शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
2
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
3
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
4
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
5
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
6
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
7
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
8
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
9
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बलापूरमधील धक्कादायक घटना
10
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
11
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी
12
जिल्हाधिकाऱ्यांना मुख्य सचिव बनून केला फोन, दिले असे आदेश, पिता-पुत्रासह तिघांना अटक, असं फुटलं बिंग
13
हॉटेलमध्ये आलेल्या 'त्या' डॉक्टर तरूणीची अवस्था काय होती?; मालकाने सांगितला घटनाक्रम
14
२९ वर्षांपूर्वीचे रेखा-काजोलचे आयकॉनिक फोटोशूट नीसा आणि ओरीने केले रीक्रिएट; सोशल मीडियावर खळबळ!
15
'ट्रम्पने 50 वेळा मोदींचा अपमान केला, तरीही मोदी गप्प; इंदिरा गांधींसारखे धाडस हवे'- राहुल गांधी
16
UP: योगी सरकारच्या धोरणांमुळे विमान वाहतुकीत विक्रमी वाढ!
17
सलमान खान स्वत: 'बिग बॉस'चे सगळे एपिसोड्स बघतो का? अखेर निर्मात्यांनी केला खुलासा
18
बायकोचा खून करून घरात रचला चोरीचा बनाव, पण पतीच्या एका चुकीमुळे झाला 'भांडाफोड'...
19
IPO ची वाटही पाहिली नाही! देशातील सर्वात मोठ्या म्युच्युअल फंडने Lenskart ला दिला ₹100 कोटींचा चेक
20
13 दिवसांनंतर सोनं १३०९ नं महागलं, चांदीही ३८३२ नं वधारली, पुन्हा विक्रमी पातळीव पोहोचणार गोल्ड? काय म्हणतात एक्सपर्ट?

'लोकमत'च्या हायटेक चारा छावणी संदर्भातील बातमीची विधानपरिषदेत दखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2019 15:00 IST

लासूर येथे गंगापूरचे आमदार प्रशांत बंब आणि बजाज ऑटो, भारतीय जैन संघटनेच्या पुढाकाराने लासूर येथे चारा छावणी सुरु करण्यात आली होती.

मुंबई - औरंगाबादमधील लासूर येथील हायटेक चारा छावणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या  भेटीनंतर आठ दिवसांतच बंद पडली असल्याची 'लोकमत'च्या बातमीची विधानपरिषदेत दखल घेण्यात आली आहे. विधानपरिषदेत चारा छावणीबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नावर बोलताना विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी औरंगाबादमधील बंद पडलेल्या हायटेक चारा छावणीचा विशेष उल्लेख केला. 

औरंगाबाद जिल्ह्यातील लासूर येथील  हायटेक छावणी म्हणून गौरविण्यात आलेली आणि खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिलेली चारा छावणी मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर अवघ्या आठ दिवसांतच बंद पडली असल्याची बातमी लोकमत (ऑनलाइन) वर प्रसिध्द करण्यात आली होती. विधानपरिषदेत धनंजय मुंडेंनी या बातमीवरून सरकारचा समाचार घेतला आहे. मुख्यमंत्री यांनी औरंगाबादच्या हायटेक चारा छावणीला भेट दिल्यांनतर अवघ्या काही दिवसात छावणी बंद करण्यात आली, सरकारचा हा फक्त देखावा असल्याचे मुंडे म्हणाले.

लासूर येथे गंगापूरचे आमदार प्रशांत बंब आणि बजाज ऑटो, भारतीय जैन संघटनेच्या पुढाकाराने लासूर येथे चारा छावणी सुरु करण्यात आली होती. राज्यात सुरु असलेल्या चार छावण्यांपैकी सर्वात मोठी चारा छावणीच्या यादीत लासुरच्या छावणीचा उल्लेख होता. तसेच राज्यातील सर्वात हायटेक चारा छावणी म्हणून सुद्धा या छावणीला गौरविण्यात आले होते. मात्र मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर अचानक ही चारा छावणी बंद झाल्याने मोठी चर्चा झाली होती.

शेतकऱ्यांनी केले होते आरोप

मी बाभूळगाव येथील शेतकरी असून , माझे दहा जनावरे आहेत मात्र चारा छावणी चालकांनी घरी घेऊन जाण्याचे सांगितले. चारा विकत घेण्याची वेळ आली आहे. थोडेफार पैसे होते, मात्र ते बियाणे घेण्यासाठी लागणार आहे. त्यामुळे आठ दिवस पुरेल एवढा चारा शिल्लक आहे. असे लक्ष्मण सोनवणे म्हणाले.

आरोप खोटे आहे : प्रशांत बंब(भाजप आमदार)

मागील तीन महिने आम्ही ६ हजारपेक्षा अधिक जनावरांना छावणीत चारा-पाणी पुरवले. एवढच नाही तर,  शेतकऱ्यांची  जेवण्याची आणि राहण्याची सोय करण्यात आली होती. मात्र, ग्रामीण भागात मशागती सुरु झाल्याने शेतकऱ्यांनी स्वता;हून आपली जनावरे घरी घेऊन गेले. चांगला पाऊस पडेपर्यंत छावणी सुरु ठेवण्याचे आमचे नियोजन होते. शेतकऱ्यांशी चर्चा करून आणि त्यांच्या मागणीनुसारच छावणी बंद करण्यात आली आहे. त्यामुळे आमच्यावर होत असलेले सर्व आरोप खोटे असल्याचे बंब म्हणाले.