शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

ग्रामीण भागासाठी एसटीची लवकरच इलेक्ट्रिक बस सेवा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 07:31 IST

प्रत्येक एसटी डेपोमध्ये अद्ययावत व स्वच्छ असे स्वच्छतागृह उभारले जाणार

मीरा रोड : एसटी महामंडळ ग्रामीण भागातही मोठ्या संख्येने इलेक्ट्रिक बस सुरू करणार असून त्यासाठी ग्रामीण भागात चार्जिंग स्टेशन उभारणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. कोस्टल मार्ग हा वाढवण बंदरापर्यंत विस्तारित होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मंत्री झाल्यावर मीरा-भाईंदरमध्ये झालेल्या पहिल्याच कार्यक्रमात ते बोलत होते.

डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी सभागृहात ‘चाय पे चर्चा’ या उपक्रमाद्वारे मीरा रोड भागातील नागरिकांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी नागरिकांनी शहरातील वाहतूककोंडी सोडवण्यासह सिमेंट रस्त्यांची कामे लवकर पूर्ण करावीत, पाणीपुरवठ्यात वाढ करावी, सीसीटीव्ही कॅमेरे वाढवावेत, दहिसर टोल नाका येथील कोंडी दूर करावी, अनधिकृत रिक्षाचालकांवर कारवाई व्हावी, भाईंदरमधून सुटणाऱ्या एसटी बसची संख्या वाढवावी, आदी मुद्दे उपस्थित केले.

टोल नाका हटवून केवळ अवजड वाहनांसाठी दोन टोल मार्गिका ठेवण्यात येतील. मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी शहराच्या विकासकामांसाठी सुमारे ३ हजार कोटींचा निधी मंजूर केला. पाणीपुरवठा वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मेट्रो व रस्त्यांची कामे लवकर पूर्ण केली जातील, जेणेकरून वाहतूककोंडी सुटेल, असेही ते म्हणाले.

इंधन बचत व प्रदूषण नियंत्रण!

राज्य परिवहन महामंडळाकडून ग्रामीण भागातसुद्धा इलेक्ट्रिक बस चालवल्या जाणार असून यामुळे इंधन खर्चात व देखभाल-दुरुस्तीमध्ये बचत होईल आणि प्रदूषण टळेल. 

यासह प्रत्येक एसटी डेपोमध्ये अद्ययावत व स्वच्छ असे स्वच्छतागृह उभारले जाणार आहे. रात्रपाळी करणाऱ्या एसटी चालक, वाहक आदींसाठी झोपण्याची आणि अंघोळीसाठी गरम पाण्याची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. ही कामे आपण प्राधान्याने हाती घेतल्याचेही त्यांनी सांगितले. 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रpratap sarnaikप्रताप सरनाईक