शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
5
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
6
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
7
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
8
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
9
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
10
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
11
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
12
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
13
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
14
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
15
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
16
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
17
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
18
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
19
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
20
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 

सुकाणू समितीच्या राज्यव्यापी दौऱ्याचा पुण्यात रविवारी समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 13:22 IST

राज्यभर चालू असलेल्या शेतकरी संघटनेच्या सुकाणू समितीचा दौऱ्याचा समारोप २३ जुलै रोजी दुपारी २ वाजता मार्केटयार्ड इथे होणार आहे.

ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. 21-  राज्यभर चालू असलेल्या शेतकरी संघटनेच्या सुकाणू समितीचा दौऱ्याचा समारोप २३ जुलै रोजी दुपारी २ वाजता मार्केटयार्ड इथे होणार आहे. शेतकऱ्यांच्या अत्यंत ज्वलंत प्रश्नावर संप घडवून आणला आणि सरकारला शेतकऱ्यांचं कर्ज सरसकट माफ करण्यास भाग पाडलं, परंतु शासनाने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला. कर्ज माफीसाठी अटी लावल्या म्हणून हा शेवटचा एल्गार पुकारण्याची वेळ आली आहे. जर या शेवटच्या सभेचा आढावा सरकारने घेतला नाही तर आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत, असं समितीने शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले आहे.अजित अभ्यंकर, सुभाष वारे, रवी रणशिंग, अमोल वाघमारे, संतोष शिंदे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे. 
 
रविवारी पुण्यातील मार्केटयार्ड इथे होणाऱ्या सभेला मार्गदर्शन करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव, खासदार राजू शेट्टी, रघुनाथ पाटील, आमदार बच्चू कडू, जयंत पाटील, अजित नवले, प्रतिभा शिंदे उपस्थित राहणार आहेत.
आणखी वाचा
सुकाणू समितीत फूट पाडण्याचा प्रयत्न
 
 
 
 
10 जुलै रोजी नाशिक येथे भव्य एल्गार सभा घेऊन या सुकाणू समितीने जनजागरण यात्रेची सुरुवात केली. सुकाणू समितीमध्ये सामील असलेल्या सर्व प्रमुख संघटना या यात्रेत सामील झाल्या. शेतकरी संप व आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शेतक-यांना सरसकट कर्जमाफी देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. प्रत्यक्षात मात्र अत्यंत जाचक अटी लावण्यात आल्या. केवळ थकबाकीदार शेतक-यांचेच कर्ज माफ करण्याची भूमिका घेण्यात आली. कर्जमाफी रकमेसाठी दीड लाखाची मर्यादा लावण्यात आली. थकीततेसाठी 30 जून 2017 ची अट घालण्यात आली. नियमित कर्ज भरणा-या शेतक-यांना वा-यावर सोडण्यात आले. पॉलीहाउस, सिंचन, शेडनेट, इमूपालन आदींसाठी घेतलेल्या कर्जांना कर्जमाफीतून वगळण्यात आले. चुकीच्या व फसवणूक करणा-या आकड्यांच्या आधारे जनतेची दिशाभूल करण्यात आली. वारंवार शासनादेश काढून व भूमिका बदलून कर्जमाफीचा पोरखेळ केला गेला. शेतक-यांच्या जखमांवर मीठ चोळणारी विधाने करण्यात आली. शेतकरी समुदायामध्ये सरकारच्या या सर्व विश्वासघाता विरोधात अत्यंत संतापाची भावना आहे. जनजागरण यात्रेत शेतक-यांच्या मनातील या भावना समजून घेऊन लढ्याची पुढील रणनीती ठरविली जाणार आहे.
 
शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रमुख शेतकरी संघटना एकत्र आल्या आहेत. शेतकरी संघटनांची ही एकजूट जनजागरण यात्रेच्या माध्यमातून जिल्हा व गाव स्तरावर घेऊन जाण्याचा प्रयत्न या यात्रेत होणार आहे. शेतक-यांची तरुण पिढी या आंदोलनाचे गावोगाव नेतृत्व करत होती. शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होऊ नयेत यासाठी त्यांच्या शेतीमालाला रास्त भाव मिळण्याची नितांत गरज आहे. शेतीमालाला भाव मिळावा व शेतक-यांच्या निव्वळ उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.  
 
नाशिक येथून दिनांक 10 जुलै रोजी सुरु होणारी जनजागरण यात्रा ठाणे (पालघर), रायगड (रत्नागिरी, सिंधुदुर्ग), अहमदनगर, धुळे (नंदुरबार, जळगाव), अमरावती (यवतमाळ), बुलढाणा (अकोला,वाशीम), वर्धा (नागपूर,चंद्रपूर,गडचिरोली, भंडारा, गोंदिया), नांदेड , परभणी (हिंगोली, औरंगाबाद, जालना), बीड (लातूर), सोलापूर (उस्मानाबाद), कोल्हापूर, सांगली मार्गे झाली असून पुणे येथे दिनांक २३ जुलै रोजी यात्रेचा समारोप होणार आहे.
 
 प्रमुख मागण्या
१. शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा
२.शेतीमालाला हमीभाव द्या
३.स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीची अंमलबजावणी करा
४.शेतकऱ्यांचे संपूर्ण वीजबिल माफ करा.
५.शेतकऱ्यांना ६० वर्ष वयानंतर किमान ३००० रु.पेन्शन द्या.
६.गायीच्या दुधाला किमान ५० रु. म्हशीच्या दुधाला ६५ रु. हमीभाव द्या
७.शेतकऱ्यांना मुलाना मोफत शिक्षण द्या.