जव्हारफाटा उड्डाणपुलासाठी रास्ता रोको
By Admin | Updated: October 18, 2016 03:22 IST2016-10-18T03:22:37+5:302016-10-18T03:22:37+5:30
नेहमी होणारे अपघात टाळण्यासाठी उड्डाण पूल व्हावा यासाठी आज शिवसेना व परिसरातील ग्रामस्थांच्या वतीने रास्ता रोको करण्यात आले

जव्हारफाटा उड्डाणपुलासाठी रास्ता रोको
मनोर : मुंबई अहमदाबाद महामार्गावर जव्हार फाट्या जवळ नेहमी होणारे अपघात टाळण्यासाठी उड्डाण पूल व्हावा यासाठी आज शिवसेना व परिसरातील ग्रामस्थांच्या वतीने रास्ता रोको करण्यात आले होते त्यानंतर एन एच आय व आय आर बी कंपनीच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले. उड्डाणपुलासाठी लवकरात लवकर प्रयत्न करू असे आश्वासन त्यांनी दिले.
मनोर जवळील मुंबई अहमदाबाद महामार्गावर जव्हार फाठ्या जवळ नेहमी अपघात होत असून आतापर्यंत चाळीस ते पन्नास लोकांना आपले प्राण मुकावे लागले या आधीही ग्रामस्थ तसेच काही संघटना तर्फे उड्डाण पूल व्हावा यासाठी मागणी करण्यात आली होती मात्र त्या मागणीला संबंधित खात्याने केराची टोपली दाखवली म्हणून आज शिवसेनेचे पंचायत समिती सदस्य पांडुरंग गोवारी यांच्या नेतृत्वाखाली रस्ता रोको करण्यात आला होता त्यावेळी जगदीश धोडी यांनी सांगितले की, उड्डाण पूल झाले नाही तर आंदोलन तीव्र करू आजपासून अपघात घडला आणि माणूस मृत्यू पावला तर आय आर बी कंपनी व एन एच आय वर ३०२ कलमाखाली गुन्हा दाखल करू उप जिल्हाप्रमुख वसंत चव्हाण शिवसेना म्हणाले की गेल्या पाच वर्षात हजारो अपघात होऊन शेकडो लोकांचे प्राण गेले आहे तरी उड्डाण पूल लवकर तयार करावा.
या मागणीसाठी सावरखंड, भोपोली, कोसबाड, नालसेत, टाकव्हल, टेण, नांदगाव येथील सेना रा. कॉंग्रेस भूमीसेना काँग्रेस सर्व पक्षीय कार्यकर्ते ग्रामस्थ सहभागी झाले होते. या वेळी मुंबई अहमदाबाद महामार्ग दहा ते वीस मिनीटे रोखले होते त्यानंतर आंदोलनकर्त्यांना उठवून वाहतूक सुरळीत केली मनोज चाळके यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. (वार्ताहर)
>जव्हार फाटा व नांदगाव उड्डाणपुलाच्या प्रस्तावाच्या मान्यतेसाठी दिल्ली येथील कार्यालयात मी पाठपुरावा करीत आहे.
-दिनेश अग्रवाल, एन एच आय अधिकारी
>आॅर्डर मिळाली की कंपनी लगेच कामाला सुरवात करेल. तसेच जव्हार फाट्यावर उड्डाण पूल होणे गरजेचा आहे नेहमी या ठिकाणी अपघात घडतात निष्पाप लोकांचे प्राण जातात.
- साठे , आय आर बी चे अधिकारी