शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2025 07:15 IST

Mahavitaran: ४२ लाख शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याचे लक्ष्य

मुंबई:महावितरण कंपनी सौर उर्जेच्या माध्यमातून वीजनिर्मितीला चालना देत आहे. देशात सर्वप्रथम सौर उर्जेद्वारे ४२ लाख शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. ३० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक सौर ऊर्जा क्षेत्रात होत आहे. जवळपास सात हजार मेगावॅट  वीजनिर्मिती सौर ऊर्जेवर होणार आहे. जिल्ह्यातील ३० टक्के कृषी वाहिनीचे  सौर ऊर्जीकरण डिसेंबर २०२६ पर्यंत करण्याचे मिशन आहे, असे महावितरणचे संचालक राजेंद्र पवार म्हणाले.

महावितरणच्या भांडुप परिमंडळातील पेण मंडळ कार्यालयाचा वर्धापन दिन अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत साजरा झाला. या वेळी विशेष अतिथी म्हणून पवार बोलत होते. ते म्हणाले, ‘अन्न, वस्त्र व निवाऱ्याप्रमाणे वीज आता आपली मूलभूत गरज बनली आहे. शहरी, ग्रामीण किंवा कितीही दुर्गम भाग असो, प्रत्येक नागरिकांचे जीवनमान उंचावण्यात महावितरणचे मोठे योगदान आहे. २० वर्षांच्या कालावधीत महावितरणच्या यंत्रणेचे सक्षमीकरण केले आहे.  

दरम्यान, ९ जूनला किल्ले रायगडवर शिवराज्याभिषेक सोहळा कार्यक्रम पार पडला. त्यात महावितरणच्या गोरेगाव विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अखंडित व अपघातरहित वीजपुरवठा केला. त्याबद्दल गोरेगाव विभागाचे कार्यकारी अभियंता आर. जे. पाटील व त्यांच्या टीमला सन्मानित करण्यात आले.

‘आंतरराष्ट्रीय स्तरावर आता काम’ - भांडुप परिमंडळातील मुख्य अभियंता संजय पाटील म्हणाले, महावितरणपुढे पूर्वी भारनियमन, वीज उपलब्धता, यासारखी आव्हाने होती, पण आता आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करत आहोत. - आपल्याला एक मोठी वीजपुरवठा करणारी कंपनी बनण्यापेक्षा लोकांमधली आवडती कंपनी बनून, एक ब्रॅण्ड निर्माण करायचा आहे. वाढत्या औद्योगिकरणामुळे आपले काम खूप महत्त्वाचे आहे. - राज्याच्या  विकासासाठी उद्योगांना दर्जेदार सेवा देणे गरजेचे आहे. त्यासाठी, प्रत्येक कर्मचाऱ्यांनी आंतरराष्ट्रीय दर्जेची सेवा देण्याची व सुरक्षा साधनांचा वापर करून काम करण्याचा संकल्प घेतला पाहिजे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणMaharashtraमहाराष्ट्र