शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
4
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
5
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
6
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
7
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
8
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
9
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
10
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
11
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
12
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
13
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
14
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
15
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
16
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
17
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
18
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
19
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
20
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
Daily Top 2Weekly Top 5

'वंचित'च्या ताठर भूमिकेमुळे भाजपच्या स्वबळाच्या नाऱ्याला पाठबळ ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2019 17:48 IST

लोकसभा निवडणुकीत वंचितने आघाडीकडे महाराष्ट्रातील ४८ पैकी २४ जागांची मागणी केली होती. ही मागणी नक्कीच स्वीकार्ह नव्हती. त्यामुळे आघाडी होऊ शकली नाही. वंचितने तीच भूमिका विधानसभा निवडणुकीतही घेतल्याचे दिसून येते.

मुंबई - लोकसभा निवडणुकीतील अभूतपूर्व यश, मराठा आरक्षणाचा लागलेला निकाल आणि सध्या विरोधी पक्षातील नेत्यांचं सत्ताधारी पक्षांमध्ये होत असलेलं पक्षांतर यामुळे भारतीय जनता पक्ष राज्यात मजबूत झाला आहे. तर विरोधकांपुढे पक्षातील नेते टिकवून निवडणुकीला सामोरे जाण्याचे आव्हान आहे. त्यातच वंचित बहुजन आघाडीने विरोधकांचे राहिलेले अवसानही गळून गेले आहे. वंचितने लोकसभेप्रमाणेच जागा वाटपाच्या बाबतीत ताठर भूमिका घेतल्यामुळे आघाडीत त्यांचा समावेश कठिण दिसत आहे. तस झाल्यास, याचा सत्ताधारी भाजपला स्वबळावर लढण्यास फायदाच होणार आहे.

२०१४ मध्ये भाजपचे स्वबळावर १२२ आमदार निवडून आले होते. यात नक्कीच भर पडणार अशी राज्यात आहे. शिवसेना भाजप युती झाल्यास भाजपला बहुमताला हव्या त्यापेक्षा कमी जागा लढविण्यासाठी मिळतील. बहुमतासाठी भाजपला २०१४ मध्ये मिळवलेल्या जागांमध्ये ३३ आमदारांची भर घालावी लागणार आहे. त्यामुळे भाजपकडून स्वबळावर निवडणुकीला सामोर जाण्याची चाचपणी सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यातच वंचित पक्ष आघाडीसोबत न गेल्यास याचा लाभ भाजपलाच होणार हे स्पष्टच आहे.

लोकसभा निवडणुकीत वंचितने आघाडीकडे महाराष्ट्रातील ४८ पैकी २४ जागांची मागणी केली होती. ही मागणी नक्कीच स्वीकार्ह नव्हती. त्यामुळे आघाडी होऊ शकली नाही. वंचितने तीच भूमिका विधानसभा निवडणुकीतही घेतल्याचे दिसून येते. वंचितने काँग्रेसला ४० जागांची ऑफर दिली आहे. मुळातच गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या ४० जागा निवडून आल्या आहेत. त्यामुळे काँग्रेसमधून वंचितशी चर्चा करण्यास कुणी इच्छूक दिसत नाही. तर वंचितही आघाडीसाठी नवनवीन अटी घालत आहे. त्यामुळे वंचित आघाडीत येणे अशक्यप्राय दिसत आहे.

दरम्यान वंचितने स्वबळावर निवडणूक लढविल्यास भाजपही पुन्हा एकदा स्वबळावर निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. त्याचं कारण म्हणजे, आघाडीला मिळणारी मतं वंचितमुळे विभागली जाणार आहे. तर राज्यात भाजपची ताकत शिवसेनापेक्षा नक्कीच अधिक आहे. त्यामुळे स्वबळावर लढल्यास भाजपला बहुमताचा आकडा गाठणे कठिण होणार नाही. त्यामुळे वंचित फॅक्टर विधानसभेला भाजपला स्वबळावर लढण्यासाठी फायदेशीर ठरू शकतो.