शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
2
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
3
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
4
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
5
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
6
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
7
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
8
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
9
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
10
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
11
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
12
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
13
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
14
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
15
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
17
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
18
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
19
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
20
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?

विलीनीकरण होईपर्यंत स्टिअरिंग हातात नाही, घंटीही वाजणार नाही, एसटी कर्मचाऱ्यांमध्ये­ सरकारविरोधात नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2021 11:01 IST

नाशिक येथील एका कर्मचाऱ्याने सांगितले की, सर्व कर्मचारी विलीनीकरणावर ठाम आहोत. जोपर्यंत डंके की चोट पर विलीनीकरण होत नाही, तोपर्यंत स्टिअरिंग हातात घेणार नाही, बसची घंटी वाजणार नाही. ऑईल बदली होणार नाही.

मुंबई : विलीनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ देण्यात आली आहे. या वेतनवाढीवरून कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे. वेतनवाढ मिळाली तरी विलीनीकरण होईपर्यंत आंदोलन कायम राहणार अशी भूमिका एसटी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण ही प्रमुख मागणी घेऊन सरकार विरुद्ध एसटी कर्मचाऱ्यांचे आझाद मैदान येथे आंदोलन सुरू आहे.

नाशिक येथील एका कर्मचाऱ्याने सांगितले की, सर्व कर्मचारी विलीनीकरणावर ठाम आहोत. जोपर्यंत डंके की चोट पर विलीनीकरण होत नाही, तोपर्यंत स्टिअरिंग हातात घेणार नाही, बसची घंटी वाजणार नाही. ऑईल बदली होणार नाही. आटपाडीतील एका एसटी कर्मचाऱ्याने सांगितले की, विलीनीकरणाच्या मागणीवर सरकारकडून कोणताही निर्णय घेतला जात नाही; पण आता तुटपुंजी वेतनवाढ देऊन आमच्या तोंडाला पाने पुसली आहेत. विलीनीकरण होईपर्यंत संप सुरूच ठेवणार आहे.

अकलूज येथील एका कर्मचाऱ्याने सांगितले की, राज्य सरकारने जाहीर केलेली अंतरिम पगारवाढ ही कर्मचाऱ्यांना मान्य नाहीच. कर्मचाऱ्यांची मागणी मुळात पगारवाढ नाही. एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करून कर्मचारी हा राज्य सरकारी कर्मचारी म्हणून ओळखला गेला पाहिजे. ज्या कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या झाल्यात त्यांच्याबद्दल ब्र शब्दही न काढता तुटपुंजी पगारवाढ जाहीर केल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. 

कामगारांना आवाहन करतो की,  आजचा एक दिवस तुम्ही शांततेत विचार करा. आम्ही सर्व तुमच्यासोबत आहोत. ज्या ठिकाणी मंत्रिमंडळाची पत्रकार परिषद झाली, त्या ठिकाणी आम्ही उपस्थित होतो. त्या पत्रकार परिषदेत सरकारने सकारात्मक भूमिका जाहीर केली आहे. पण, आम्ही तुमच्यासोबत आहोत. जो निर्णय तुम्ही सर्व मिळून घेणार, तो अंतिम निर्णय असणार आहे.  रात्रभर चर्चा करून निर्णय घेऊ आणि आपला निर्णय झाल्यानंतर उद्या  पत्रकार परीषदेत जाहीर करू. - सदाभाऊ खोत, माजी मंत्री  

सरकारने दिलेल्या प्रस्तावावर एसटी कर्मचाऱ्यांसोबत चर्चा करणार आहोत. आम्ही कर्मचाऱ्यांसोबत आहोत, पण यातून काही मध्यम मार्ग निघत असेल, तर या प्रस्तावावर कर्मचाऱ्यांशी आम्ही सकारात्मक चर्चा करणार आहोत. आपले दुकान बंद असल्याने अनेक अतृप्त आत्मे नाराज झाले आहेत. मी आणि सदाभाऊ खोत १५ दिवसांपासून ठाण मांडून बसलो आहोत.  आमच्यावर टीका करण्यात येत आहे. पण, आम्हाला त्याची पर्वा नसून कर्मचाऱ्यांचे हित महत्त्वाचे आहे.- गोपीचंद पडळकर, आमदार

- एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळासोबत गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत यांनी मंगळवारी राज्य सरकारसोबत पहिली बैठक झाली.- बुधवारी सह्याद्री अतिथिगृहात पुन्हा एकदा चर्चेच्या फेरी सुरू झाली. बुधवारी चर्चेच्या दोन फेऱ्या पार पडल्या. यात परिवहनमंत्री अनिल परब, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्यासोबत कर्मचाऱ्यांचे शिष्टमंडळ आणि पडळकर, खोत उपस्थित होते.- चर्चेनंतर मंत्री परब आणि सामंत मंत्रालयाकडे रवाना झाले. मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन चर्चा केली. बैठकीतील प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. अजित पवारांसोबतच्या चर्चेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून प्रस्तावाला मान्यता घेण्यासाठी परब हे एच. एन. रिलायन्स रुग्णालयाकडे रवाना झाले. तिथे मुख्यमंत्र्यांची मान्यता घेतल्यानंतर परब सह्याद्री अतिथिगृहात परतले.- सह्याद्री अतिथिगृहात कर्मचारी शिष्टमंडळाला मान्यता घेतलेल्या प्रस्तावाची माहिती दिली. माध्यमांसमोर बोलताना पगारवाढीची घोषणा केली. सरकारचा प्रस्ताव ऐकला आहे. या प्रस्तावावर कर्मचाऱ्यांशी चर्चा करून निर्णय जाहीर करणार असल्याचे सांगून पडळकर आणि खोत आझाद मैदानाकडे रवाना झाले. 

टॅग्स :ST Strikeएसटी संपState Governmentराज्य सरकारGopichand Padalkarगोपीचंद पडळकर