शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

राज्य लॉटरीच्या कार्यालयाला वीजबिल भरण्याचे वांदे; एजन्टने उपलब्ध करून दिले इन्व्हर्टर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2021 08:45 IST

‘सोडत आज नाही तर उद्या’ असे म्हणणण्याची आली वे‌ळ

ठळक मुद्दे‘सोडत आज नाही तर उद्या’ असे म्हणणण्याची आली वे‌ळ

यदु जोशी

मुंबई : लाखो लोकांमध्ये दरदिवशी श्रीमंतीची स्वप्ने पेरणाऱ्या महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या वाशी; नवी मुंबई येथील कार्यालयाची वीज महावितरणने थकबाकीपोटी कापली असून त्यामुळे सोडतींमध्ये अनंत अडचणी येत आहेत. इन्व्हर्टर लावून खंडित सोडती सुरू करण्याची वेळ आली आहे.

महाराष्ट्र राज्य लॉटरी... यश आज नाही तर उद्या’, ही टॅगलाइन आता ‘महाराष्ट्र राज्य लॉटरी... सोडत आज नाही तर उद्या’ अशी बदलण्याची वेळ आली आहे. दिलेल्या तारखेनुसार सोडती होत नाहीत, असा अनुभव वारंवार येत आहे. या प्रकारामुळे राज्यभरातील लॉटरीचे एजंट हैराण झाले आहेत. वीज बिलाची रक्कम मिळावी म्हणून वाशीच्या कार्यालयानेच एखादे लॉटरी तिकीट खरेदी करावे, अशी मजेशीर सूचना नांदेडच्या एका एजंटने (पान १ वरुन) ‘लोकमत’शी बोलताना केली. राज्य सरकारला वर्षाकाठी कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न मिळवून देणाऱ्या या लॉटरीची सोडत वाशीतील ज्या कार्यालयात होते, तेथील वीज कनेक्शन तर कापलेच शिवाय टेलिफोन आणि पाणी कनेक्शन बिल न भरल्याने तेही कापण्याच्या नोटीसा आल्या आहेत.

वीज कापल्याने २५ जूनपासून हे कार्यालय अंधारात आहे. लॉटरी ज्या मशीनवर काढल्या जातात, त्या वीज पुरवठ्याअभावी बंद असल्याने सोडतीच होत नव्हत्या. एरवी आठवड्यातून किमान सात सोडती होतात, पण गेल्या एप्रिलपासून सोडती नियमित काढल्या जात नाहीत. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणजे लॉटरी तिकिटांची विक्री कमी झाली आहे. मुंबईतील मुख्य एजंटने १२ ते १८ जुलैपर्यंतच्या सोडतीची तिकिटे अद्याप उचललेली नाहीत.

एजंटने उपलब्ध करून दिले इन्व्हर्टरमुंबईच्या मुख्य एजंटने औदार्य दाखवून इन्व्हर्टर उपलब्ध करून दिले आणि शुक्रवारी ६ जुलैला एकाच दिवशी तब्बल नऊ सोडती काढण्यात आल्या. २ जुलैपासून सोडती बंद होत्या.

वाशीच्या कार्यालयाने पाठविलेला प्रस्ताव आम्ही वित्त विभागाकडे पाठविला आहे. येत्या दोन-तीन दिवसांत वीज बिल भरले जाईल आणि सोडती नियमित होतील.संजय गुळेकर, अवर सचिव, महाराष्ट्र राज्य लॉटरी

विजेचे बिल भरले नाही म्हणून वीज कनेक्शन कापले याचा एजंटांशी काही एक संबंध नाही पण राज्यभरातील ५०० एजंटांना त्याचा फटका बसत आहे. इतक्या वर्षांमध्ये असा कटू अनुभव पहिल्यांदाच येत आहे.मनीष खेतान, लॉटरी एजंट, खामगाव, जि. बुलडाणा

टॅग्स :electricityवीजMaharashtraमहाराष्ट्रMONEYपैसा