शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2025 07:15 IST

Mahavitaran: ४२ लाख शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याचे लक्ष्य

मुंबई:महावितरण कंपनी सौर उर्जेच्या माध्यमातून वीजनिर्मितीला चालना देत आहे. देशात सर्वप्रथम सौर उर्जेद्वारे ४२ लाख शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. ३० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक सौर ऊर्जा क्षेत्रात होत आहे. जवळपास सात हजार मेगावॅट  वीजनिर्मिती सौर ऊर्जेवर होणार आहे. जिल्ह्यातील ३० टक्के कृषी वाहिनीचे  सौर ऊर्जीकरण डिसेंबर २०२६ पर्यंत करण्याचे मिशन आहे, असे महावितरणचे संचालक राजेंद्र पवार म्हणाले.

महावितरणच्या भांडुप परिमंडळातील पेण मंडळ कार्यालयाचा वर्धापन दिन अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत साजरा झाला. या वेळी विशेष अतिथी म्हणून पवार बोलत होते. ते म्हणाले, ‘अन्न, वस्त्र व निवाऱ्याप्रमाणे वीज आता आपली मूलभूत गरज बनली आहे. शहरी, ग्रामीण किंवा कितीही दुर्गम भाग असो, प्रत्येक नागरिकांचे जीवनमान उंचावण्यात महावितरणचे मोठे योगदान आहे. २० वर्षांच्या कालावधीत महावितरणच्या यंत्रणेचे सक्षमीकरण केले आहे.  

दरम्यान, ९ जूनला किल्ले रायगडवर शिवराज्याभिषेक सोहळा कार्यक्रम पार पडला. त्यात महावितरणच्या गोरेगाव विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अखंडित व अपघातरहित वीजपुरवठा केला. त्याबद्दल गोरेगाव विभागाचे कार्यकारी अभियंता आर. जे. पाटील व त्यांच्या टीमला सन्मानित करण्यात आले.

‘आंतरराष्ट्रीय स्तरावर आता काम’ - भांडुप परिमंडळातील मुख्य अभियंता संजय पाटील म्हणाले, महावितरणपुढे पूर्वी भारनियमन, वीज उपलब्धता, यासारखी आव्हाने होती, पण आता आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करत आहोत. - आपल्याला एक मोठी वीजपुरवठा करणारी कंपनी बनण्यापेक्षा लोकांमधली आवडती कंपनी बनून, एक ब्रॅण्ड निर्माण करायचा आहे. वाढत्या औद्योगिकरणामुळे आपले काम खूप महत्त्वाचे आहे. - राज्याच्या  विकासासाठी उद्योगांना दर्जेदार सेवा देणे गरजेचे आहे. त्यासाठी, प्रत्येक कर्मचाऱ्यांनी आंतरराष्ट्रीय दर्जेची सेवा देण्याची व सुरक्षा साधनांचा वापर करून काम करण्याचा संकल्प घेतला पाहिजे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणMaharashtraमहाराष्ट्र