गणपती बाप्पाच्या मूर्ती बनविण्यास प्रारंभ
By Admin | Updated: June 29, 2014 23:17 IST2014-06-29T23:17:57+5:302014-06-29T23:17:57+5:30
कोकणात गणरायाची सुबक मूर्ती तयार करण्यासाठी हजारो हात सरसावतात ते वटपौर्णिमेनंतरच.

गणपती बाप्पाच्या मूर्ती बनविण्यास प्रारंभ
>मुरुड : कोकणात गणरायाची सुबक मूर्ती तयार करण्यासाठी हजारो हात सरसावतात ते वटपौर्णिमेनंतरच. कारखान्यात अलिकडे प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या फ्रेममध्ये o्रींच्या मूर्ती साकारल्या जात असल्या तरी कोकणात अद्याप गणोश भक्तांची पसंती शाडूच्या मातीपासून तयार होणा:या मूर्तीनाच सर्वाधिक असते. मूर्तिकलेच्या आड लौकिक अर्थाने शिक्षण, प्रशिक्षण अजिबात येत नाही. साजि:या मूर्ती हातावेगळय़ा करण्यासाठी हवी असते ती चिकाटी, सातत्य आणि कष्ट उपसण्याची तयारी.
मुरुड तालुक्यातील वाणदे या छोटय़ाशा गावात प्रसिद्ध मूर्तीकार पांडुरंग विठोबा पाटील यांचे जेमतेम दुसरीर्पयत शिक्षण झालेले असून वयाच्या 16 व्या वर्षापासून या कलेकडे ते वळले. अत्यंत हालाखीची परिस्थिती, चार पैसे मिळवून कुटुंबाला हातभार लावावा म्हणून मुरुड गाठले. सुप्रसिद्ध मूर्तीकार कै. वसंत जंजिरकर यांचे शिष्य. दहा वष्रे या कामातील बारकावे आत्मसात केले. त्यानंतर वाणदे या जन्मगावी स्वतंत्र व्यवसायाला सुरुवात केली. सलग 4क् वर्षे ते मूर्तीकाम करीत आहेत. मध्यंतरी लक व्याचा त्रस झाला परंतु जबरदस्त इच्छाशक्तीच्या बळावर मुलगा प्रसादच्या मदतीने हा व्यवसाय अव्याहत सुरू आहे. दरवर्षी सुमारे 5क्क् गणोशमूर्ती कारखान्यात ते तयार करतात. रोहा, इंदापूर, तळा या तालुक्यात त्यांनी तयार केलेल्या मूर्तीला विशेष मागणी असते. तीनशे रुपयांपासून दहा हजारांर्पयत o्रींची मूर्ती उपलब्ध केली जाते. नांदगावच्या सिद्धीविनायकच्या 12 बाय 19 इंचाच्या देखण्या मूर्तीना विशेष मागणी असते.
या व्यवसायामध्ये चार पैसे मिळतात परंतु त्याहीपेक्षा विघAहत्र्याची सेवा महत्त्वाची असल्याचे ते विनम्रपणो सांगतात. प्लॅस्टर ऑफ पॅरिसमध्ये मूर्तीकाम सुबक आकर्षक होते तरीही पर्यावरणाला कुठेही तडा जाऊ नये म्हणून शाडू मातीतूनच मूर्तीकाम करण्यासाठी पाटील आग्रही राहतात. (वार्ताहर)
दरवर्षी कच्च्या मालाच्या किमती 15 ते 2क् टक्क्यांनी वाढतात. 4क् किलो शाडू मातीसाठी 17क् रुपये मोजावे लागतात. शिवाय रंगाचे दर सातत्याने वाढतात. कुशल कामगारांची खूप कमतरता आहे. कारखान्यासाठी स्वत:चे घर व अन्य जागा भाडय़ाने घ्यावी लागते. वीज पुरवठा वारंवार खंडीत होत असल्यामुळे कामामध्ये व्यत्यय येतो. ज्यांना शिकण्याची हौस आहे तसेच ओल्या मातीत काम करावयाचे आहे अशी मंडळी मोजकीच असते. नव्या पिढीतील युवकांना मूर्तीकामात विशेष रस दिसत नसल्याची त्यांची खंत आहे.