शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
3
कोणताही नवा चित्रपट नाही, तरीही सर्वात श्रीमंत; जुही चावलानं कशी बनवली ₹४,६०० कोटींची संपत्ती
4
मोठी बातमी: महादेव मुंडे खून प्रकरणातील माहिती देणाऱ्यास बक्षीस; एसआयटीकडून गोपनीयतेची हमी
5
Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला!
6
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
7
अमित शाह... अधिक वेग, अधिक जबाबदाऱ्या! 
8
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
9
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
10
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
11
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
12
स्टार्टअप्समधून घडवणार १.२५ लाख नवउद्योजक! धोरण जाहीर, ५ वर्षांत ५० हजार स्टार्टअप्स सुरू करण्याचे नियोजन
13
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
14
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
15
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
16
जळगाव जिल्हा वकील संघाच्या अध्यक्षपदी सागर चित्रे! उपाध्यक्षपदी ॲड. स्मिता झाल्टे; विजयी उमेदवारांचा जल्लोष
17
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
18
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
19
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
20
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 

राज्यपाल नियुक्त आमदारप्रकरणी भूमिका मांडा; हायकोर्टाचा राज्य सरकारला दहा दिवसांचा अल्टिमेटम

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2023 14:54 IST

...यासंदर्भातील पुढील सुनावणी मुख्य न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय व न्या. अरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठाने २१ ऑगस्ट रोजी ठेवली. 

मुंबई : महाविकास आघाडीने नोव्हेंबर, २०२२ मध्ये शिफारस केलेल्या राज्यपाल नियुक्त १२ विधानपरिषद आमदारांची नावे मागे घेण्याच्या तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारींच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. यावर १० दिवसांत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने सरकारला सोमवारी दिले. यासंदर्भातील पुढील सुनावणी मुख्य न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय व न्या. अरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठाने २१ ऑगस्ट रोजी ठेवली. 

तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिफारस केलेल्या राज्यपालांद्वारे नियुक्त करण्यात येणाऱ्या १२ आमदारांच्या नियुक्तीचा मुद्दा तीन वर्षांपासून गाजत आहे. आतापर्यंत राज्यपालांसमोर १२ आमदारांच्या रिक्त पदांसाठी कोणत्याही नवीन शिफारशी नाहीत, अशी माहिती राज्य सरकारकडून महाअधिवक्ता बीरेंद्र सराफ यांनी उच्च न्यायालयाला दिली. ही याचिका उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते व कोल्हापूर महापालिकेचे माजी नगरसेवक सुनील मोदी यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचले होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने सुनील मोदी यांना उच्च न्यायालयात स्वतंत्र याचिका दाखल करण्याची मुभा दिली. त्यामुळे मोदी यांनी सर्वोच्च न्यायालयातून याचिका मागे घेत २८ जुलै रोजी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. 

महाविकास आघाडीने शिफारस केलेल्या नावांवर कारवाई करण्यास नकार देण्यासाठी राज्यपालांनी १ वर्ष १० महिन्यांचा प्रदीर्घ विलंब केला. राज्यपालांच्या या कृतीमुळे शिंदे-फडणवीस सरकारला महाविकास आघाडीने केलेली शिफारस मागे घेता आली अन्यथा घटनात्मक चौकटीत हे शक्य नव्हते, असे मोदी यांनी याचिकेत म्हटले आहे. ५ डिसेंबर २०२२ रोजी तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिंदे-फडणवीस सरकारला महाविकास आघाडीने शिफारस केलेल्या १२ राज्यपाल नियुक्त आमदारांची नावे मागे घेण्यास परवानगी दिली.  राज्यपालांचा हा निर्णय रद्द करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. 

याचिकेवर आक्षेप‘शिफारस करण्यास किंवा मागे घेण्याबाबत मंत्रिमंडळावर कोणतेही बंधन नाही. राज्यपालांनी शिफारशीची फाईल मागे दिली कारण शिफारस मागे घेतल्यावर त्यांच्यापुढे कोणतीही शिफारस प्रलंबित नव्हती. आताही राज्यपालांपुढे शिफारस करण्यात आलेली नाही. आधी करण्यात आलेली शिफारस कायम करण्यात यावी, असे याचिकादार म्हणू शकत नाही. राज्यपालांनी आधीच निर्णय घ्यायला हवा होता, असे याचिकादाराला म्हणायचे नाही. ही शिफारस आहे धोरण नाही. एकच सरकार शिफारस बदलू शकते. सरकार बदलले की, मंत्रिमंडळाला पुनर्विचार करण्याच्या अधिकारापासून वंचित ठेवले जाऊ शकत नाही,’ (ॲड. बीरेंद्र सराफ यांचा उच्च न्यायालयात युक्तिवाद.)

 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयMaharashtraमहाराष्ट्रState Governmentराज्य सरकार