शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

राज्यातील दुष्काळजन्य स्थिती ३१ आॅक्टोबरपर्यंत जाहीर : चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 19:17 IST

महाराष्टतील दुष्काळसदृश स्थितीची पाहणी करण्यासाठी राज्य सरकारने ‘अ‍ॅप’ची निर्मिती केली असून, त्याद्वारे केंद्राने ठरवून दिलेल्या तीन टप्प्यातील निकषांची पाहणी करण्यात येत आहे.

ठळक मुद्देअ‍ॅप’द्वारे तीन टप्प्यात दुष्काळसदृश तालुक्यांचे सर्वेक्षणदुष्काळग्रस्त भागांना तातडीने मदत करण्यात येणार असल्याचेही मंत्री पाटील यांनी यावेळी सांगितले.

कोल्हापूर : महाराष्टतील दुष्काळसदृश स्थितीची पाहणी करण्यासाठी राज्य सरकारने ‘अ‍ॅप’ची निर्मिती केली असून, त्याद्वारे केंद्राने ठरवून दिलेल्या तीन टप्प्यातील निकषांची पाहणी करण्यात येत आहे. त्यानुसार सलग २१ दिवस पाऊस न पडलेल्या २०० तालुक्यांचे सर्वेक्षण सुरू आहे, हे तिन्ही टप्प्यांतील सर्वेक्षण २५ आॅक्टोबरपर्यंत पूर्ण होऊन ३१ आॅक्टोबर रोजी राज्यातील दुष्काळजन्य परिस्थिती जाहीर केली जाईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात एका कार्यक्रमासाठी सार्वजनिक बांधकाममंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील आले असता पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, महाराष्टÑात काही ठिकाणी समाधानकारक तर काही ठिकाणी असमाधानकारक पाऊस झाला आहे; त्यामुळे काही ठिकाणी शेतीचे नुकसानही मोठ्या प्रमाणावर झाले आहे; पण हे नुकसानग्रस्त भागांची तपासणी करण्यासाठी महाराष्टÑ शासनाच्या वतीने ‘अ‍ॅप’ची निर्मिती केली असून, त्याचे मुंबईत शुक्रवारीच उद्घाटन झाले.

या ‘अ‍ॅप’द्वारे महाराष्टÑात पडलेल्या पावसाचे गाव, मंडल, तालुका व जिल्हानिहाय मोजमाप करण्यात येत आहे. सलग २१ दिवस ज्या तालुक्यात पाऊस पडत नाही, असे तालुके संभाव्य दुष्काळसदृश यादीत समाविष्ट करण्यात येत आहेत, अशा राज्यातील २०० तालुक्यांत २१ दिवस पाऊस पडला नसल्याने केंद्राच्या निकषांप्रमाणे त्यांचा संभाव्य दुष्काळसदृश यादीत समाविष्ट करण्यात आला आहे.

या दुसऱ्या टप्प्यातील पाहणी सुरू करण्यात येत आहे. त्या पाहणीत त्या-त्या भागातील पर्जन्यमान, भूजल पातळी, जमिनीची आर्द्रता, पिकांची स्थिती यांचे उपग्रहामार्फत सर्वेक्षण सुरू केले आहे. याशिवाय निवडलेल्या तालुक्यांची तिसºया टप्प्यात प्रत्यक्ष पाहणी करून दि. २५ आॅक्टोबरपर्यंत हे सर्वेक्षण पूर्ण करण्यात येणार असून दुष्काळजन्य परिस्थिती ३१ आॅक्टोबरपर्यंत जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर दुष्काळग्रस्त भागांना तातडीने मदत करण्यात येणार असल्याचेही मंत्री पाटील यांनी यावेळी सांगितले. 

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलkolhapurकोल्हापूर