांगितलं. तसंच याबाबत आजच कारवाई केली जाण्याचीही शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

मनसेच्या १५ हजार कार्यकर्त्यांना नोटीसमशिदीवरील भोंग्यांच्या विरोधात मनसेनं घेतलेल्या आक्रमक भूमिकेच्या पार्श्वभूमीवर राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे मनसेच्या १५ हजार जणांवर प्रतिबंधात्मक नोटीस पाठविण्यात आलेली आहे, असं पोलीस महासंचलकांनी सांगितलं. कायदा आणि सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. सामाजिक एकोपा टिकून राहावा यासाठी स्थानिक पातळीवर अनेक बैठका घेण्यात आल्या आहेत. कायद्याची अंमलबजावणी ही पोलिसांची जबाबदारी आहे. महाराष्ट्राच्या संपूर्ण जनतेला मी आवाहन करतो की शांतता व सुव्यवस्था राखावी आणि आम्हाला सहकार्य करावं, असं रजनीश सेठ म्हणाले. 

 

टॅग्स :PoliceपोलिसMNSमनसेRaj Thackerayराज ठाकरे