शहरं
Join us  
Trending Stories
1
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
2
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
3
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
4
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
5
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
6
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
7
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
8
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
9
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
10
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
11
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
12
पिके पाण्यात, स्वप्न वाहून गेले; कर्जाचा फास कसा सोडवायचा, पुढे शेती करायला पैसा कुठून आणायचा?
13
एससी उपवर्गीकरणाचा निर्णय तीन महिन्यांत घेऊ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
अवैध बांधकामांवर कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी का नाही केली?; हायकोर्टाचा एसआयटीला सवाल
15
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
16
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
17
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
18
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
19
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
20
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक

राज्यपाल नियुक्त आमदारप्रकरणी भूमिका मांडा; हायकोर्टाचा राज्य सरकारला दहा दिवसांचा अल्टिमेटम

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2023 14:54 IST

...यासंदर्भातील पुढील सुनावणी मुख्य न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय व न्या. अरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठाने २१ ऑगस्ट रोजी ठेवली. 

मुंबई : महाविकास आघाडीने नोव्हेंबर, २०२२ मध्ये शिफारस केलेल्या राज्यपाल नियुक्त १२ विधानपरिषद आमदारांची नावे मागे घेण्याच्या तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारींच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. यावर १० दिवसांत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने सरकारला सोमवारी दिले. यासंदर्भातील पुढील सुनावणी मुख्य न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय व न्या. अरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठाने २१ ऑगस्ट रोजी ठेवली. 

तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिफारस केलेल्या राज्यपालांद्वारे नियुक्त करण्यात येणाऱ्या १२ आमदारांच्या नियुक्तीचा मुद्दा तीन वर्षांपासून गाजत आहे. आतापर्यंत राज्यपालांसमोर १२ आमदारांच्या रिक्त पदांसाठी कोणत्याही नवीन शिफारशी नाहीत, अशी माहिती राज्य सरकारकडून महाअधिवक्ता बीरेंद्र सराफ यांनी उच्च न्यायालयाला दिली. ही याचिका उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते व कोल्हापूर महापालिकेचे माजी नगरसेवक सुनील मोदी यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचले होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने सुनील मोदी यांना उच्च न्यायालयात स्वतंत्र याचिका दाखल करण्याची मुभा दिली. त्यामुळे मोदी यांनी सर्वोच्च न्यायालयातून याचिका मागे घेत २८ जुलै रोजी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. 

महाविकास आघाडीने शिफारस केलेल्या नावांवर कारवाई करण्यास नकार देण्यासाठी राज्यपालांनी १ वर्ष १० महिन्यांचा प्रदीर्घ विलंब केला. राज्यपालांच्या या कृतीमुळे शिंदे-फडणवीस सरकारला महाविकास आघाडीने केलेली शिफारस मागे घेता आली अन्यथा घटनात्मक चौकटीत हे शक्य नव्हते, असे मोदी यांनी याचिकेत म्हटले आहे. ५ डिसेंबर २०२२ रोजी तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिंदे-फडणवीस सरकारला महाविकास आघाडीने शिफारस केलेल्या १२ राज्यपाल नियुक्त आमदारांची नावे मागे घेण्यास परवानगी दिली.  राज्यपालांचा हा निर्णय रद्द करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. 

याचिकेवर आक्षेप‘शिफारस करण्यास किंवा मागे घेण्याबाबत मंत्रिमंडळावर कोणतेही बंधन नाही. राज्यपालांनी शिफारशीची फाईल मागे दिली कारण शिफारस मागे घेतल्यावर त्यांच्यापुढे कोणतीही शिफारस प्रलंबित नव्हती. आताही राज्यपालांपुढे शिफारस करण्यात आलेली नाही. आधी करण्यात आलेली शिफारस कायम करण्यात यावी, असे याचिकादार म्हणू शकत नाही. राज्यपालांनी आधीच निर्णय घ्यायला हवा होता, असे याचिकादाराला म्हणायचे नाही. ही शिफारस आहे धोरण नाही. एकच सरकार शिफारस बदलू शकते. सरकार बदलले की, मंत्रिमंडळाला पुनर्विचार करण्याच्या अधिकारापासून वंचित ठेवले जाऊ शकत नाही,’ (ॲड. बीरेंद्र सराफ यांचा उच्च न्यायालयात युक्तिवाद.)

 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयMaharashtraमहाराष्ट्रState Governmentराज्य सरकार