शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

पोलीस ठाण्यांत सीसीटीव्ही बसवण्यासाठी राज्य सरकारने पुरेसे काही केले नाही - उच्च न्यायालय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2022 16:12 IST

सर्वोच्च न्यायालयाने डिसेंबर २०२० मध्ये राज्यातील सर्व पोलीस ठाण्यांत सीसीटीव्ही बसविण्याचे आदेश दिले होते. मात्र, गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्र सरकारने पुरेसे काम केले नाही.

मुंबई - राज्यभरातील पोलीस ठाण्यांत सीसीटीव्ही बसविण्यासाठी राज्य सरकारने पुरेसे काही केले नाही, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने सरकारवर ताशेरे ओढले. कोणत्याही प्रकरणात न्यायालयाने पोलिसांकडे सीसीटीव्ही फुटेज मागितले की ते दरवेळी कारणे देऊन टाळतात, असे निरीक्षण न्या. एस. जे. काथावाला व न्या. मिलिंद जाधव यांच्या खंडपीठाने सोमवारी नोंदविले. हे सर्व जाणुनबुजून केले जात आहे, असे न्यायालयाने म्हटले. सर्वोच्च न्यायालयाने डिसेंबर २०२० मध्ये राज्यातील सर्व पोलीस ठाण्यांत सीसीटीव्ही बसविण्याचे आदेश दिले होते. मात्र, गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्र सरकारने पुरेसे काम केले नाही. सर्वोच्च न्यायालयाचा आदेश वाचण्याची कोणी तसदी तरी घेतली का? तुम्हाला (राज्य सरकार) सर्वोच्च न्यायालयाचे आदेश पाळावे लागतील, असे न्या. काथावाला यांनी म्हटले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा उद्देश पारदर्शकता निश्चित करणे, हाच आहे. याकडे लक्ष देण्यासाठी तुम्हाला एक समिती नेमावी लागेल. नाहीतर कोणीच दखल घेणार नाही, असे न्यायालयाने म्हटले. सीसीटीव्ही बसविण्याचे व बंद पडलेले सीसीटीव्ही दुरुस्त करण्याचे काम दोन कंत्राटदार करत आहेत, अशी माहिती कुंभकोणी यांनी दिली. सरकारने न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रनुसार, राज्यात एकूण १,०८९ पोलीस ठाणी आहेत. आतापर्यंत ५४७ पोलीस ठाण्यात ६,०९२ सीसीटीव्ही बसविले आहेत. त्यापैकी ५,६३९ सीसीटीव्ही सुरू आहेत. कंत्राटदारांना सर्व सीसीटीव्ही १५ दिवसांत दुरुस्त करण्यास सांगितले आहेत, असे कुंभकोणी यांनी सांगितले.

केवळ दोन कंत्राटदार का?हे काम करण्यासाठी केवळ दोनच कंत्राटदार का आहेत? दोनापेक्षा अधिक कंत्राटदार का नाहीत? असा सवाल न्यायालयाने सरकारला केला. या दोन कंत्राटदारांबरोबर नोव्हेंबर २०२० मध्ये कंत्राट केले होते आणि त्यापुढील पाच वर्षे ते देखभालीचे काम करणार होते. मात्र, कोरोनामुळे सीसीटीव्ही बसविण्यास विलंब झाला, असे कुंभकोणी यांनी म्हटले. न्यायालयाने या याचिकेवरील सुनावणी २ मार्च रोजी ठेवली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयUddhav Thackerayउद्धव ठाकरेcctvसीसीटीव्ही