शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
4
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
5
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
6
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
7
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
8
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
9
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
10
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
11
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
12
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
13
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
14
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
15
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
16
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
17
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
18
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
19
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
20
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2025 07:15 IST

Mahavitaran: ४२ लाख शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याचे लक्ष्य

मुंबई:महावितरण कंपनी सौर उर्जेच्या माध्यमातून वीजनिर्मितीला चालना देत आहे. देशात सर्वप्रथम सौर उर्जेद्वारे ४२ लाख शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. ३० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक सौर ऊर्जा क्षेत्रात होत आहे. जवळपास सात हजार मेगावॅट  वीजनिर्मिती सौर ऊर्जेवर होणार आहे. जिल्ह्यातील ३० टक्के कृषी वाहिनीचे  सौर ऊर्जीकरण डिसेंबर २०२६ पर्यंत करण्याचे मिशन आहे, असे महावितरणचे संचालक राजेंद्र पवार म्हणाले.

महावितरणच्या भांडुप परिमंडळातील पेण मंडळ कार्यालयाचा वर्धापन दिन अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत साजरा झाला. या वेळी विशेष अतिथी म्हणून पवार बोलत होते. ते म्हणाले, ‘अन्न, वस्त्र व निवाऱ्याप्रमाणे वीज आता आपली मूलभूत गरज बनली आहे. शहरी, ग्रामीण किंवा कितीही दुर्गम भाग असो, प्रत्येक नागरिकांचे जीवनमान उंचावण्यात महावितरणचे मोठे योगदान आहे. २० वर्षांच्या कालावधीत महावितरणच्या यंत्रणेचे सक्षमीकरण केले आहे.  

दरम्यान, ९ जूनला किल्ले रायगडवर शिवराज्याभिषेक सोहळा कार्यक्रम पार पडला. त्यात महावितरणच्या गोरेगाव विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अखंडित व अपघातरहित वीजपुरवठा केला. त्याबद्दल गोरेगाव विभागाचे कार्यकारी अभियंता आर. जे. पाटील व त्यांच्या टीमला सन्मानित करण्यात आले.

‘आंतरराष्ट्रीय स्तरावर आता काम’ - भांडुप परिमंडळातील मुख्य अभियंता संजय पाटील म्हणाले, महावितरणपुढे पूर्वी भारनियमन, वीज उपलब्धता, यासारखी आव्हाने होती, पण आता आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करत आहोत. - आपल्याला एक मोठी वीजपुरवठा करणारी कंपनी बनण्यापेक्षा लोकांमधली आवडती कंपनी बनून, एक ब्रॅण्ड निर्माण करायचा आहे. वाढत्या औद्योगिकरणामुळे आपले काम खूप महत्त्वाचे आहे. - राज्याच्या  विकासासाठी उद्योगांना दर्जेदार सेवा देणे गरजेचे आहे. त्यासाठी, प्रत्येक कर्मचाऱ्यांनी आंतरराष्ट्रीय दर्जेची सेवा देण्याची व सुरक्षा साधनांचा वापर करून काम करण्याचा संकल्प घेतला पाहिजे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणMaharashtraमहाराष्ट्र