शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेचं चित्रीकरण थांबवा, शिवसेनेच्या मागणीवर अमोल कोल्हे म्हणाले की...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2020 14:31 IST

Swarajya Rakshak Sambhaji: मालिकेचे चित्रीकरण पूर्ण झाले असून काय दाखवायचे, काय वगळायचे हा निर्णय सर्वस्वी झी मराठी वाहिनीचा असेल

ठळक मुद्देइतिहास लपवता येत नाही, लपवू शकत नाही - अर्जुन खोतकर संभाजी महाराजांचे हाल पाहवू शकत नाही, त्यामुळे हे चित्रीकरण थांबवावे - शिवसेनाकुणाच्या सांगण्यावरून काही बदल करण्याची आवश्यकता आहे असं वाटत नाही - अमोल कोल्हे

मुंबई - झी मराठीवरीलस्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतील चित्रीकरण थांबवावं, संभाजी महाराजांच्या अटकेनंतरचे हाल शिवप्रेमी पाहू शकत नाही, याबाबत मुख्यमंत्री आणि झी मराठीला विनंती करणार आहे असं माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी सांगितले होते. त्यावरुन मालिकेत छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणारे अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे. 

याबाबत डॉ. अमोल कोल्हे म्हणाले की, स्वराज्यरक्षक संभाजी मालिका गेली अडीच वर्षे सुरू असताना जगदंब क्रिएशन्स आणि झी मराठी वाहिनीने जबाबदारीने आणि नैतिक कर्तव्यभावनेने ही मालिका केली आहे. माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या भावनेविषयी आदर आहे परंतु मुळातच काळजी घेतली असल्यामुळे कुणाच्या सांगण्यावरून काही बदल करण्याची आवश्यकता आहे असे मला वाटत नाही असं त्यांनी सांगितले. 

तसेच मालिकेचे चित्रीकरण पूर्ण झाले असून काय दाखवायचे, काय वगळायचे हा निर्णय सर्वस्वी झी मराठी वाहिनीचा असेल, मालिकेत बदल केल्याबाबत जे वृत्त छापलं ते धादांत खोटं आहे. आवश्यक खबरदारी घेऊन मालिकेचे चित्रीकरण केले आहे. कोणताही भाग वगळावा अन्यथा नाही तो अधिकार निर्मात्याचा नाही तर झी मराठी वाहिनीचा आहे असं स्पष्टीकरण डॉ. अमोल कोल्हे यांनी दिलं आहे.

 

काय म्हणाले होते अर्जुन खोतकर?इतिहास लपवता येत नाही, लपवू शकत नाही हे खरं आहे. संभाजी महाराजांचे हाल कोणी केले हे सगळ्यांना माहित आहे, त्यामुळे काही जण यातून खुरापती काढून राज्यातील वातावरण बिघडवू शकतात अशी भीती त्यांनी व्यक्त केली होती, त्यातून काही प्रसंग निर्माण होणार असतील तर त्याची खबरदारी वेळीच घेतली पाहिजे असं अर्जुन खोतकर म्हणाले होते. संभाजी महाराजांचे हाल पाहवू शकत नाही, त्यामुळे हे चित्रीकरण थांबवावे अशी मागणी त्यांनी केली होती. 

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियात स्वराज्य रक्षक संभाजी मालिका संपवण्यात येणार आहे अशी पोस्ट व्हायरल झाली होती. यामध्ये शरद पवारांच्या दबावामुळे ही मालिका बंद होतेय असं म्हटलं होतं. मात्र याबाबत संभाजी महाराजांची भूमिका साकारणारे अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती. या प्रकरणात शरद पवारांना गोवण्याचा दुर्दैवी आणि अत्यंत हीन दर्जाचा प्रयत्न होतोय, त्याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे असं त्यांनी म्हटलं होतं.  

टॅग्स :Dr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हेSwarajya Rakshak Sambhajiस्वराज्य रक्षक संभाजीShiv SenaशिवसेनाZee Marathiझी मराठी