शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
3
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
4
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
5
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
6
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
7
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
8
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
9
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
10
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
11
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
12
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
13
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
14
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
15
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
16
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
17
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
18
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
19
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
20
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत

दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी राज्याचे धोरण निश्चित 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2019 13:09 IST

प्रसूती पूर्व अपंगत्व निदान, दिव्यांगांचे आरोग्य, विशेष शिक्षण, रोजगार, कौशल्य विकास, त्यांच्या सांस्कृतिक गरज, क्रीडा गुणांचा विकास यांसह यांसह विविध महत्वपुर्व बाबींचा समावेश करण्यात आला आहे. 

ठळक मुद्देकेंद्र सरकारने २०१६ साली लागू केलेल्या दिव्यांग कायद्याच्या आधारे धोरण या धोरणामुळे प्रत्येक विभागाला दिव्यांग प्रति आपली जबाबदारी स्पष्ट होईलधोरणात अपंगांच्या विकासासाठी बऱ्याच जमेच्या बाबी असल्या तरी काही त्रुटीदेखील

पुणे : दिव्यांग सक्षमीकरणासाठी राज्य शासनाने दिव्यांग धोरण निश्चित केले आहे. त्यामध्ये प्रसूती पूर्व अपंगत्व निदान, दिव्यांगांचे आरोग्य, विशेष शिक्षण, रोजगार, कौशल्य विकास, त्यांच्या सांस्कृतिक गरज, क्रीडा गुणांचा विकास यांसह यांसह विविध महत्वपुर्व बाबींचा समावेश करण्यात आला आहे. केंद्र सरकारने २०१६ साली दिव्यांग कायदा देशात लागू केला. त्या आधारे राज्याचे धोरण ठरविण्यात आले आहे. या धोरणामुळे प्रत्येक विभागाला दिव्यांग प्रति आपली जबाबदारी स्पष्ट होईल. या धोरणामध्ये दिव्यांग मुलांच्या माता किंवा काळजीवाहक यांना घरगुती उपचार प्रशिक्षण देणे, त्वरीत हस्तक्षेप व निदान अंतर्गत आवश्यक त्या व्यंगनिदान शस्त्रक्रियेसाठी अर्थसहाय्य, पाठ्यपुस्तकांमध्ये दिव्यांगांविषयी प्रकरणांचा समावेश, राजीव गांधी मुक्त शाळेमार्फत दहावीपर्यंत शिक्षण पुर्ण करण्याचा पर्याय उपलब्ध करणे, राज्याच्या दिव्यांग जनगणणेच्या आकडेवारीवर एक प्रमुख नियोजन आराखडा तयार करणे, सर्व विद्यापीठात स्वतंत्र दिव्यांग अध्यासन केंद्र स्थापन करणे या गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे.त्याचप्रमाणे दिव्यांग उद्योजकांना निवासी कार्यशाळा व कारखाने उभारण्यासाठी सवलतीच्या दरात जमीन उपलब्ध करणे, सामुहिक निवास योजनेसाठी मदत देणे, वारसाहक्काने मिळालेल्या संपत्तीच्या सुरक्षेसाठी उपाययोजना, पाच टक्के राखीव निधीमधील ५० टक्के निधी अतितीव्र दिव्यांग व्यक्तींच्या योजनांसाठी वापरणे अशा विविध बाबींही समाविष्ट करण्यात आल्या आहेत. -------------------अपंग कल्याणासाठी गेल्या पाच-सहा वर्षात अनेकदा धोरणाचा मसुदा तयार करण्यात आला होता. नुकतेच जाहीर केलेल्या धोरणात अपंगांच्या विकासासाठी बऱ्याच जमेच्या बाबी असल्या तरी काही त्रुटीदेखील आहेत. केवळ अपंग बालक, महिला व मानसिक अपंग व्यक्तींसाठी विशेष तरतूदी केल्याने सर्व प्रवगार्तील अपंगांचे पुनर्वसन होणार नाही त्यामुळे हे धोरण परिपुर्ण नाही. अपंग अधिकार कायद्यातील सर्व प्रवगार्तील अपंगांचे समांतर पुनर्वसन होणे गरजेचे आहे.- हरिदास शिंदे अपंग चळवळीतील सक्रीय कार्यकर्ते

टॅग्स :PuneपुणेCentral Governmentकेंद्र सरकारState Governmentराज्य सरकार