शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

एसटी संपावर तोडगा नाही! कर्मचाऱ्याचा गळफास घेण्याचा प्रयत्न, कोल्हापुरातील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2021 14:35 IST

एसटी कर्मचाऱ्यांनी राज्यभर आपल्या विविध मागण्यांसाठी संपाचा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे राज्यातील अनेक आगारांमधून एसटी निघालेल्या नाहीत आणि प्रवाशांचे हाल होत आहेत.

कोल्हापूर

एसटी कर्मचाऱ्यांनी राज्यभर आपल्या विविध मागण्यांसाठी संपाचा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे राज्यातील अनेक आगारांमधून एसटी निघालेल्या नाहीत आणि प्रवाशांचे हाल होत आहेत. एसटी कर्मचाऱ्यांचं राज्य शासनात विलीनीकरण करावं अशी मागणी संप करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी लावून धरली आहे. त्यावर अजूनही तोडगा निघालेला नाही. यातच कोल्हापुरातील आज मध्यवर्ती बसस्थानकात धक्कादायक प्रकार घडला. गगनबावडा आगारातील सदानंद कांबळे नावाच्या कर्मचाऱ्यानं आगारातच गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.

सदानंद कांबळे नावाचा कर्मचारी गळफास लावून आत्महत्या करत असतानाच उपस्थित कर्मचाऱ्यानं प्रसंगावधान दाखवत कर्मचाऱ्याला वाचवलं. दुसरीकडे राज्य सरकार आता संपाबाबत आक्रमक झालेलं पाहायला मिळत आहे. कर्मचाऱ्यांनी समितीसमोर म्हणणं मांडावं. कर्मचाऱ्यांनी आरपारची लढाई लढू नये असं आवाहन परिवहन मंत्री अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांना केले आहे. तसंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचं आवाहन केलं आहे. 

राज्यातील गोरगरीब आणि सर्वसामान्य प्रवाशांना वेठीस धरणारे आंदोलन करू नका. आधीच आपण सर्वच जण अजूनही कोरोनाशी लढतोय. दोन वर्षांपासून या विषाणूचा  मुकाबला करत आपण कसाबसा मार्ग काढतोय. त्यामुळे कृपया शासनाच्या प्रयत्नांना सहकार्य करा अशी माझी पुन्हा एकदा नम्र विनंती आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :ST Strikeएसटी संपMaharashtraमहाराष्ट्र