शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
4
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
5
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
6
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
7
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
8
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
9
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
10
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
11
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
12
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
13
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
14
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
15
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
16
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
17
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
18
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
19
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
20
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची

जगण्याचे बळ !

By admin | Updated: August 14, 2016 02:56 IST

गतिमंद म्हणून जन्माला येणे हा ‘त्या’ मुलांचा दोष नसतो आणि पालकांचाही. मात्र अशा मुलांचे समाजात वावरताना सातत्याने मानसिक खच्चीकरण होत असते. तरीदेखील ही मुले जगत असतात.

- सागर नेवरेकरगतिमंद म्हणून जन्माला येणे हा ‘त्या’ मुलांचा दोष नसतो आणि पालकांचाही. मात्र अशा मुलांचे समाजात वावरताना सातत्याने मानसिक खच्चीकरण होत असते. तरीदेखील ही मुले जगत असतात. धडपडत असतात. अशा मुलांंना जगण्याचे बळ देण्याचे काम करणारे अनेक लोक आहेत. मात्र त्यांच्यापेक्षा वेगळी अशी छाप ‘उमंग चाइल्ड ट्रस्ट’ने पाडली आहे. एक पैसाही न घेता गतिमंद मुलांचे आयुष्य खऱ्या अर्थाने सार्थकी लावणाऱ्या उमंगचा प्रवास ‘सलोनी’मुळे सुरू झाला. आणि आजघडीला मैलाचा दगड पार करणारी ही ट्रस्ट तब्बल ५८ गतिमंद मुलांचे आयुष्य सार्थकी लावण्यासाठी काम करते आहे.उमंग चाइल्ड ट्रस्टच्या अध्यक्षा अश्विनी कराडे यांच्या मुलीला सलोनीलाही असाच काहीसा त्रास होता. जन्मावेळी सलोनीच्या मेंदूला काहीशी हानी झाली. त्यामुळे ती चालेल, बोलेल का? असे अनेक प्रश्न साहजिकच तिच्या कुटुंबीयांसह डॉक्टरांना पडले. यावर उपाय म्हणून डॉक्टरांनी व्यायाम हा पर्याय सांगितला आणि मग सलोनीवर वेगवेगळ्या थेरपी सुरू करण्यात आल्या. ३ महिन्यांपासून तिच्यावर थेरपी सुरू करण्यात आली. तिला व्यायाम शिकवण्यात येऊ लागले. पाच वर्षांनी सलोनीमध्ये फरक जाणवू लागला. इयत्ता चौथी-पाचवीत असताना तिच्यात बऱ्यापैकी सुधारणा झाली. ती चालू लागली, बोलू लागली. त्यामुळे तिच्या बरोबरच्या मुलांच्या पालकांनी सलोनीची आई अश्विनी यांच्याकडे याबाबत विचारणा केली. यावर अश्विनी यांनी या गोष्टी कथन करतानाच सलोनीसारख्या इतर मुलांचाही विचार केला आणि घरच्या घरी गतिमंद मुलांसाठी सेशन्स घेण्यात सुरुवात केली.सेरेब्रल पाल्सी म्हणजे शारीरिक अपंगत्व, मतिमंद, गतिमंद, लर्निंग डिसेबल, आॅटिझम, डाऊन सिंड्रोम हायपर अ‍ॅक्टिव्हिटी अशा अनेक कारणांमुळे मुलांमध्ये मानसिक, शारीरिक विकलांगता येते. या मुलांना जर वेळीच चांगली ट्रीटमेंट दिली तर ही मुले स्वत: जगू शकतात, ही जाणीव त्यांच्यात निर्माण होते. अशा मुलांची ट्रीटमेंट ही विविध पातळ्यांवर चालते. काऊन्सिलिंग, फिजिओथेरपी, आॅक्युपेशनल थेरपी, स्पीचथेरपी, स्पेशल एज्युकेशन या प्रत्येक ट्रीटमेंटसाठी वेगवेगळे सेंटर असतात. एक ट्रीटमेंट झाली की, दुसऱ्या ट्रीटमेंटसाठी दुसऱ्या ठिकाणी पायपीट करावी लागते. मात्र त्यामुळे पैसा आणि वेळ या दोन्ही गोष्टी खर्च होतात. यावर उपाय म्हणून मग अश्विनी कराडे यांनी ‘उमंग चाइल्ड ट्रस्ट’ स्थापन केली. आणि यासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी एकाच छताखाली आणल्या.समाज व्यवस्था या मुलांकडे एका वेगळ्या नजरेने पाहते. संबंधितांना ही मुले ‘वेडी’ आहेत असे वाटते. मात्र या मुलांमध्येही आयक्यू लेव्हल असते. फक्त त्याचे प्रमाण कमी असते आणि त्यांना त्या लेव्हलनुसार शिकवले जात नाही. या सगळ्याचा विचार ट्रस्टने केला. पण हे शिकवायचे म्हणजे ते आपणालाही यायला हवे याचा विचार करत अश्विनी यांनी ‘डिप्लोमा इन लर्निंग डिसेअ‍ॅबिलिटी’, ‘सर्टिफिकेट कोर्स इन आॅटिझम’ स्पेशल एज्युकेशनचे कोर्स केले. पाहता पाहता हा प्रवास मोठा झाला. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील मुलांसाठी ट्रस्टने मोफत उपचार देण्यास सुरुवात केली. आता तर गतिमंद मुलांच्या पालकांच्याही समुपदेशनाचे काम ट्रस्टकडून केले जाते आहे.उमंगचा श्रीगणेशा झाला तेव्हा त्यांच्याकडे केवळ पाच ते दहा गतिमंद मुले होती. त्यांना प्रशिक्षण दिले जात होते. आता या मुलांचा आकडा तब्बल ५८ झाला आहे. महत्त्वाचे म्हणजे काम करण्यासाठी ट्रस्टला अनुदान मिळत नाही. शिवाय त्यांचे काम भाड्याच्या जागेवर चालते. हा सर्व खर्च ट्रस्टचे सहकारी मिळून करतात. इवल्याशा रोपट्याचा आज वटवृक्ष झाला आहे. मात्र हे काम सोपे नाही. गतिमंद मुलांचे आयुष्य ‘सोनरी’ करण्यासाठी आजही हा ट्रस्ट झगडतो आहे. सलोनीच्या निमित्ताने हा प्रवास सुरू झाला असला तरी अजून लांबचा पल्ला गाठायचा आहे.