शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

केंद्राकडे राज्याच्या जीएसटीचे साडेबावीस हजार कोटी थकीत - सुप्रिया सुळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2021 20:39 IST

Supriya Sule : सर्व राज्यांची थकबाकी दीड लाख कोटी रुपयांवर गेली आहे. ही रक्कम राज्य सरकारला देण्यासाठी केंद्र सरकारने कालमर्यादा आखून घेण्याची मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत केली.

पिंपरी : केंद्र सरकारकडे महाराष्ट्र राज्याचे वस्तू आणि सेवाकरापोटी (जीएसटी) २२ हजार ४८५ कोटी रुपये थकीत आहे. सर्व राज्यांची थकबाकी दीड लाख कोटी रुपयांवर गेली आहे. ही रक्कम राज्य सरकारला देण्यासाठी केंद्र सरकारने कालमर्यादा आखून घेण्याची मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत केली.

लोकसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात नियम ३७७ अंतर्गत राज्यांना जीएसटीच्या नुकसानभरपाईची रक्कम मिळण्यास उशीर होत असल्याचा मुद्दा सुळे यांनी मांडला. जीएसटी लागू केल्याने राज्य सरकारच्या उत्पन्नात घट झाल्यास त्याची भरपाई करण्याचे आश्वासन केंद्र सरकारने दिले होते. मात्र, जीएसटी नुकसानभरपाई निधीमध्ये पुरेशी शिल्लक नसल्याने एप्रिल २०२० पासून सर्वच राज्यांना ही रक्कम मिळण्यास उशीर झाला. 

केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या आकडेवारीनुसार एप्रिल ते जुलै २०२० अखेरीस महाराष्ट्र सरकारची २२ हजार ४५८ कोटी रुपयांची थकबाकी आहे. याच काळातील सर्व राज्यांची मिळून १ लाख ५१ हजार ३६५ कोटी रुपयांची रक्कम थकीत आहे. केंद्र सरकारकडून राज्यांना उशिरा रक्कम देण्यात येत असल्याने कल्याणकारी योजनांवर खर्च करण्यास मर्यादा येत आहे. नुकसानभरपाईचा निधी देण्यासाठी केंद्र सरकारने निश्चित कालमर्यादा आखून घेऊन थकीत रक्कम वितरित करावी, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी यावेळी केली.

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेlok sabhaलोकसभाMaharashtraमहाराष्ट्रParliamentसंसद